शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिकोन: कोसळणारा शेअर बाजार फायदेशीर ठरणारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 10:32 IST

कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात.

प्रसाद गो. जोशी

केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर झाल्यापासून देशातील शेअर बाजार हा सातत्याने खाली येत आहे. बाजार खाली येण्याला काही तत्कालिक कारणे आहेत, हे खरे असले तरी परकीय वित्तसंस्थांनी पुकारलेला (अघोषित) असहकार हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदावलेली आहे. वस्तूंची मागणी कमी होत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी बाजार कोसळला म्हणजे आपली अर्थव्यवस्था खरोखरच धोक्यात आहे, असे समजण्याचे कारण नाही. कोसळणारा शेअर बाजार ही गुंतवणूकदारांनी एक संधी समजली तर बाजारातील घबराट कमी होऊन या घसरणीला काही प्रमाणामध्ये पायबंद बसू शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे ती गुंतवणूकदारांच्या शिक्षणाची आणि संयम बाळगून व्यवहार करण्याची.

कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात. तरीही बाजाराची वाटचाल ही आपण अर्थव्यवस्थेच्या वाढीशी निगडित असल्याचे मानत असतो. जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांचा वेग मंदावलेला दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर चांगला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या जोडीलाच अर्थसंकल्पामध्ये अतिश्रीमंतांवर वाढविण्यात आलेला करांचा बोजा हा परकीय वित्तसंस्था तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्रासदायक ठरणारा आहे. या संस्थांनी यामधून सूट मिळण्याची केलेली मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावल्याने या संस्था चालू महिन्यामध्ये सातत्याने विक्री करीत आहेत. बाजार वर-खाली करण्याचे सामर्थ्य परकीय वित्तसंस्थांच्या हाती असल्याने त्यांच्या विक्रीमुळे बाजार खाली येत आहे.

भारत तसेच दक्षिण आशियाई देशांमधून मिळणारा परतावा जास्त असल्याने परकीय वित्तसंस्थांनी आशियामध्ये आपली गुंतवणूक वाढविली. मात्र अमेरिकेने आपल्या व्याजदरामध्ये वाढ करण्यास सुरुवात करताच या संस्थांनी आशियामधील आपली गुंतवणूक काढण्यास प्रारंभ केला. या तिमाहीमध्ये अमेरिकेतील व्याजदर न वाढण्याची शक्यता असल्याने काही काळामध्ये परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक पुन्हा सुरू होणे शक्य आहे.

कोसळणाऱ्या शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार धास्तावलेला दिसतो आहे. मात्र झालेले हे नुकसान आभासी असते. ज्या वेळी खरोखर विक्री होते, त्याचवेळी गुंतविलेल्या रकमेतील फायदा-तोटा किती याचा हिशोब मांडता येतो. आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य हा त्यासाठीचा मानदंड असू शकत नाही. गुंतवणूकदाराने खरेदी केलेल्या रकमेपेक्षा त्याला विक्रीनंतर रक्कम कमी मिळाली तर तो तोटा मान्य आहे. पण आज बाजारामध्ये विक्री करणाºया परकीय वित्तसंस्था तोट्यामध्ये व्यवहार करण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे या आभासाने घाबरून जाण्याची गरज नाही. देशांतर्गत वित्तीय संस्था आणि परस्पर निधी आजही कोसळणारा शेअर बाजार सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र बाजारामधून सर्वसामान्य गुंतवणूकदार बाहेर गेलेला दिसतो आहे. त्याने परत येणे महत्त्वाचे आहे.

भारतीय शेअर बाजारामध्ये असलेले दोन प्रमुख निर्देशांक म्हणजे संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टी. संवेदनशील निर्देशांकामध्ये मोठ्या ३० आस्थापनांचा समावेश आहे तर निफ्टीमध्ये केवळ ५०. त्यामुळे या निर्देशांकांच्या वाढ अथवा घटीमुळे संपूर्ण बाजार तसाच आहे, असे मानणे चुकीचे आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ वेगवेगळा असतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करूनच आपल्या फायद्या-तोट्याची गणिते मांडता येत असतात. हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे.

गेल्या महिनाभराच्या घसरणीमुळे बाजारामध्ये अनेक समभागांच्या किमती कमी झाल्या असून त्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात आल्या आहेत. दीर्घकालीन विचार करून अशा समभागांंमध्ये आज गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे, असा विचार करून गुंतवणूक केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजारामध्येही तेजी-मंदीचे चक्र सुरूच असते. आजच्या मंदीनंतर येणाºया तेजीचा फायदा घ्यायचा असेल तर आजच थोडा धोका पत्करत गुंतवणूक करणे हिताचे ठरणारे आहे. मात्र त्यासाठी हवी काही प्रमाणामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता आणि धीर बाळगण्याची तयारी.

(लेखक वरिष्ठ उपसंपादक आहेत)

टॅग्स :share marketशेअर बाजार