शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक!
2
मुंबईत मनसेला भगदाड, भाजपापाठोपाठ शिंदेसेनेचाही धक्का; प्रवक्त्यांसह नेत्यांचा पक्षाला रामराम
3
१० वर्षांत बना 'करोडपती'! दरमहा SIP द्वारे १ कोटींचा निधी उभारण्याचे गणित; किती करावी लागेल गुंतवणूक?
4
तुम्ही बुरखा घालून मागच्या दाराने विधानसभेत गेलात; रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
5
'व्हेनेझुएलासारखी परिस्थिती भारतातही उद्भवू शकते'; अमेरिकेच्या कारवाईवर काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठे विधान
6
'हिंदूंची हत्या ही एक किरकोळ घटना'; बांगलादेशी नेत्याचे धक्कादायक विधान
7
‘राजसाहेब तहात हरले, कुटुंबं एकत्र करण्यासाठी मनसेचा बळी दिला’, संतोष धुरींचा सनसनाटी दावा 
8
रील पाहता पाहता श्वास थांबला, पलंगावर बसलेल्या १० वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
9
मुकेश अंबानींच्या 'या' स्टॉकमध्ये दिसली गेल्या ८ महिन्यांतील सर्वाधिक घसरण, काय आहे शेअर आपटण्यामागचं कारण?
10
Vijay Hazare Trophy : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी गिल फ्लॉप; श्रेयस अय्यरनं हिट शोसह दाखवला आपला फिटनेस
11
VIDEO: "निघ नाहीतर गोळी घालेन..."; सीमेवर व्हिडीओ काढणाऱ्या बांगलादेशींना BSF जवानाचा इशारा
12
"तुम्हालाच नाईलाजाने आमची विचाराधारा स्वीकारावी लागतेय, हेच सत्य", आशिष शेलारांना अमोल मिटकरींचे खडेबोल
13
ईपीएफओ पेन्शनधारकांचे अच्छे दिन! किमान पेन्शनमध्ये ५ पटीने वाढ होण्याची शक्यता
14
ना एशियन पेंट्स, ना बर्जर! राष्ट्रपती भवन ते हावडा ब्रिजपर्यंत सगळे रंगवले; 'ही' आहे सर्वात जुनी कंपनी
15
'मोदी-शाह की कब्र...' JNU मध्ये विद्यार्थ्यांची वादग्रस्त घोषणाबाजी; भाजपचा जोरदार पलटवार...
16
Viral Video: ट्यूशनवरून परतणाऱ्या मुलींचा पाठलाग आणि अश्लील कमेंट्स; कुठे घडला 'हा' संतापजनक प्रकार?
17
सगळं असूनही मन अस्वस्थ का? मी आनंदी का नाही? वाचा चाळीशीनंतर पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं!
18
६ महिन्यांमध्ये १ लाखांचे केले ४ लाख; आजही जोरदार वाढ, कंडोम तयार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये का आली तेजी?
19
भारतीयांसाठी 'लॉटरी'! १ लाख रुपयांचे होतील ७५ लाख; दक्षिण अमेरिकेतील 'या' देशात राजेशाही थाटात जगाल
20
व्हेनेजुएलातील तेलाने अमेरिका मालामाल होणार; पाकिस्तानच्या GDP पेक्षा 30 पट अन् भारताच्या...
Daily Top 2Weekly Top 5

लेख: बिबट्यांवर चिडलेली माणसे आणि वनखात्यापुढला पेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:36 IST

गावागावांत, शहराच्या लोकवस्तीत शिरणारे बिबटे ‘वनतारा’त किंवा परराज्यात पाठवणे, बिबट्यांची नसबंदी करणे असे उपाय चर्चेत आहेत. पण, तेवढ्याने भागेल?

सुधीर लंके निवासी संपादक, लोकमत, अहिल्यानगरबिबट्यांनी आपल्यावर हल्ला करू नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गळ्यात टोकदार पट्टे घातले आहेत. असे पट्टे शेतकरी आजवर पाळीव प्राण्यांच्या गळ्यात घालत होते. महिलाही मंगळसूत्र घालावे तसे हे पट्टे घालून शेतात कामाला जात आहेत. माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष किती टोकदार झाला आहे याचे हे ज्वलंत उदाहरण. गत जुलै महिन्यात विधिमंडळात माहिती देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, राज्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतरही हे मृत्यू सुरूच आहेत. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात बिबट्याने अलीकडे तीन बळी घेतले. अहिल्यानगर जिल्ह्यातही हे घडले. नाशिकसारख्या शहरात बिबट्या घुसला. वनविभाग आता १० कोटी रुपये खर्चून १० हजार पिंजरे खरेदी करणार आहे. 

