शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कलातपस्वी हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:38 IST

मंगळवारी पहाटे वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाल्याने वारली चित्रकलेचा व्रतस्थ साधक हरपला आहे.

मंगळवारी पहाटे वारली चित्रकार जिव्या सोम्या म्हसे यांचे निधन झाल्याने वारली चित्रकलेचा व्रतस्थ साधक हरपला आहे. जी कला शतकानुशतके वारली समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांपुरतीच आविष्कृत होत होती, जिचा परिचय बाहेरच्या जगाला फारसा होत नव्हता, अशा कलेला त्यांनी संपूर्ण जगासमोर नेले. तिला लोकप्रिय केले. ही त्यांची कामगिरी लोकोत्तर म्हणावी अशी आहे. कमरेला एक धुडूत नेसलेले, विस्कटलेले केस अशा अवस्थेत त्यांनी आयुष्यभर या कलेची साधना केली. परंतु त्यांचा हा पारंपरिक अवतार या कलेला महान बनविण्याच्या प्रयत्नांच्या आड कधीही आला नाही. त्यांना जर ‘पद्मश्री’ दिली तर ते अशाच अवतारात ती स्वीकारायला येतील; म्हणून ती त्यांना नाकारण्याचा प्रयत्न झाला होता. ब्रिटिश शासनकर्त्यांपुढे भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेले ज्योतिबा फुले मुंडासं, शर्ट आणि धोतर अशाच वेषात मुद्दाम गेले होेते. भारतीयांच्या समस्या मांडताना महात्मा गांधी हे ब्रिटिशांच्या राजदरबारात आणि संसदेत पंचा नेसूनच गेले होते. याचा विसर या महाभागांना पडला असावा. शेवटी या चिल्लर अडचणींवर मात करून त्यांना पद्मश्री मिळाली. राष्टÑपतींचा पुरस्कारही त्यांना लाभला. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही प्रसिद्धी आणि सन्मान यांची हाव धरली नाही. माझ्या कलेत दम असेल तर तिचे रसिक तिला शोधत माझ्या दाराशी येतील असा सार्थ अभिमान त्यांना होता. प्रख्यात कलासमीक्षक कुलकर्णी हे प्रत्येकवेळी त्यांच्या पाठीशी उभे राहिले; आणि म्हसे यांची कला त्यांनी जगापुढे आणली. एवढा सन्मान मिळाला. ब्रिटन, अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स या देशांत त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली. त्यानंतर त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तीन एकर जमीन त्यांच्या कलासाधनेसाठी देण्याचे मान्य केले. परंतु इथल्या दळभद्री शासनाने आणि प्रशासनाने २७ वर्षे ते आश्वासन पूर्ण होऊ दिले नाही. त्यासाठी राहुल गांधींची भेट होण्याची प्रतीक्षा त्यांना करावी लागली. त्यांनी लक्ष घातल्यानंतरही अंगावर तुकडा भिरकावल्यासारखी त्यांना जमीन दिली. त्यातही अनेक बखेडे होते. शेवटी त्यातील एक एकर जमीन कशीबशी त्यांना मिळाली. लोकोत्तर कलावंताला राजाश्रय मिळाला तरी त्याची कशी फरफट शासन आणि प्रशासन करते याचे हे विदारक उदाहरण होते. यापुढे तरी शासन आणि प्रशासनाला सद्बुद्धी सुचेल व ते कलावंतांप्रति अधिक संवेदनशील होतील, अशी अपेक्षा आहे. ते तसे झाले तर ती म्हसे यांना मोठी आदरांजली ठरेल.