शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

दिवाळी अंकाच्या भोवताली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 4:04 AM

‘अंधार खूप झाला, पणती जपून ठेवा’ असा संदेश देणारी दिवाळी ही कालमानाने चार दिवसांची नसतेच. ती आशा जाणवत राहते वर्षभर. त्यांचाच एक भाग म्हणजे दिवाळी अंक

रविप्रकाश कुलकर्णी‘अंधार खूप झाला, पणती जपून ठेवा’ असा संदेश देणारी दिवाळी ही कालमानाने चार दिवसांची नसतेच. ती आशा जाणवत राहते वर्षभर. त्यांचाच एक भाग म्हणजे दिवाळी अंक. गोडधोडाची दिवाळी तर संपली. पण आता समोर आहे ती अक्षर दिवाळी. वाचनवेड्यांच्या समोर, आजूबाजूला आणि चर्चेत एकच विषय दिवाळी अंक. अंकात कुठे काय बित्तंम आहे. दिवाळी किती कुंठित झाली आहे हे वेगळे सांगावयास नको. माणसं नुसती बघे होताना दिसते आहे. अशा वेळी नाना प्रकारचे दिवाळी अंक पाहताना, चाळताना लक्षात येते, सगळाच काही अंधार नाही. अजूनही सांगणारे आहेत आणि ते ऐकणारे - वाचणारे आहेत. या विश्वासावरच एवढे सारे लेखक लिहित आहेत.काही अंक चाळता चाळता, हो, चाळता चाळताच. कारण असा संपूर्ण अंक वाचायचाच नसतो. आपल्या रूचीचं, आवडीचं काय असेल याचा शोध चालू असतो. या क्षणाला मी डोंबिवलीकर म्हणून सांगायलाच हवे, असा लेख आहे. ‘ललित’ प्रधान मिलिंद बोकील यांचा. ‘आठवणी लेखकांच्या’, बोकिलांच्या ‘शाळा’मध्ये डोंबिवली आलीच आहे. पण या लेखात त्यांच्या जडणघडणीच्या काळात आणि नंतर लेखक म्हणून झाल्यावर, त्यांच्या साहित्यिकांच्या संबंधातील आठवणी झकास आहेत. त्यात त्यांचा दृष्टिकोन ते सांगतात, आपण स्वत:हून कोणा लेखकाशी संपर्क करण्यात पुढाकार घेतला तर ते फारसे लाभदायक होत नाही. उलट परिस्थिती जेव्हा ते घडवून आणते तेव्हाच ते श्रेयस्कर ठरते अशी माझी याबाबतीतली अंधश्रद्धा आहे. याला अर्थातच काही अपवाद आहेत. या जडणघडणीच्या काळात एक सुप्त लेखक कसा आकाराला येत असतो म्हणा किंवा लपलेला असतो म्हणा ते पाहा - बोकील लिहितात, ‘भावे त्या कार्यक्रमातून लवकर उठून गेले. नंतर एक मुलगा वहीचा एक कागद घेऊन दांडेकरांपाशी आला. त्यांना म्हणाला की, सही पाहिजे. त्यावर त्याच्या पाठीवर हात ठेवून अशी कागदावर काही मी सही करत नाही, तू असं कर, तू मला एक कार्ड लिही. मी तुला त्याचं जरूर उत्तर देईन.’आपण लेखक झाल्यावर आपल्याकडे कोणी अशी सही मागायला आलं तर आपणही असंच उत्तर द्यायचं, असं मी त्या वेळी मनोमन ठरवून टाकलं. अशा सह्या मागणारी मुलं आजही दिसतात. पुढेही दिसतील. कारण ती एक प्रकारची साथ असते. पण आपल्याला लेखक ओळखणारा बोकीलांसारखा एखादाच आणि हा अनुभव सांगणारे तर पहिलेच म्हणून या गोष्टीची नोंद!जी.ए. कुलकर्णी यांच्या संबंधात हकीकत म्हणजे ती नामीच असणार हे आता जणू ठरून गेलं आहे. तशी बोकीलांची पण आहे. शिवाय बोकीली नजर पाहा - ते लिहितात, ‘पण आश्चर्याचा अपार धक्का देत जीएंचे उत्तर आले. चारच ओळी होत्या. अक्षर काहीसं बाळबोध, खाली इंग्रजी सही. एकवार असे वाटले की यांनी पत्र कोणाकडून तरी लिहून घेतलेले असावे आणि खाली फक्त सही केली असावी.’इथेही बोकीलांमधील लेखक भान त्या वेळीदेखील कसं होतं पाहा, ते लिहितात, ‘...तसे वाटण्यामागे दुसरीही एक भावना होती. माझ्या त्या वेळी दोन-तीनच कथा प्रसिद्ध झाल्या असल्या तरी लेखक म्हणून असणारे भान आजच्याइतकेच तीव्र होते. कुठे तरी माझ्या लेखक म्हणून असणाºया अहंकाराला धक्का लागला होता. मला ती भावना आजही स्पष्ट आठवते. मी मनाशी म्हटले, तुम्ही लेखक आहात तर मीसुद्धा लेखक आहे, नाही करायची ना चर्चा, नका करू!’पण तेच बोकील पुढे म्हणतात, ‘आता लक्षात येते की तो माझा फार मोठा करंटेपणा होता.’आणखीही जीएंसंदर्भात बोकील सांगतात. अर्थात आता जीएंच्या चाहत्यांना हे वाचण्याशिवाय गत्यंतर नाही हेच खरं! अशा वेगवेगळ्या आठवणी सांगत शेवटी बोकील लिहितात, ‘लेखकांची ही सगळी प्रभावळ डोळ्यासमोर येते, भावे, माडगूळकर, जीए, तेंडुलकर, गौरी देशपांडे. त्या आठवणी पोटात मुरल्यासारखे होते. ते सगळे लेखक भोवताली कायम असावेत असे वाटते. ते असावेत आणि भाषणही असावे. त्यांनी लिहावे, आपणही लिहावे. हे माहीत आहे क ी असे कोणीच कायम असू शकत नाही आणि तसे पाहिजे तर लेखक आपल्या लेखनाच्या रूपाने कायम असतातच. ते कुठे जातात? पण तरीही वाटते की ते असावेत.तुम्ही लेखक असता तेव्हा दुसºया लेखकाबद्दल तुमच्या मनात एक बंधुभाव घडून येतो. वाटते त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. मी जे करतो आहे तेच तो करतो आहे. हा बंधुभाव हेच लेखक असल्याचे फार मोठे संचित आहे.क़आज या बंधुभावाची अत्यंत गरज आहे. म्हणूनच त्यांच्या लेखाची दखल, सगळ्यांना कळावी म्हणून.दिवाळी अंक काय देतात याची चुणूक फक्त. हे अंक आपल्यापर्यंत येणं हा प्रयत्नाचा भाग झाला. बघूया आता हाती काय काय माणिक मोती, रत्नं येतात ते.येता पूर्ण महिना त्यासाठी तर आहे!