बिबटे पकडून ते ‘वनतारा’त किंवा परराज्यात पाठवू, असेही वनमंत्री म्हणाले. बिबट्यांची नसबंदी करण्याचाही प्रस्ताव आहे. पण, खरेच तेवढ्याने भागणार आहे का? बिबट्यांचे अभ्यासक स्वप्निल कुंभोजकर यांचे म्हणणे आहे की, ‘बिबट्या आपला अधिवास सहसा लवकर बदलत नाही. पुणे जिल्ह्यात जुन्नर परिसरात जी धरणे झाली त्यातून जंगलाची जागा पाण्याखाली गेली. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे सरकले. ही धरणे सत्तरच्या दशकात झाली. पण, बिबट्यांचे हल्ले साधारण सन २००० पासून दिसतात. याचा अर्थ विस्थापित झालेला बिबट्या जंगलातून माणसांकडे सरकण्यासाठी २५-३० वर्षांचा काळ लागला. आता त्याचा प्रवास पुन्हा जंगलाच्या दिशेने करायचा असेल तर तेही लवकर घडणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपाय लागतील. पण, आत्ता तातडीने माणसांच्या सुरक्षेसाठी उपाय हवेत.’

वनमंत्र्यांनीही तात्पुरत्या व दीर्घकालीन उपायांबाबत भाष्य केले आहे. केनिया देशाने जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी ‘सोलर लायन लाईट’चा प्रकल्प राबविला. यात गावाच्या आसपास रात्री चमकणारे एलईडी फ्लॅश लाईट बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्राणी गावाजवळ येण्याचे प्रमाण कमी होते. उत्तराखंडमध्ये जंगलाभोवती ‘लेमनग्रास, अगेव्ह, रम्बंस’ या गवतांचे कुंपण (बायोफेंसिंग) करण्यात आले आहे. यातून काटेरी, दाट वनस्पतींचा पट्टा तयार होतो. आपणाकडेही साबरकांडे ही काटेरी वनस्पती वनविभाग जंगलाच्या सीमेवर लावत होता. त्यातून मार्ग काढणे बिबट्याला सोपे नाही. पण, माणसांनी हे कुंपण टिकू दिले पाहिजे. 

खेड्यातील लोकांना तातडीने चार्जेबल बॅटरी, काठ्या पुरविणे हे प्राथमिक उपाय आहेत, असे कुंभोजकरांसारखे तज्ज्ञ सांगतात. कारण बॅटरीच्या प्रकाशामुळे बिबट्या जवळ येत नाही. लोकांनी गळ्यात घातलेले काटेरी पट्टे हा दुर्दैवी उपाय आहे. पण, मानेवरील हल्ला हा सर्वांत जीवघेणा असतो. तो या पट्ट्यामुळे टळेल. शेतात काम करताना भ्रमणध्वनीवर किंवा ब्लू टूथच्या स्पिकरवर गाणे वाजविणे, मोठ्याने गप्पा मारणे हेही उपाय आहेत. कारण, आवाजाला बिबट्या घाबरतो.

घराजवळ उसाची शेती टाळणे हाही उपाय आहे. पण, शेतकरी ते करू शकत नाही. कारण त्याचे अर्थाजनच त्यावर आहे. दिवसाच वीज पुरवली तर शेतकऱ्यावर पिकाला पाणी देण्यासाठी रात्री बाहेर पडण्याची वेळच येणार नाही. अर्थात आता बिबट्या दिवसाही हल्ले करू लागला आहे. पण, तरीही काही प्रमाणात यास अटकाव बसेल. त्यामुळे आता वनखात्याने एकट्याने आपले घोडे दामटू नये. या विषयावर साध्या ग्रामसभा अद्यापपर्यंत बोलावलेल्या नाहीत. अनेक गावे दहशतीखाली आहेत. ग्रामसभा घेऊन लोकांकडे, अभ्यासकांकडे काय उपाय आहेत ते सरकारने ऐकले पाहिजे. जिल्हा प्रशासनही यात सतर्क हवे. सरकार दुर्लक्ष करीत राहिले तर लोकांचा क्षोभ वाढेल. वनखाते हाताची घडी घालून बसले तर बिबट्यांना थेट मारुनच टाका या चर्चेला जोर चढेल. कारण हाडामांसाची माणसे डोळ्यांदेखत मृत्युमुखी पडत आहेत. बिबट्या जगलाच पाहिजे. पण, अगोदर माणूस जगला पाहिजे हे सरकारला लक्षात घ्यावे लागेल. बिबट्या गावात आहे, सरकारने केवळ मंत्रालयातून धोरण ठरवून कसे चालेल?

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Attacks Spark Fear: Villagers, Forest Department Seek Solutions

Web Summary : Escalating leopard attacks instill fear, prompting villagers to take drastic measures for safety. Experts suggest immediate solutions like lighting and long-term strategies like bio-fencing. The Forest Department faces pressure to protect both humans and leopards, urging community involvement and proactive measures to prevent further conflict.
टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरleopardबिबट्या