शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 06:53 IST

कायद्यांना शस्त्रांचे रूप देऊन विरोधकांविरुद्ध त्यांचा मनमानी वापर करण्यात सध्याचे सरकार अगदी तरबेज आहे. ही नवी हुकूमशाही नव्हे, तर दुसरे काय आहे?

कपिल सिब्बल, राज्यसभा खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ

१९६७च्या बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यातील (UAPA) दुरुस्तीचे विधेयक संसदेत चर्चेला आले तो दिवस मला नीट आठवतो. त्यावेळी गृहमंत्री  म्हणाले होते, आपले प्रजासत्ताक अस्थिर करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या संघटनांचा समावेश  UAPAच्या पहिल्या परिशिष्टात करण्यास कुणाचाच विरोध असू शकत नाही;  त्यामुळे ही दुरुस्ती आवश्यकच आहे. त्यावेळी हस्तक्षेप करून मी या कायद्यांचा वापर देशातील निरपराध नागरिकांविरूद्ध होण्याची दाट शक्यता असल्याची भीती व्यक्त केली होती. माझी ती भीती आज खरी ठरली आहे. उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्यासारख्या तरुण विद्यार्थ्यांवर याच कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे खटल्याची कोणतीही सुनावणी न होता,  ही मुले वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडली आहेत. पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि काही धार्मिक समुदायातील व्यक्तींविरूद्धही या कायद्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यांचा  आवाज दडपणे, हाच यामागचा  हेतू स्पष्ट  आहे.

विरोधकांची सरकारे असलेल्या राज्यांतील  मुख्यमंत्री, मंत्री आणि राजकीय विरोधकांविरूद्ध २००२चा मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) सर्रास  वापरला गेला आहे. अनेक विरोधी नेत्यांना भीती घालण्यासाठीही या कायद्याचा वापर करून, खटले आणि तुरुंगवास टाळण्यासाठी त्यांना ‘भाजपवासी’ होण्यास  भाग पाडले गेले आहे. महाराष्ट्रात, ज्या विरोधी नेत्यांवर भाजपनेच जाहीरपणे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते,  त्यांनाच पुढे  पक्षफोडीच्या बदल्यात  मंत्रिपदे देऊन भाजपने गौरविले आहे.  ते सारे आता महाराष्ट्रातील सत्ताधारी  युतीचे सन्माननीय  घटक आहेत.

२० ऑगस्ट २०२५ला संसदेत सादर केलेली दोन घटनादुरुस्ती विधेयके हे  कायद्याचा शस्त्र म्हणून वापर करण्याचे सर्वांत अलीकडचे उदाहरण. ही विधेयके जनहितार्थ, लोककल्याणार्थ आणि घटनात्मक नैतिकता व सुशासन या तत्त्वांची  जपणूक करण्यासाठी आणली असल्याचा दावा केला जात आहे. वस्तुतः  या सरकारच्या कार्यपद्धतीचा वरील तत्त्वांशी सुतराम संबंध नाही. पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या  गुन्ह्याबाबत ज्यांची  चौकशी   चालू आहे आणि ३० दिवसांपेक्षा अधिक काळ जे  तुरुंगात आहेत, अशा मुख्यमंत्र्यांनी  किंवा मंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा न दिल्यास, त्यांच्या बंदिवासाच्या ३१व्या दिवशी राज्यपाल त्यांना पदच्युत करू शकतील, अशी तरतूद   या प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकात आहे. त्याचे कायद्यात रुपांतर झाले  तर नको झालेल्या मुख्यमंत्र्यांना व मंत्र्यांना हटवण्यासाठी  त्यांच्यावर जाणीवपूर्वक खोटे आरोप करून त्यांना अटक केली जाण्याची आणि ३० दिवसांच्या तुरुंगवासानंतर पदच्युत केले जाण्याची दाट शक्यता आहे. 

विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यातील प्रभावशाली मंत्र्यांना  भाजपत सामील होण्यास भाग पाडण्यासाठी पीएमएलए आणि यूएपीए यांसारख्या  कायद्यांचा वापर   केला गेला. कोणत्याच पक्षात नसलेल्या नागरी सेवेतील काही अधिकाऱ्यांवरही हाच प्रयोग केला गेला आहे. २०१४पासून आजवर, भाजपशासित राज्यातील  किंवा केंद्रातील सत्ताधारी  आघाडीतील एकाही मंत्र्याविरूद्ध  हे कायदे कधीही वापरले गेले नाहीत, हे विशेष! अशा कायद्यांमुळे   विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यात, मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला पदच्युत करण्याचा अधिकार राज्यपालांना  मिळेल. सध्याच्या कायदेशीर चौकटीनुसार न्यायालयाने दोषी असल्याचा निवाडा दिल्यावरच असे घडू शकते. शिवाय अशा पदांवरील सार्वजनिक सेवकांविरूद्ध खटले चालवण्यासाठी मंत्र्यांच्या बाबतीत मंत्रिमंडळाची आणि फक्त  मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत राज्यपालांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते.  अशा  परवानगीची तरतूद हटवून हे अधिकार  पूर्णतः केंद्रनियुक्त  राज्यपालांना  देत,  प्रस्तावित कायदे त्यांच्या हाती नवे शस्त्र देत आहेत. 

सध्याचे संख्याबळ लक्षात घेता ही विधेयके मंजूर होण्याची शक्यता जवळजवळ नाहीच.  तर मग मुळात ही विधेयके आणलीच का? याची दोन कारणे असू शकतात.एक म्हणजे सरकार राजकारण गुन्हेगारमुक्त करू पाहते आहे. परंतु, विरोधक मात्र घटनात्मक नैतिकतेची तत्वे जपू इच्छित नाहीत, असा देखावा सरकार निर्माण करू इच्छित आहे.  बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना मिळत असलेल्या जनसमर्थनावरून लोकांचे लक्ष वळवणे, हे याचे दुसरे आणि  खरे कारण असावे. दुर्दैव असे की, कायद्यांचा शस्त्रासारखा वापर करून लोकशाहीचा गळा आवळता येतो, तिचा श्वास कोंडता येतो, असे भयावह चित्र यातून समोर उभे राहते. ही एक नव्याच स्वरुपाची हुकूमशाही म्हणायला हवी.

टॅग्स :Parliamentसंसद