शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग जपणारे खवले मांजर वाचवू या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 10:51 IST

खवले मांजराचे निसर्गात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते नैसर्गिक परिसंस्थांचा एक महत्त्वाचा भाग आहे. कीटक नियंत्रणाचे आणि अधिवास सुदृढ राखण्याच्या दृष्टीने हा प्राणी मोलाचे काम करतो. खवले मांजर हे कोकणाच्या जैवविविधतेचं एक मौल्यवान रत्न आहे. त्याचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे.

शंतनु कुवेसकर वन्यजीव संशोधक, माणगाव

भारतीय पेंगोलिन म्हणजे साध्या सोप्या मराठीत खवले मांजर (शास्त्रीय नाव: Manis crassicaudata). एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमयी प्राणी. त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना, म्हणजेच संपूर्ण शरीरावर असलेली मजबूत खवले (स्केल्स), हीच त्याची ओळख पटवणारी खास खूण. ही खवले केराटिनपासून बनलेले असतात आणि मानवी नखांप्रमाणेच असतात. ही संरचना त्याला नैसर्गिक संरक्षण देते.

खवले मांजर मुख्यतः निशाचर प्राणी आहेत, ते रात्री सक्रिय असतात. मुख्यत्वे जमीन खणून त्यात राहतात. मुंग्या, वाळवी आणि इतर कीटक हा त्यांचा प्रमुख आहार आहे. आपल्या लांब चिकट जिभेच्या साहाय्याने हे प्राणी वारुळांमधून मुंग्या, वाळवी तसेच बिळांमधून कीटक बाहेर काढून खातात. त्यांना दात नसतात, त्यामुळे त्यांची खाण्याची पद्धत अनोखी असते. 

लांब जिभेला चिकट लाळेच्या साहाय्याने चिकटलेले कीटक जिभेच्याच साहाय्याने गिळतात. कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील जंगलांमध्ये खवले मांजर आपले अस्तित्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत टिकवून आहे.  कोकण परिसरासह पुणे आणि इतर काही जिल्ह्यांतही खवले मांजर आढळल्याच्या नोंदी आहेत. कोकणाची घनदाट जंगलं, भरपूर कीटक आणि ओलसर हवामान हे या प्राण्याच्या निवासासाठी अनुकूल मानले जाते. 

कोकणातील स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी याच्या संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. जनजागृती, संशोधन आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळेही या प्राण्याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. अलीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक नागरिक या प्राण्याबाबत अधिक जागरूक झाल्याचे आढळते. 

टॅग्स :konkanकोकणNatureनिसर्ग