शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

‘आनंदयात्री’ हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 4:31 AM

गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ते मराठी असले, तरी मराठी भाषक नव्हते.

गेली ६० वर्षे मराठी भावसंगीतावर अधिराज्य गाजविणारे लोकप्रिय गायक अरुण दाते रविवारी कालवश झाले. त्यांच्या रूपाने जी. एन. जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके या मराठी भावगीतांच्या सुवर्ण पर्वातील आणखी एक तारा निखळून पडला आहे. दाते यांचे वैशिष्ट्य असे की, ते मराठी असले, तरी मराठी भाषक नव्हते. त्यांच्या घरात रसिकतेची परंपरा असली, तरी गायनाची परंपरा नव्हती. मात्र, अरुण दातेंचे भाग्य एवढे थोर होते की, त्यांना त्यांच्या आयुष्यातील पहिले गाणे खुद्द कुमार गंधर्वांनी शिकविले. एकदा कुमार त्यांना म्हणाले, तू फार छान गुणगुणतोस, तुझा आवाजही चांगला आहे. चल मी तुला गाणे शिकवितो. कुमारांनी त्यांना उर्दू गझल म्हणायला शिकविली. आयुष्यात त्यांनी गायलेली ती पहिली गझल. बिरला समूहातील बड्या कंपनीच्या उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळीत असताना, त्यांनी भावगीत गायनाचे अनोखे पर्व साकार केले होते. जेव्हा नोकरी की भावगीत गायन, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय तत्काळ घेऊन टाकला आणि नोकरीतून मिळणाऱ्या दरमहा ३० हजार रुपये पगाराच्या अनेक पटीने अधिक पैसा आपल्या गायनाच्या कार्यक्रमातून सातत्याने मिळविला. त्यांनी कधीही दुसºया गायकाची गाणी गायली नाहीत, हे त्यांचे अनोखे वैशिष्ट्य होते. कमालीची कृतज्ञता आणि नम्रता हा त्यांचा स्थायी भाव होता. जी. एन. जोशी यांनी मराठी भावगीताची परंपरा निर्माण केली, तिच्यामुळेच आपण यशस्वी ठरलो, या कृतज्ञभावापोटी त्यांनी पदरचे ८५ हजार रुपये खर्चून, जोशी यांचा ८५वा वाढदिवस साजरा केला होता. बिरला समूहातील उपाध्यक्षपदाची नोकरी सोडल्यानंतर, मिळालेल्या पीएफ आणि गॅ्रच्युईटीच्या घसघशीत रकमेतून गीतकार पाडगावकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे व यशवंत देव यांना, एक-एक लाख रुपये कृतज्ञतेपोटी घरी जाऊन अर्पण करण्याचे दातृत्व केवळ दातेच दाखवू शकत होते. मराठी भावगीतात दोनच गायक उच्च विद्या विभूषित होते. एक अरुण दाते, जे मॅकेनिकल इंजिनीअर व्हिजेटीआयमधून झाले होते आणि दुसरे श्रीधर फडके. गेली काही वर्षे अरुण दाते यांना स्मृतिभं्रशाच्या विकाराने ग्रासले होते. त्यामुळे ते रुग्णशय्येला खिळलेले होते. आयुष्यात सगळी सुखे त्यांनी प्राप्त केली होती. त्यांचे आयुष्य तृप्ततेने भरलेले होते. त्यामुळेच निद्रावस्थेतच त्यांना मृत्यू आला. कलावंताचे शालीनतेचे व सुसंस्कृत असे आयुष्य कसे असावे, याचा वस्तुपाठ म्हणजेत्यांचे आयुष्य होते. त्यांच्यासारखा भावगीत गायक पुन्हाहोणार नाही.

टॅग्स :arun datearun datemarathiमराठीmusicसंगीत