शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

कलातपस्वी हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:38 IST

मंगळवारी पहाटे वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाल्याने वारली चित्रकलेचा व्रतस्थ साधक हरपला आहे.

मंगळवारी पहाटे वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाल्याने वारली चित्रकलेचा व्रतस्थ साधक हरपला आहे. जी कला शतकानुशतके वारली समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतीच आविष्कृत होत होती, जिचा परिचय बाहेरच्या जगाला फारसा होत नव्हता, अशा कलेला त्यांनी संपूर्ण जगासमोर नेले. तिला लोकप्रिय केले. ही त्यांची कामगिरी लोकोत्तर म्हणावी अशी आहे. कमरेला एक धुडूत नेसलेले, विस्कटलेले केस अशा अवस्थेत त्यांनी आयुष्यभर या कलेची साधना केली. परंतु त्यांचा हा पारंपरिक अवतार या कलेला महान बनविण्याच्या प्रयत्नांच्या आड कधीही आला नाही. त्यांना जर ‘पद्मश्री’ दिली तर ते अशाच अवतारात ती स्वीकारायला येतील; म्हणून ती त्यांना नाकारण्याचा प्रयत्न झाला होता. ब्रिटिश शासनकर्त्यांपुढे भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेले ज्योतिबा फुले मुंडासं, शर्ट आणि धोतर अशाच वेषात मुद्दाम गेले होेते. भारतीयांच्या समस्या मांडताना महात्मा गांधी हे ब्रिटिशांच्या राजदरबारात आणि संसदेत पंचा नेसूनच गेले होते. याचा विसर या महाभागांना पडला असावा. शेवटी या चिल्लर अडचणींवर मात करून त्यांना पद्मश्री मिळाली. राष्टÑपतींचा पुरस्कारही त्यांना लाभला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही प्रसिद्धी आणि सन्मान यांची हाव धरली नाही. माझ्या कलेत दम असेल तर तिचे रसिक तिला शोधत माझ्या दाराशी येतील असा सार्थ अभिमान त्यांना होता. प्रख्यात कलासमीक्षक कुलकर्णी हे प्रत्येकवेळी त्यांच्या पाठीशी उभे राहिले; आणि म्हसे यांची कला त्यांनी जगापुढे आणली. एवढा सन्मान मिळाला. ब्रिटन, अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स या देशांत त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली. त्यानंतर त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तीन एकर जमीन त्यांच्या कलासाधनेसाठी देण्याचे मान्य केले. परंतु इथल्या दळभद्री शासनाने आणि प्रशासनाने २७ वर्षे ते आश्वासन पूर्ण होऊ दिले नाही. त्यासाठी राहुल गांधींची भेट होण्याची प्रतीक्षा त्यांना करावी लागली. त्यांनी लक्ष घातल्यानंतरही अंगावर तुकडा भिरकावल्यासारखी त्यांना जमीन दिली. त्यातही अनेक बखेडे होते. शेवटी त्यातील एक एकर जमीन कशीबशी त्यांना मिळाली. लोकोत्तर कलावंताला राजाश्रय मिळाला तरी त्याची कशी फरफट शासन आणि प्रशासन करते याचे हे विदारक उदाहरण होते. यापुढे तरी शासन आणि प्रशासनाला सद्बुद्धी सुचेल व ते कलावंतांप्रति अधिक संवेदनशील होतील, अशी अपेक्षा आहे. ते तसे झाले तर ती म्हसे यांना मोठी आदरांजली ठरेल.