शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

‘कोरोना युध्दा’ पासून लोकप्रतिनिधी दूर आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 23:56 IST

एडिटर्स व्ह्यू

मिलिंद कुलकर्णीभाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर आरोप केला आहे की, ते घरात बसून असल्याने महाराष्टÑात ‘कोरोना’चा उद्रेक वाढला आहे. त्यांच्या आरोपामुळे महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लहर उठणे स्वाभाविक असले तरी म्हणावी तशी प्रतिक्रिया उमटली नाही. एखादे पत्रक निघाले, तेवढेच. याचा अर्थ काय समजायचा?लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात जळगावातील चौकात एक फलक लागला होता, त्याची चर्चा या स्तंभात केली होती. ‘तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या संपर्कात आहे का? ’ असा सवाल या फलकावर विचारण्यात आला होता. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने तो हटविण्यापूर्वी समाज माध्यमांमध्ये भरपूर प्रसारीत झाला.लॉकडाऊनचे चौथे पर्व सुरु झाले आहे. ५०-५५ दिवस लोटले आहेत. तरीही हा प्रश्न कायम आहे. यात दोन मतप्रवाह व्यक्त होत आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरला की, प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते, जनता असा गोतावळा जमतो. हे टाळायचे असेल तर लोकप्रतिनिधीने घरुन वा कार्यालयातून दैनंदिन आढावा घेणे, अधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संपर्कात राहणे, अडचणी असतील तर वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांच्याशी संवाद साधून मार्गी लावणे ही कामे केली तर हरकत काय आहे? कोरोना युध्दात समस्या, अडचणी, गैरसोयी होणे स्वाभाविक आहे. असे संकट पहिल्यांदा आले असल्याने प्रशासकीय यंत्रणा असो की, जनता यांच्याकडून चुका होणारच. लोकप्रतिनिधी रणांगणावर उतरला तर जनता त्यांची कैफीयत मांडेल आणि प्रशासनाला नियमात शिथिलता, दुर्लक्ष करण्याची सूचना करावी, अशी अपेक्षा करेल. असे करणे हे या काळात परवडणारे नाही, म्हणून लोकप्रतिनिधींनी घरुन काम करणे केव्हाही सोयीचे आहे, असा एक मतप्रवाह आहे.दुसरा मतप्रवाह आहे की, लोकप्रतिनिधींचा सहभाग हा केवळ बैठकांपुरता मर्यादीत न राहता जर प्रत्यक्ष रस्त्यावर ते उतरले तर प्रभाव पडू शकतो. अधिकारी हे स्थानिक नसतात, त्यामुळे जनतेशी सूर जुळायला वेळ लागतो. त्यापेक्षा लोकप्रतिनिधी हा स्थानिक असतो आणि तो उत्तमप्रकारे संवाद, समन्वय साधू शकतो. हा फायदा देखील नजरेआड करता येणार नाही. दुसरे महत्वाचे म्हणजे, गावे आणि गल्लीबोळ त्याला माहित असतात. जनतेच्या मानसिकतेशी चांगला परिचय असतो. त्यामुळे या संकटकाळात योग्य निर्णय आणि मार्ग काढण्यात लोकप्रतिनिधी मोलाची भूमिका बजावू शकतो.खान्देशचा विचार केला तर काय परिस्थिती दिसून येते? तिन्ही पालकमंत्री लक्ष घालत आहेत. गुलाबराव पाटील आणि अ‍ॅड.के.सी.पाडवी हे स्थानिक आहेत. पाडवी यांनी त्यांच्या मंत्रालयाचा उपयोग करीत परराज्यात असलेल्या खान्देशी रहिवाशांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची गावापर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था केली. पाटील यांनी तालुका पातळीवर आढावा बैठका घेतल्या. कोविड रुग्णालयाला भेडसावणाऱ्या समस्यांसाठी शासन पातळीवर तसेच सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून मदत मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.अब्दुल सत्तार हे परगावचे असले तरी दोन-तीनदा ते धुळ्यात येऊन गेले. आढावा घेतला.लोकप्रतिनिधींचा विचार केला तर मात्र निराशाजनक स्थिती दिसून येते. हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढेच लोकप्रतिनिधी मैदानात उतरुन प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. अनेक तर गायब आहेत. काहींनी निवासस्थान तात्पुरते अन्यत्र हलविले आहे. तर काहींनी संपर्क कार्यालय बंद केले आहे. अडचणीच्या काळात जनतेच्या मदतीला येण्याऐवजी काही लोकप्रतिनिधींनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व्यवस्थित पाळले आहे.लोकप्रतिनिधींच्या या ‘बघ्या’च्या भूमिकेमुळे काही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी प्रभावशाली झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथ रोग नियंत्रण कायद्यामुळे प्रशासनाकडे भरपूर अधिकार आल्यामुळे ते त्याचा पुरेपूर वापर करीत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाची माहिती दडविणे, नियम तोडून अंत्ययात्रेला गर्दी होणे, सीमा बंदी सोयिस्कर रीत्या मोडणे हे प्रकार घडत असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी जाब विचारणे, धारेवर धरणे हे केवळ अरण्यरुदन ठरत आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव