शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: ... खरंच यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 08:30 IST

रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली.

- रोहित नाईक

रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली. याआधी ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ६५ पदके पटकावलेली, तर यंदा भारतीय खेळाडूंनी एकूण पदकसंख्या ६९ केली. भारतीय खेळाडूंचे कौतुक होत असून ते झालेही पाहिजे, परंतु त्याचवेळी आपण अजूनही बरेच मागे आहोत याचे भानही राहणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत पहिल्या तीन स्थानांमध्ये भारत कसा स्थान पटकावेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने चीन आणि भारत यांचा जगात पहिल्या दोन स्थानांमध्ये क्रमांक लागतो. मात्र असे असले, तरी या दोन देशांमधील क्रीडा प्रगतीमध्ये कमालीचा फरक जाणवेल. १९५१ सालापासून सुरू झालेल्या आशियाई स्पर्धेचे सर्वप्रथम यजमानपद भूषविले ते, भारताने. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या सर्व १८ सत्रांमध्ये सहभाग घेतला. यातील पहिल्या सत्रात मिळविलेले दुसरे स्थान आणि १९६२ साली जकार्ता येथेच मिळविलेले तिसरे स्थान या कामगिरीचा अपवाद वगळता भारतीय संघाला एकदाही अव्वल तीनमध्ये स्थान पटकाविता आले नाही. त्याचवेळी तेहरान येथे १९७४ साली झालेल्या सत्रामध्ये चीनने आशियाई स्पर्धेत पदार्पण केले. पदार्पणातच एकूण पदकसंख्या १०६ करताना चीनने आपल्या भविष्यातील वर्चस्वाचा इशारा दिला. यानंतर १९८२ साली नवी दिल्लीत झालेली आशियाई स्पर्धा चीनची केवळ तिसरी स्पर्धा होती आणि यामध्ये त्यांनी तब्बल ६१ सुवर्ण जिंकून एकूण १५३ पदकांसह पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले. यासह त्यांनी आशियाई स्पर्धेतील जपान व कोरिया यांचे असलेले वर्चस्वही मोडले. दखल घेण्याची बाब म्हणजे त्यानंतर चीनने आपले अव्वल स्थान कधीही सोडले नाही. २०१० साली ग्वांग्झू स्पर्धेत भारतीय आपली सर्वोत्तम कामगिरी झाल्याचे दाखले देत असताना याच स्पर्धेत चीनने कोणालाही हेवा वाटेल अशी कामगिरी करत १९९ सुवर्णपदकांची घसघशीत कमाई करत तब्बल ४१६ पदकांवर कब्जा केला. यावरूनच चीनची क्रीडा प्रगती लक्षात येते. त्यामुळेच प्रश्न पडतो की, खरंच यंदाची स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का? एकीकडे चीन दरवेळी आपला दबदबा राखत असताना दुसरीकडे, भारताला अव्वल ५ देशांमध्ये स्थान मिळवितानाही झगडावे लागत आहे. आतापर्यंत केवळ ७ वेळा भारताने अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळवले. यंदा भारतीय संघाने अशी कामगिरी केली असती, पण हॉकी, कबड्डी अशा हक्कांच्या स्पर्धांशिवाय काही स्पर्धांमध्ये थोडक्यात हुकलेल्या सुवर्णपदकांचा फटका आपल्याला बसला. मुळात कोणत्या खेळातील चुकांमुळे आपण मागे पडलो किंवा कुठे आपण कमी पडलो, यावर विचारविनिमय करण्यात आता अर्थही उरला नाही. आता गरज आहे ती, क्रीडा क्रांती घडविण्याची आणि यासाठी गरज आहे ती गुणवान खेळाडूंची फळी निर्माण करण्याची. आज चीन केवळ आशियाई स्पर्धाच नव्हे, तर आॅलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धेत अमेरिका, रशिया यांसारख्या महासत्तांना मागे टाकत आहे. हे यश चीनने कसे मिळविले यावर अनेकदा चर्चा झाली. नुसती चर्चाच नाही, तर अभ्यासही झाला. पण प्रत्यक्षात कृती मात्र कधीच झाली नाही आणि त्याचेच परिणाम अजूनही आपल्याला भोगावे लागत आहेत.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा