शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

दृष्टिकोन: कोसळणारा शेअर बाजार फायदेशीर ठरणारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 10:32 IST

कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात.

प्रसाद गो. जोशी

केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर झाल्यापासून देशातील शेअर बाजार हा सातत्याने खाली येत आहे. बाजार खाली येण्याला काही तत्कालिक कारणे आहेत, हे खरे असले तरी परकीय वित्तसंस्थांनी पुकारलेला (अघोषित) असहकार हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदावलेली आहे. वस्तूंची मागणी कमी होत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी बाजार कोसळला म्हणजे आपली अर्थव्यवस्था खरोखरच धोक्यात आहे, असे समजण्याचे कारण नाही. कोसळणारा शेअर बाजार ही गुंतवणूकदारांनी एक संधी समजली तर बाजारातील घबराट कमी होऊन या घसरणीला काही प्रमाणामध्ये पायबंद बसू शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे ती गुंतवणूकदारांच्या शिक्षणाची आणि संयम बाळगून व्यवहार करण्याची.

कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात. तरीही बाजाराची वाटचाल ही आपण अर्थव्यवस्थेच्या वाढीशी निगडित असल्याचे मानत असतो. जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांचा वेग मंदावलेला दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर चांगला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या जोडीलाच अर्थसंकल्पामध्ये अतिश्रीमंतांवर वाढविण्यात आलेला करांचा बोजा हा परकीय वित्तसंस्था तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्रासदायक ठरणारा आहे. या संस्थांनी यामधून सूट मिळण्याची केलेली मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावल्याने या संस्था चालू महिन्यामध्ये सातत्याने विक्री करीत आहेत. बाजार वर-खाली करण्याचे सामर्थ्य परकीय वित्तसंस्थांच्या हाती असल्याने त्यांच्या विक्रीमुळे बाजार खाली येत आहे.

भारत तसेच दक्षिण आशियाई देशांमधून मिळणारा परतावा जास्त असल्याने परकीय वित्तसंस्थांनी आशियामध्ये आपली गुंतवणूक वाढविली. मात्र अमेरिकेने आपल्या व्याजदरामध्ये वाढ करण्यास सुरुवात करताच या संस्थांनी आशियामधील आपली गुंतवणूक काढण्यास प्रारंभ केला. या तिमाहीमध्ये अमेरिकेतील व्याजदर न वाढण्याची शक्यता असल्याने काही काळामध्ये परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक पुन्हा सुरू होणे शक्य आहे.

कोसळणाऱ्या शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार धास्तावलेला दिसतो आहे. मात्र झालेले हे नुकसान आभासी असते. ज्या वेळी खरोखर विक्री होते, त्याचवेळी गुंतविलेल्या रकमेतील फायदा-तोटा किती याचा हिशोब मांडता येतो. आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य हा त्यासाठीचा मानदंड असू शकत नाही. गुंतवणूकदाराने खरेदी केलेल्या रकमेपेक्षा त्याला विक्रीनंतर रक्कम कमी मिळाली तर तो तोटा मान्य आहे. पण आज बाजारामध्ये विक्री करणाºया परकीय वित्तसंस्था तोट्यामध्ये व्यवहार करण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे या आभासाने घाबरून जाण्याची गरज नाही. देशांतर्गत वित्तीय संस्था आणि परस्पर निधी आजही कोसळणारा शेअर बाजार सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र बाजारामधून सर्वसामान्य गुंतवणूकदार बाहेर गेलेला दिसतो आहे. त्याने परत येणे महत्त्वाचे आहे.

भारतीय शेअर बाजारामध्ये असलेले दोन प्रमुख निर्देशांक म्हणजे संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टी. संवेदनशील निर्देशांकामध्ये मोठ्या ३० आस्थापनांचा समावेश आहे तर निफ्टीमध्ये केवळ ५०. त्यामुळे या निर्देशांकांच्या वाढ अथवा घटीमुळे संपूर्ण बाजार तसाच आहे, असे मानणे चुकीचे आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ वेगवेगळा असतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करूनच आपल्या फायद्या-तोट्याची गणिते मांडता येत असतात. हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे.

गेल्या महिनाभराच्या घसरणीमुळे बाजारामध्ये अनेक समभागांच्या किमती कमी झाल्या असून त्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात आल्या आहेत. दीर्घकालीन विचार करून अशा समभागांंमध्ये आज गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे, असा विचार करून गुंतवणूक केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजारामध्येही तेजी-मंदीचे चक्र सुरूच असते. आजच्या मंदीनंतर येणाºया तेजीचा फायदा घ्यायचा असेल तर आजच थोडा धोका पत्करत गुंतवणूक करणे हिताचे ठरणारे आहे. मात्र त्यासाठी हवी काही प्रमाणामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता आणि धीर बाळगण्याची तयारी.

(लेखक वरिष्ठ उपसंपादक आहेत)

टॅग्स :share marketशेअर बाजार