शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

कलातपस्वी हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 5:38 AM

मंगळवारी पहाटे वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाल्याने वारली चित्रकलेचा व्रतस्थ साधक हरपला आहे.

मंगळवारी पहाटे वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाल्याने वारली चित्रकलेचा व्रतस्थ साधक हरपला आहे. जी कला शतकानुशतके वारली समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतीच आविष्कृत होत होती, जिचा परिचय बाहेरच्या जगाला फारसा होत नव्हता, अशा कलेला त्यांनी संपूर्ण जगासमोर नेले. तिला लोकप्रिय केले. ही त्यांची कामगिरी लोकोत्तर म्हणावी अशी आहे. कमरेला एक धुडूत नेसलेले, विस्कटलेले केस अशा अवस्थेत त्यांनी आयुष्यभर या कलेची साधना केली. परंतु त्यांचा हा पारंपरिक अवतार या कलेला महान बनविण्याच्या प्रयत्नांच्या आड कधीही आला नाही. त्यांना जर ‘पद्मश्री’ दिली तर ते अशाच अवतारात ती स्वीकारायला येतील; म्हणून ती त्यांना नाकारण्याचा प्रयत्न झाला होता. ब्रिटिश शासनकर्त्यांपुढे भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेले ज्योतिबा फुले मुंडासं, शर्ट आणि धोतर अशाच वेषात मुद्दाम गेले होेते. भारतीयांच्या समस्या मांडताना महात्मा गांधी हे ब्रिटिशांच्या राजदरबारात आणि संसदेत पंचा नेसूनच गेले होते. याचा विसर या महाभागांना पडला असावा. शेवटी या चिल्लर अडचणींवर मात करून त्यांना पद्मश्री मिळाली. राष्टÑपतींचा पुरस्कारही त्यांना लाभला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही प्रसिद्धी आणि सन्मान यांची हाव धरली नाही. माझ्या कलेत दम असेल तर तिचे रसिक तिला शोधत माझ्या दाराशी येतील असा सार्थ अभिमान त्यांना होता. प्रख्यात कलासमीक्षक कुलकर्णी हे प्रत्येकवेळी त्यांच्या पाठीशी उभे राहिले; आणि म्हसे यांची कला त्यांनी जगापुढे आणली. एवढा सन्मान मिळाला. ब्रिटन, अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स या देशांत त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली. त्यानंतर त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तीन एकर जमीन त्यांच्या कलासाधनेसाठी देण्याचे मान्य केले. परंतु इथल्या दळभद्री शासनाने आणि प्रशासनाने २७ वर्षे ते आश्वासन पूर्ण होऊ दिले नाही. त्यासाठी राहुल गांधींची भेट होण्याची प्रतीक्षा त्यांना करावी लागली. त्यांनी लक्ष घातल्यानंतरही अंगावर तुकडा भिरकावल्यासारखी त्यांना जमीन दिली. त्यातही अनेक बखेडे होते. शेवटी त्यातील एक एकर जमीन कशीबशी त्यांना मिळाली. लोकोत्तर कलावंताला राजाश्रय मिळाला तरी त्याची कशी फरफट शासन आणि प्रशासन करते याचे हे विदारक उदाहरण होते. यापुढे तरी शासन आणि प्रशासनाला सद्बुद्धी सुचेल व ते कलावंतांप्रति अधिक संवेदनशील होतील, अशी अपेक्षा आहे. ते तसे झाले तर ती म्हसे यांना मोठी आदरांजली ठरेल.