शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लेख: विमान प्रवास आणि राहुल गांधींना आईचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:37 IST

संसदेच्या आवारात अगदी अल्पकाळ झालेली ती सहज बोलाचाली होती. पण तिला अर्थाचे अनेक पदर नंतर चिकटले. भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांशी बोलत असताना राहुल गांधी एकदम म्हणाले, ‘माझ्या आईने मला खासगी विमानाने प्रवास टाळायला सांगितले आहे.’ हे बोलून राहुल थांबले. वरकरणी हे सहज बोलणे वाटले. पण प्रत्यक्षात एका आईला वाटणाऱ्या काळजीपेक्षाही मोठा अर्थ त्यातून प्रकट झाला, हे मात्र नक्की. 

हरीष गुप्तानॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीसंसदेच्या आवारात अगदी अल्पकाळ झालेली ती सहज बोलाचाली होती. पण तिला अर्थाचे अनेक पदर नंतर चिकटले. भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांशी बोलत असताना राहुल गांधी एकदम म्हणाले, ‘माझ्या आईने मला खासगी विमानाने प्रवास टाळायला सांगितले आहे.’ हे बोलून राहुल थांबले. वरकरणी हे सहज बोलणे वाटले. पण प्रत्यक्षात एका आईला वाटणाऱ्या काळजीपेक्षाही मोठा अर्थ त्यातून प्रकट झाला, हे मात्र नक्की. 

सोनिया गांधी यांनी दिलेला सल्ला हा पुत्रप्रेमापोटी होता. खासगी विमानांचे अपघात फारसे होत नसले तरी राजकारणात या अपघातांनी बरेच आघात केले आहेत. देशभरात गेल्या काही दशकांत अचानक झालेल्या विमान दुर्घटनांनी अनेक राजकीय नेत्यांना प्राण गमवावे लागले. देशाला ते मोठे धक्के होते.  सोनिया गांधी यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे. व्यक्तिगत आयुष्यात त्यांना खूप काही गमवावे लागले आहे; अशा पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मुलाला दिलेला सल्ला हा जीवन आणि राजकारण एकमेकांना कसे छेद देते याची खोल जाण दर्शविणारा आहे.

राहुल यांनी जाता जाता आईने दिलेला सल्ला बोलून दाखवला यातही पुष्कळ अर्थ होता. त्यातून त्यांच्यातला ‘माणूस’ दिसला. एरवी छोटे छोटे हिशेब करून लिहिल्या गेलेल्या संहिता राजकीय नेत्यांच्या बोलण्यातून सातत्याने डोकावत असतात. लोकभावनांच्या बाबतीत आपण किती जागरूक आहोत हे राहुल यांनी यातून दाखवून दिले. सध्या तुमच्या मनात काय आहे याबरोबरच ‘काय दिसते?’ यालाही महत्त्व आले आहे. खासगी विमानप्रवास टाळल्याने तुम्ही मूठभर अभिजनांपासून वेगळे आहात, संयमी आहात हे दिसते. यात कुठलीही नैतिक भूमिका घेणे नाही, टेंभा मिरवणे नाही. आपली आई काय म्हणते तेवढे मुलाने समोर ठेवले. 

नेते मोहिमा आखतात, मुद्द्यांचा खल करतात, त्यांची सतत धावपळ चालू असते; पण त्याचवेळी इतिहासात वेळोवेळी दिसून आलेले भय त्यांच्या मनात दडलेले असतेच. त्याबद्दल सहज बोलून जाण्यातून राहुल गांधी यांनी  सार्वजनिक जीवनाच्या आत असलेला व्यक्तिगत भाग उघड केला. घरात बोलली गेलेली एखादी गोष्ट संसदेच्या आसमंतात कान देऊन कशी ऐकली जाते, याचा हा एक विलक्षण नमुना! शॉटगन, कीर्ती आणि नबीन 

पश्चिम बंगालमधील राजकारणाला अनपेक्षितरीत्या बिहारी रंग चढू लागले असून, भाजप त्याचा आनंद घेताना दिसतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांचा व्यापक दौरा आखून आपली कारकीर्द सुरू करायचे ठरवले. पश्चिम बंगालपासून श्रीगणेशा होणार होता. केवळ बंगाल नव्हे तर त्याची पश्चिम बाजू, बिहार तसेच झारखंडच्या सीमेवरील बरद्वान आणि असनसोलची निवड त्यांनी केली. या टापूत हिंदी काही परकी भाषा नाही. त्यांनी भौगोलिकदृष्ट्या केलेली ही निवड हा योगायोग नव्हता. या जिल्ह्यांमध्ये बिहारी आणि बिगर बंगाली यांची संख्या लक्षणीय आहे. निवडणूक निकालांवर हा भाग आपोआपच निर्णायक परिणाम करीत असतो. शिवाय, या भागात राजकीयदृष्ट्या जागरूक असलेला कायस्थ समाज मोठ्या संख्येने असून, नितीन नबीन कायस्थच आहेत. भाजप कसे हिशेब करतो आहे हे लगेच दिसले. मात्र येथे थोडीशी अडचण लक्षात आली. 

या भागात दोन मोठ्या नेताजींचा प्रभाव आहे. असनसोल हा बॉलिवूडमधले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा तथा शॉटगन यांचा, तर बरद्वान कीर्ती आझाद या माजी क्रिकेटपटूच्या प्रभावाखाली असलेला टापू. अजूनही कायस्थ मंडळी सिन्हांचे ऐकतात. त्यामुळे भाजपचा तेथे चंचूप्रवेश थोडा कठीण दिसतो. अर्थात पक्ष त्यामुळे डगमगलेला नाही. नबीन यांच्या माध्यमातून नव्या राजकीय निष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असून, कायस्थ आणि बिहारी मतदारांनी  भगव्याच्या पलीकडे पाहू नये, असे सूचित केले जात आहे. ममता बॅनर्जी नबीन यांना ‘उपरा’ म्हणून उडवून लावू शकणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. बंगाली लोकसंख्येच्या एक चतुर्थांश हिंदीभाषक असून, भाजपला आकडे महत्त्वाचे आहेतच!

रामलीला मैदान ते रेडिओ सायलेन्स 

मोदी सरकारने संयुक्त लोकशाही आघाडीची ‘मनरेगा’ बासनात गुंडाळून ‘जी रामजी’ योजना आणली तेव्हा काँग्रेसने पक्षाला शक्य होते ते सर्व केले, म्हणजेच बैठका घेतल्या. संसदेत जोरदार निदर्शने झाली. कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा, रामलीला मैदानावर सभा आणि अर्थात ४५ दिवसांच्या मनरेगा बचाव मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी समिती असा कार्यक्रम आखण्यात आला. तीन आठवड्यांनंतर हे आंदोलन कुठे दिसत नाही. रस्त्यावर तर नाहीच नाही. 

- याच्या उलट ममता बॅनर्जींचे असते. ईडीच्या नोटिसीवरील शाई वाळत नाही तोच त्या रस्त्यावर उतरलेल्या असतात.  आंदोलन कधी करायचे आहे हे ठरवताना काँग्रेसची अवस्था अनेकदा साप गेल्यावर भुई बडवण्यासारखीच असते.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's Air Travel Advice from Mother, Bengal Politics, Congress Protests

Web Summary : Sonia Gandhi advised Rahul to avoid private planes due to safety concerns. BJP eyes Bihar votes in Bengal via Nitin Nabin. Congress's protests lack Mamata Banerjee's immediacy.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसcongressकाँग्रेस