शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 07:57 IST

Pandharpur Wari: तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो.

- डॉ. एस. एन. पठाण (माजी कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि सल्लागार, विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे) पायी वारीला आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर आज लाखो वारकरी पंढरपूरला पायी जात आहेत. 

रस्त्यात वारकऱ्यांची शिस्त, विठ्ठलाच्या प्रति त्यांचा निष्काम भाव, ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करत विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ हे सर्व पाहणेही अत्यंत पुण्यशील कर्म समजले जाते. असा हा वारकरी मात्र ग्रामीण भागातील शेतकरी, कामकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक असतो. 

या सामान्य वारकऱ्यांच्या चित्तशुद्धीचा निष्काम कर्माचा विज्ञाननिष्ठ प्रयोग संत तुकाराम महाराजांनी भक्तीच्या मार्गे जनतेला दिला आहे व त्याचा आता आषाढी एकादशीनिमित्ताने आध्यात्मिक उत्सव सुरू आहे. 

नानाविध भक्तीचे स्वरूप

देवाचे स्मरण, नामसंकीर्तन, श्रवण, नामोच्चार, अहंकारनिरसन, मनीमानसीपूजन, दास्यभाव, आत्मसमर्पण, सख्यभाव अशी ही नवलक्षणांनी युक्त असलेली भक्ती म्हणजे नवविधा भक्ती होय. हाच भक्तियोग वारीत साधला जातो. 

नवविधा भक्ती जो जाणतो आणि साक्षात ह्या नवलक्षणांनी युक्त अशी भक्ती करतो, तोच खरा भक्त आणि देव होय. भक्तीचा भौतिक प्रभाव मांडतानाही तुकोबा विज्ञानाचा आधार घेऊन, भक्तिमार्ग हा पूर्णपणे वैज्ञानिक असल्याचे सांगतात. 

‘नाम घेता कंठ शीतळ शरीर। इंद्रिया व्यापार नाठवती।।’ भक्ती हे सोपे कर्म असल्याचे सांगतात. परंतु, लगेच तुकोबा भक्ती ही अत्यंत कठीण अशी शुळावरची पोळी असल्याचेही प्रतिपादन करतात. भक्तीसाठी मनाचा कठोर निर्धार आवश्यक असतो आणि सर्व विकार विकृतींचाही त्याग करावा लागतो. शुद्ध अंतःकरणानेच भक्तीच्या समाधीकडे प्रवास करणे शक्य असते.

भक्ती आणि कर्माची सांगड

तुकोबांनी सर्वांनाच भक्तीचा अधिकार असल्याची घोषणा केली. ‘सकळांसी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरिच्या नामे।।’ असे भक्तीचे स्वरूपही आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. तुकोबांनी केवळ भक्तीचाच डांगोरा पिटला आणि कर्माला दांडी मारली असे नाही. 

तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो. भक्ती ही अज्ञातवासात किंवा एकांतात किंवा डोंगरदऱ्यात किंवा देवळातच केली पाहिजे, हे आवश्यक नाही. 

कर्म करताना कोणत्याही स्थळीकाळी भक्ती करता येते. भक्तीमुळे निष्काम कर्मही करता येते. माणसाच्या चित्तवृत्ती शुद्ध झाल्या की कर्म हे कर्तव्य म्हणून करणे शक्य होते. कर्माला कर्तव्य मानले की कर्माच्या फलाची आशाही सुटते आणि फलाची चिंताही मिटते. 

भक्तीचा संबंध हा मनुष्याच्या मनोपिंडाशी असतो. भक्तीच्या माध्यमाने भक्त हा देवरूप होतो. अशीच माणसे समाजाच्याही उद्धाराचे काम करतात. भक्तीची प्रक्रिया ही विज्ञाननिष्ठ प्रक्रिया असून, समाजाच्या चित्तशुद्धीचा इहवादी कार्यक्रम म्हणून तुकोबांनी भक्तिमार्ग समाजासमोर मांडला होता. 

स्वतःच्या अनुभवाने तुकोबांनी तो सिद्धही केला. भक्तीचा आणि मनाचा संबंध असतो म्हणून मनावर भाष्य करताना तुकोबा म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण।।’

भक्तीचे व्यावहारिक स्वरूप

तुकोबांनी नवविधा भक्तीचेही स्वरूप स्पष्ट केलेले आहे. पूर्वसुरींच्या संतांनीही नवविधा भक्तियोगाचे प्रतिपादन केले होते. नवविधा भक्तीयोग पूर्णपणे व्यावहारिक पातळीवर आणण्याचे श्रेय मात्र, तुकोबांनाच दिले पाहिजे. 

ज्याचे नामस्मरणात चित्त जडलेले आहे अशाच लोकांचे अंकित व्हावे, दास व्हावे, असे तुकोबांना वाटते. ज्याला नवविधा भक्ती करता येते त्याचेच अंतःकरण शुद्ध होते. चित्तवृत्ती प्रसन्न आणि आनंदित होतात. जीवनातले परमोच्च असे भक्तिसुखही त्याला प्राप्त होते.

संतांनी अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितले

संतांनी आपल्या काळात सर्वधर्मसमभाव आणि सांप्रदायिक एकता निर्माण करून समाजाला जगण्याचा अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितला होता. संतांनी अनुभवाने आपल्या विचारांचे प्रतिपादन केले होते. ‘नाही आले अनुभवा कैसे नाचू मी देवा’ ही संतांची जगण्याची आणि उपदेश करण्याची पद्धती होती.

संतांनी सांगितला मार्ग 

संतांनी आपल्या काळात सर्वधर्मसमभाव आणि सांप्रदायिक एकता निर्माण करून समाजाला जगण्याचा अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितला होता. संतांनी अनुभवाने आपल्या विचारांचे प्रतिपादन केले होते. तीच संतांची जगण्याची आणि उपदेश करण्याची पद्धती होती.

चित्तशुद्धीचा कार्यक्रम

संतांचा विचार हा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ आणि सर्वधर्मसमभावात्मक मानवतावादी विचार आहे. सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांततेच्या जगण्याचे मौलिक तत्त्वज्ञान आहे. आजच्या सांप्रदायिक अशांतता आणि दहशतवादाच्या विषाणुयुक्त भूमीवर संतविचारांची आणि संतमार्गाची पेरणी केल्यानेच जगात विश्वशांती आणि सद्भाव निर्माण होऊ शकेल.  

विश्वशांतीचे कार्य

दिंड्यांमधील पायी चालणारे वारकरी वाखरी तळावर पोहोचले की, त्यांना विसावा हवा असतो. म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी वाखरी येथे अत्यंत सुंदर ‘विश्वशांती गुरूकुल’ स्थापन केले. वारकऱ्यांसाठी २०० स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली. जवळ जवळ एक लाख वारकऱ्यांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येते. 

येणाऱ्या प्रत्येक दिंडी प्रमुखाचे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन येणाऱ्या महिला वारकऱ्यांचा शाल, पुष्पहार देऊन स्वागत हाेते. असा हा पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ कार्यक्रम सुरू असतो. जणू तो आध्यात्मिक उत्सवच असतो.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा