शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
3
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
4
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
5
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
6
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
7
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
8
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
9
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
10
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
11
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
12
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
13
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
14
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
15
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
16
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
17
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
18
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
19
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
20
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली

लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 08:59 IST

मुळात वाढणारी महागाई कोणत्याही प्रकारच्या महागाई निर्देशांकात प्रतिबिंबित होत नाही. प्रत्यक्षात ती जास्त असते.

- ॲड. कांतीलाल तातेड (अर्थशास्त्राचे अभ्यासक)स्टेट बँक ऑफ इंडिया १० कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या बचत खात्यांवर २.७० टक्के, तर १० कोटी रुपयांपेक्षा जास्त शिल्लक असणाऱ्या बचत खात्यांवर ३ टक्के दराने व्याज देत असे; परंतु १५ जूनपासून स्टेट बँकेने सर्व बचत खात्यांवरील व्याजदर २.५० टक्के केला आहे. एचडीएफसी बँकेमागोमाग इतर बँकाही बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे.

देशातील सर्व बँकांतील बचत खात्यांमध्ये ७० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा असून त्यापैकी २० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम महिलांच्या बचत खात्यात जमा आहे. मे २०२५ मध्ये किरकोळ महागाईचा दर २.८२ टक्के होता. तर बचत खात्यावर मिळणारे व्याज महागाईच्या दरापेक्षाही कमी आहे. हे योग्य आहे का?

गरिबातल्या गरिबाने भविष्यासाठी थोडी-थोडी का होईना बचत करावी, यासाठी बचतीवर आकर्षक व्याज देऊन घरगुती बचतीचे प्रमाण वाढवावे हा बचत खाती सुरू करण्यामागचा मूळ उद्देश. २० ऑगस्ट, १९९३ पूर्वी बचत खात्यावर ६ टक्के दराने व्याज दिले जात होते. आता मात्र उद्योगपतींना स्वस्त दराने कर्जे मिळावीत, बँकांच्या नफ्यात वाढ व्हावी, हा मुख्य उद्देश झाला आहे.

वाढणारी महागाई, रुपयाचा होणारा मूल्यऱ्हास यांसारख्या आर्थिक निकषांच्या आधारे व्याजदर निर्धारित करणे आवश्यक असते. वाढत्या महागाईमुळे गुंतवणुकीचे वास्तव मूल्य वेगाने कमी झाल्याने गुंतवणूक करण्यामागील मूळ हेतूच विफल होतो. व्याजदर निश्चित करताना गुंतवणूक योजनेचा मूळ उद्देशही लक्षात घेणे आवश्यक असते. आपल्या देशात गुंतवणुकीपासून मिळणारे व्याजाचे उत्पन्न हेच कोट्यवधी लोकांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असते, हेही येथे महत्त्वाचे. 

२०२५ चा किरकोळ महागाईचा निर्देशांक २.८२ टक्के आहे.  बचत खात्याचे व्याजदर  त्यापेक्षा जास्त असावयास हवेत; परंतु स्टेट बँकेने उलट त्यात कपात केली आहे. प्राप्तिकराचा विचार केला तर १० टक्क्यांच्या टप्प्यात करपात्र उत्पन्न असणाऱ्या गुंतवणूकदारांना २.२४ टक्के, २० टक्क्यांच्या टप्प्यात असणाऱ्यांना १.९८ टक्के, तर ३० टक्क्यांच्या टप्प्यातील गुंतवणूकदारांना १.७२ टक्केच व्याजदर पडतो. त्यामुळे  बचत खात्यातील गुंतवणुकीवर उत्पन्न तर सोडाच, प्रत्यक्षात मुद्दलातच मोठ्या प्रमाणात घट होत असते.

‘आजकी बचत, कलका उजाला’ असे म्हणतात. प्रत्यक्षात मुद्दलातच वेगाने होणारी घट पाहता ‘आजकी बचत, कलका अंधेराही अंधेरा’ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मुळात वाढणारी महागाई कोणत्याही प्रकारच्या महागाई निर्देशांकात प्रतिबिंबित होत नाही. प्रत्यक्षात ती जास्त असते. महागाईचा दर २.८२ झाला याचा अर्थ महागाई कमी झाली असा नव्हे, तर महागाई वाढण्याचा वेग त्या महिन्यात कमी झालेला असतो. उदा. एप्रिल १९८७ मध्ये बचत खात्यावर ६ टक्के व्याज मिळत होते. त्यावेळी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ६९१ होता. आता मार्च २०२५ मध्ये तो ९४००.६२ इतका आहे. म्हणजेच केवळ महागाई निर्देशांकाचा विचार केला तरी या कालावधीत महागाईमध्ये १३.६० पटींनी वाढ झालेली आहे. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला या आधारावर गुंतवणुकीवरील व्याजदर कमी करणे अन्यायकारक असते. त्यामुळे महागाईचा दर जर २.८२ टक्के आहे. तर बचत खात्यातील गुंतवणुकीच्या व्याजदरात कपात करून ते २.५०टक्के करणे अन्यायकारकच आहे.kantilaltated@gmail.com

टॅग्स :bankबँकInvestmentगुंतवणूकBanking Sectorबँकिंग क्षेत्रReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक