शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासन : त्यांचे नि यांचे, 72 हजार रुपयांच्या आश्वासनानंतरचे 'अच्छे दिन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:37 IST

आपला पक्ष सत्तेत आल्यास देशातील दारिद्र्यरेषेखालील राहणाऱ्या २० टक्के लोकांना दरवर्षी ७२ हजार रु. (दरमहा सहा हजार) देणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आश्वासन जेवढे उत्साहवर्धक तेवढेच विश्वासार्हही आहे.

आपला पक्ष सत्तेत आल्यास देशातील दारिद्र्यरेषेखालील राहणाऱ्या २० टक्के लोकांना दरवर्षी ७२ हजार रु. (दरमहा सहा हजार) देणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे आश्वासन जेवढे उत्साहवर्धक तेवढेच विश्वासार्हही आहे. ते देण्याआधी त्यांनी पक्षातील पी. चिदंबरम आणि डॉ. मनमोहन सिंग यासारख्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हे आश्वासन पूर्ण करण्याची जबाबदारी शिरावर घेतली आहे. राहुल गांधींचे नेतृत्व आणि वक्तृत्व आता हवेत उडविण्याजोगे राहिले नाही. त्याला गांभीर्य व अध्ययनाची जोड आहे. त्याचमुळे भाजपच्या मंत्र्यांनी व पुढाऱ्यांनीही ते हसण्यावर नेले नाही आणि अरुण जेटलींनाही त्यावर किडक्या भाषेखेरीज काही बोलता आले नाही. काँग्रेसच्या या आश्वासनाचा प्रभाव कमी व्हावा, यासाठीच मिशन शक्तीची घोषणा करत श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला, असाही आरोप केला गेला. भाजपची सारी आश्वासने देऊन झाली आहेत आणि त्याचे फोलपण लोकांच्या लक्षात आले आहे. मोदींचे सरकार सत्तेवर येताच प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लक्ष रुपये जमा करणार होते. त्यांचे हे आश्वासन २०१४ मधील आहे. पाच वर्षे झाली तरी ते असंभव नव्हे, तर खोटे ठरले आहे. लोकांना पैसा किंवा रोजगार देणे राहिले दूर. त्यांच्या सरकारने लोकांकडून जेवढा पैसा ज्या मार्गाने काढून घेता येईल त्या मार्गाने काढून घेतला आहे. अर्थव्यवस्थेला बदलविणे दूर, उलट या सरकारने देशाची अर्थव्यवस्था, त्याच्या बँकांसकट पार रसातळाला नेली आहे. त्यामुळे ‘आता आणखी आश्वासने देऊ नका’ असे या सरकारला सांगण्याची पाळी जनतेवर आली आहे. अर्थकारण बुडाल्यामुळे या सरकारला लष्कराचा पराक्रम, पुलवामातील हल्ला आणि क्षेपणास्त्रातील यश या सामान्य माणसांना केवळ खोटे समाधान देऊ शकणाºया गोष्टींच्या प्रचार-प्रसारावर भर द्यावा लागत आहे. पराक्रम लष्कराचा आणि प्रचार मात्र संघाचा, क्षेपणास्त्रे शास्त्रज्ञांची आणि राजकारण मात्र भाजपाचे. पुलवामामधील मरण सैनिकांचे आणि त्यांच्या हौतात्म्याचे टिळे मात्र मोदी-शहा यांच्या माथ्यावर अशी स्थिती आहे. मात्र जनता भोळी नाही. तिला सत्य आणि भ्रम यातील फरक कळतो. करणारे कोण आणि त्याचा लाभ घेणारे कोण, हेही तिला समजते. त्यामुळे सैनिकांना सारा देश सलाम करीत असताना त्या मानवंदनेचे आपणच केवळ मानकरी आहोत, याचा संघ परिवाराने आणलेला आव ढोंग या सदरात जमा होणारा आहे, हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अर्थतज्ज्ञांना विश्वासात घेऊन राहुल गांधींनी देशातील गरिबांना जे हिशेबी आश्वासन दिले ते महत्त्वाचे ठरणारे आहे. त्यांच्या या आश्वासनाचा पाठपुरावा रिझर्व्ह बँँकेचे माजी गव्हर्नर व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनीही केला आहे. याआधी ‘ज्या राज्यांत आमची सरकारे येतील त्या राज्यांतील शेतकऱ्यांवरील कर्ज दहा दिवसांच्या आत माफ करू,’ असे वचन राहुल गांधींनी दिले होते. त्या वेळी छत्तीसगड, मध्य प्रदेश व राजस्थान या तीन राज्यांत त्यांची सरकारे आली. त्या सरकारांनी राहुल गांधींचा शब्द खरा करीत अवघ्या दहा दिवसांत आपापल्या शेतकºयांना कर्जमुक्त केले. भाजपाची सरकारेही अनेक राज्यांत आहेत. त्यांनीही शेतकºयांना अशी आश्वासने आरंभी दिली. परंतु महाराष्टÑासह एकाही राज्यात त्यांनी ती पूर्ण केली नाही. ही आश्वासने पूर्ण करण्याच्या योजना जाहीर करताना त्यात एवढ्या अटी घालण्यात आल्या, की त्यामुळे ज्यांना तिचा लाभ मिळायला हवा होता, ते त्यापासून वंचित राहिले. शेतकरी नाडला गेला. शेतमालाचा भाव घसरत गेला. नोटाबंदीनंतर हातावर पोट असलेला कामगार देशोधडीला लागला. आपल्या अर्थकारणातून भाजपाने श्रीमंतांनाच अधिक श्रीमंत केले. अंबानी, अदानी यांना नवी व मोठी कंत्राटे दिली आणि मल्ल्यापासून नीरव मोदीपर्यंतच्या बड्या चोरांना देशाबाहेर पळून जाता येईल अशी व्यवस्था केली. राहुल गांधींचे खरेपण व त्यांच्या आश्वासनामधील विश्वासार्हता भाजपच्या या नाकर्त्या पार्श्वभूमीवर पाहिले पाहिजे व या देशातील गरीब तसेच मध्यमवर्गीयांचे खरे पाठीराखे कोण, हेही लक्षात घेतले पाहिजे.मोदींचे सरकार सत्तेवर येताच प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लक्ष रुपये जमा करणार होते. पाच वर्षे झाली तरी ते असंभव नव्हे तर खोटे ठरले आहे. लोकांना पैसा वा रोजगार देणे राहिले दूर. लोकांकडून जेवढा पैसा काढून घेता येईल त्या मार्गाने काढला गेला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी