शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Asian Games 2018: ... खरंच यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 08:30 IST

रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली.

- रोहित नाईक

रविवारी झालेल्या दिमाखदार समारोप सोहळ्याद्वारे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची यशस्वी सांगता झाली. स्पर्धा इतिहासावर नजर टाकल्यास भारताने यंदा आपल्या कामगिरीत कमालीची सुधारणा करत सर्वाधिक पदके जिंकली. याआधी ग्वांग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने ६५ पदके पटकावलेली, तर यंदा भारतीय खेळाडूंनी एकूण पदकसंख्या ६९ केली. भारतीय खेळाडूंचे कौतुक होत असून ते झालेही पाहिजे, परंतु त्याचवेळी आपण अजूनही बरेच मागे आहोत याचे भानही राहणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत पहिल्या तीन स्थानांमध्ये भारत कसा स्थान पटकावेल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सर्वाधिक लोकसंख्येच्या दृष्टीने चीन आणि भारत यांचा जगात पहिल्या दोन स्थानांमध्ये क्रमांक लागतो. मात्र असे असले, तरी या दोन देशांमधील क्रीडा प्रगतीमध्ये कमालीचा फरक जाणवेल. १९५१ सालापासून सुरू झालेल्या आशियाई स्पर्धेचे सर्वप्रथम यजमानपद भूषविले ते, भारताने. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंतच्या सर्व १८ सत्रांमध्ये सहभाग घेतला. यातील पहिल्या सत्रात मिळविलेले दुसरे स्थान आणि १९६२ साली जकार्ता येथेच मिळविलेले तिसरे स्थान या कामगिरीचा अपवाद वगळता भारतीय संघाला एकदाही अव्वल तीनमध्ये स्थान पटकाविता आले नाही. त्याचवेळी तेहरान येथे १९७४ साली झालेल्या सत्रामध्ये चीनने आशियाई स्पर्धेत पदार्पण केले. पदार्पणातच एकूण पदकसंख्या १०६ करताना चीनने आपल्या भविष्यातील वर्चस्वाचा इशारा दिला. यानंतर १९८२ साली नवी दिल्लीत झालेली आशियाई स्पर्धा चीनची केवळ तिसरी स्पर्धा होती आणि यामध्ये त्यांनी तब्बल ६१ सुवर्ण जिंकून एकूण १५३ पदकांसह पदकतालिकेत पहिले स्थान पटकावले. यासह त्यांनी आशियाई स्पर्धेतील जपान व कोरिया यांचे असलेले वर्चस्वही मोडले. दखल घेण्याची बाब म्हणजे त्यानंतर चीनने आपले अव्वल स्थान कधीही सोडले नाही. २०१० साली ग्वांग्झू स्पर्धेत भारतीय आपली सर्वोत्तम कामगिरी झाल्याचे दाखले देत असताना याच स्पर्धेत चीनने कोणालाही हेवा वाटेल अशी कामगिरी करत १९९ सुवर्णपदकांची घसघशीत कमाई करत तब्बल ४१६ पदकांवर कब्जा केला. यावरूनच चीनची क्रीडा प्रगती लक्षात येते. त्यामुळेच प्रश्न पडतो की, खरंच यंदाची स्पर्धा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरली का? एकीकडे चीन दरवेळी आपला दबदबा राखत असताना दुसरीकडे, भारताला अव्वल ५ देशांमध्ये स्थान मिळवितानाही झगडावे लागत आहे. आतापर्यंत केवळ ७ वेळा भारताने अव्वल पाच देशांमध्ये स्थान मिळवले. यंदा भारतीय संघाने अशी कामगिरी केली असती, पण हॉकी, कबड्डी अशा हक्कांच्या स्पर्धांशिवाय काही स्पर्धांमध्ये थोडक्यात हुकलेल्या सुवर्णपदकांचा फटका आपल्याला बसला. मुळात कोणत्या खेळातील चुकांमुळे आपण मागे पडलो किंवा कुठे आपण कमी पडलो, यावर विचारविनिमय करण्यात आता अर्थही उरला नाही. आता गरज आहे ती, क्रीडा क्रांती घडविण्याची आणि यासाठी गरज आहे ती गुणवान खेळाडूंची फळी निर्माण करण्याची. आज चीन केवळ आशियाई स्पर्धाच नव्हे, तर आॅलिम्पिकसारख्या सर्वोच्च स्पर्धेत अमेरिका, रशिया यांसारख्या महासत्तांना मागे टाकत आहे. हे यश चीनने कसे मिळविले यावर अनेकदा चर्चा झाली. नुसती चर्चाच नाही, तर अभ्यासही झाला. पण प्रत्यक्षात कृती मात्र कधीच झाली नाही आणि त्याचेच परिणाम अजूनही आपल्याला भोगावे लागत आहेत.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा