शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

Atal Bihari Vajpayee Death: अटलजींचे तुकाराम दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 20:26 IST

Atal Bihari Vajpayee Death: विश्वव्यापी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजोद्धारक आणि तारक कसे आहेत याचे दर्शन भारतवासीयांना घडले. उत्तम राजकारणी, फर्डे वक्ते,  कवी, लेखक आणि विचारवंत  असणा-या अटलजींनी विज्ञान भवनात तुकाराम दर्शन घडविले.

-  विश्वास मोरे

दिल्लीतील विज्ञान भवनात दिनांक ६ फेब्रुवारी २००३ अर्थात वसंत पंचमीचा दिवस. मराठी जणांसाठी अभिमानाचा आणि भाग्याचा दिन अर्थात वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा नाणे प्रकाशन सोहळा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत रंगला. विश्वव्यापी वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान समाजोद्धारक आणि तारक कसे आहेत याचे दर्शन भारतवासीयांना घडले. उत्तम राजकारणी, फर्डे वक्ते,  कवी, लेखक आणि विचारवंत  असणा-या अटलजींनी विज्ञान भवनात तुकाराम दर्शन घडविले. महाराष्ट्रातील वारकरी संस्कृतीचे दर्शन घडले. अवघा भक्तीरंग गहिरा झाला. वारकरी संप्रदायाचे पायिक अर्थात तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रयत्नातून २००३ मध्ये वारकरी संप्रदायाच्या मंदिराचे कळस संतश्रेष्ठ तुकाराम महाराज नाणे प्रकाशन सोहळा दिल्लीत झाला. विज्ञान भवनात प्रथमच वारकरी तत्त्वज्ञान आणि  संगीताचे सूर उमटले. वारक-यांना दिल्लीवारी घडविण्याचे पुण्य विखे पाटलांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने केले होते. वसंत पंचमीचा दिवस उजाडला. हा दिवस मराठी जणांसाठी अलौकिक आनंदाचा ठरला. विज्ञान भवनात नाणे प्रकाशन समारंभ सुरू झाला. प्रारंभी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांची अभंगवाणी सादर झाली. 'जय जय रामकृष्ण हरी...' या बीजमंत्राने वातावरणात रंग भरला. त्यानंतर 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी...', असे एकाहून एक सरस अभंगरचना सादर केल्या. अभंगवाणी रंगत असतानाच मुख्य सोहळ्यासाठी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यासपीठावर आगमन झाले. त्या वेळी पंतप्रधानांची छबी टिपण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. त्याचवेळी 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ...' असे वाजपेयी यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. सोहळा सुरू झाला, व्यासपीठावर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बाळासाहेब विखे पाटील, केंद्रीय मंत्री जसवंत सिंह, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात अटलजींचे सुमारे ३२ मिनिटांचे भाषण झाले. त्यातून एखाद्या संतसाहित्याच्या अभ्यासकालाही ज्ञात नसतील, एवढी तुकोबारायांची रूपे उलगडली. तुकोबाराय समाजमनाशी किती एकरूप झाले आहेत, हे सांगितले. भाषण हे हिंदीत असले तरी तुकोबारायांच्या अभंगांचे दाखले देत विवेचन केले. अटलजींनी आपल्या अर्थपूर्ण, अभ्यासपूर्ण रसाळ वाणीने मंत्रमुग्ध करून सोडले़ सभागृह भारावले होते, प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता. अभंगांचे दाखले देत भारत-पाक संबंध, स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण आदी विषयांवर भाष्य करून तुकाराम दर्शन घडविले.  'महाराष्ट्रातील समस्त वारक-यांना माझा नमस्कार, ज्ञानोबा-तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...', असे म्हणून अटलजींनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले,'' महाराष्ट्र ही संतांची भूमी. संतांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. अभंगरचना, ओव्यांच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. कडक प्रहारही केला. डोळ्यांत अंजण घातले. ' भेदाभेद भ्रम अमंगळ, 'एकमेका साह्य करूं अवघें धरू सुपंथ...' हा बंधू भावाचा विश्वव्यापकतेचा संदेशही तुकोबारायांनीच दिला. झाडे लावा झाडे जगवा आज आपण सांगतो, त्यासाठी अभियान राबविले जाते. परंतु 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी...' हे तुकोबारायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगितले आहे. आपल्यावर कोणी अन्याय करीत असेल, अत्याचार करीत असेल, आपल्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणीत असेल, हिरावून घेत असेल  त्यावरही उपाय तुकोबारायांनीच दिला आहे. ' भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणो काठी' त्यामुळे आम्ही होऊन कोणाच्या वाटेला जाणार नाही. पण नाठाळ असतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ. नाठाळाच्या माथी काठीच हाणा, असे आपल्या संतांनीच आपल्याला सांगितले आहे. संतांचे विचार प्रत्यक्षात आणण्याची गरज भासू नये याचे भान भारतावर हल्ले करणा-यांनी ठेवायला हवे. तुकोबारायांच्या वचनांचे दाखले देत तुकाराम दर्शन घडविले. सरते शेवटी श्रीक्षेत्र देहू-आळंदी आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा कार्यक्रम जाहीर केला. आज महाराष्टÑात तीर्थक्षेत्रांचा विकास झाला आहे, त्याची सुरुवात अटलजींनीच केली होती. अटलजींचे तुकाराम दर्शन आणि संतांविषयी व्यक्त केलेला प्रेमभाव, ऋण मराठी जणांच्या चिरस्मरणात राहणार आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी