शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

Asian Games 2018: ... खरंच यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 08:30 IST

रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली.

- रोहित नाईक

रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली. याआधी ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ६५ पदके पटकावलेली, तर यंदा भारतीय खेळाडूंनी एकूण पदकसंख्या ६९ केली. भारतीय खेळाडूंचे कौतुक होत असून ते झालेही पाहिजे, परंतु त्याचवेळी आपण अजूनही बरेच मागे आहोत याचे भानही राहणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत पहिल्या तीन स्थानांमध्ये भारत कसा स्थान पटकावेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने चीन आणि भारत यांचा जगात पहिल्या दोन स्थानांमध्ये क्रमांक लागतो. मात्र असे असले, तरी या दोन देशांमधील क्रीडा प्रगतीमध्ये कमालीचा फरक जाणवेल. १९५१ सालापासून सुरू झालेल्या आशियाई स्पर्धेचे सर्वप्रथम यजमानपद भूषविले ते, भारताने. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या सर्व १८ सत्रांमध्ये सहभाग घेतला. यातील पहिल्या सत्रात मिळविलेले दुसरे स्थान आणि १९६२ साली जकार्ता येथेच मिळविलेले तिसरे स्थान या कामगिरीचा अपवाद वगळता भारतीय संघाला एकदाही अव्वल तीनमध्ये स्थान पटकाविता आले नाही. त्याचवेळी तेहरान येथे १९७४ साली झालेल्या सत्रामध्ये चीनने आशियाई स्पर्धेत पदार्पण केले. पदार्पणातच एकूण पदकसंख्या १०६ करताना चीनने आपल्या भविष्यातील वर्चस्वाचा इशारा दिला. यानंतर १९८२ साली नवी दिल्लीत झालेली आशियाई स्पर्धा चीनची केवळ तिसरी स्पर्धा होती आणि यामध्ये त्यांनी तब्बल ६१ सुवर्ण जिंकून एकूण १५३ पदकांसह पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले. यासह त्यांनी आशियाई स्पर्धेतील जपान व कोरिया यांचे असलेले वर्चस्वही मोडले. दखल घेण्याची बाब म्हणजे त्यानंतर चीनने आपले अव्वल स्थान कधीही सोडले नाही. २०१० साली ग्वांग्झू स्पर्धेत भारतीय आपली सर्वोत्तम कामगिरी झाल्याचे दाखले देत असताना याच स्पर्धेत चीनने कोणालाही हेवा वाटेल अशी कामगिरी करत १९९ सुवर्णपदकांची घसघशीत कमाई करत तब्बल ४१६ पदकांवर कब्जा केला. यावरूनच चीनची क्रीडा प्रगती लक्षात येते. त्यामुळेच प्रश्न पडतो की, खरंच यंदाची स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का? एकीकडे चीन दरवेळी आपला दबदबा राखत असताना दुसरीकडे, भारताला अव्वल ५ देशांमध्ये स्थान मिळवितानाही झगडावे लागत आहे. आतापर्यंत केवळ ७ वेळा भारताने अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळवले. यंदा भारतीय संघाने अशी कामगिरी केली असती, पण हॉकी, कबड्डी अशा हक्कांच्या स्पर्धांशिवाय काही स्पर्धांमध्ये थोडक्यात हुकलेल्या सुवर्णपदकांचा फटका आपल्याला बसला. मुळात कोणत्या खेळातील चुकांमुळे आपण मागे पडलो किंवा कुठे आपण कमी पडलो, यावर विचारविनिमय करण्यात आता अर्थही उरला नाही. आता गरज आहे ती, क्रीडा क्रांती घडविण्याची आणि यासाठी गरज आहे ती गुणवान खेळाडूंची फळी निर्माण करण्याची. आज चीन केवळ आशियाई स्पर्धाच नव्हे, तर आॅलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धेत अमेरिका, रशिया यांसारख्या महासत्तांना मागे टाकत आहे. हे यश चीनने कसे मिळविले यावर अनेकदा चर्चा झाली. नुसती चर्चाच नाही, तर अभ्यासही झाला. पण प्रत्यक्षात कृती मात्र कधीच झाली नाही आणि त्याचेच परिणाम अजूनही आपल्याला भोगावे लागत आहेत.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा