शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

दृष्टिकोन: कोसळणारा शेअर बाजार फायदेशीर ठरणारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 10:32 IST

कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात.

प्रसाद गो. जोशी

केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर झाल्यापासून देशातील शेअर बाजार हा सातत्याने खाली येत आहे. बाजार खाली येण्याला काही तत्कालिक कारणे आहेत, हे खरे असले तरी परकीय वित्तसंस्थांनी पुकारलेला (अघोषित) असहकार हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. देशाची अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदावलेली आहे. वस्तूंची मागणी कमी होत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी बाजार कोसळला म्हणजे आपली अर्थव्यवस्था खरोखरच धोक्यात आहे, असे समजण्याचे कारण नाही. कोसळणारा शेअर बाजार ही गुंतवणूकदारांनी एक संधी समजली तर बाजारातील घबराट कमी होऊन या घसरणीला काही प्रमाणामध्ये पायबंद बसू शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे ती गुंतवणूकदारांच्या शिक्षणाची आणि संयम बाळगून व्यवहार करण्याची.

कोणत्याही देशातील शेअर बाजाराची चढ-उतार हा अर्थव्यवस्थेच्या मापनाचा मानदंड असू शकत नाही. कारण या चढ-उताराला आर्थिक निकषांखेरीज अन्य काही बाबीही कारणीभूत असतात. तरीही बाजाराची वाटचाल ही आपण अर्थव्यवस्थेच्या वाढीशी निगडित असल्याचे मानत असतो. जगभरातील सर्वच अर्थव्यवस्थांचा वेग मंदावलेला दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर चांगला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर मंदावण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या जोडीलाच अर्थसंकल्पामध्ये अतिश्रीमंतांवर वाढविण्यात आलेला करांचा बोजा हा परकीय वित्तसंस्था तसेच परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांना त्रासदायक ठरणारा आहे. या संस्थांनी यामधून सूट मिळण्याची केलेली मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावल्याने या संस्था चालू महिन्यामध्ये सातत्याने विक्री करीत आहेत. बाजार वर-खाली करण्याचे सामर्थ्य परकीय वित्तसंस्थांच्या हाती असल्याने त्यांच्या विक्रीमुळे बाजार खाली येत आहे.

भारत तसेच दक्षिण आशियाई देशांमधून मिळणारा परतावा जास्त असल्याने परकीय वित्तसंस्थांनी आशियामध्ये आपली गुंतवणूक वाढविली. मात्र अमेरिकेने आपल्या व्याजदरामध्ये वाढ करण्यास सुरुवात करताच या संस्थांनी आशियामधील आपली गुंतवणूक काढण्यास प्रारंभ केला. या तिमाहीमध्ये अमेरिकेतील व्याजदर न वाढण्याची शक्यता असल्याने काही काळामध्ये परकीय वित्तसंस्थांची गुंतवणूक पुन्हा सुरू होणे शक्य आहे.

कोसळणाऱ्या शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांचे काही लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार धास्तावलेला दिसतो आहे. मात्र झालेले हे नुकसान आभासी असते. ज्या वेळी खरोखर विक्री होते, त्याचवेळी गुंतविलेल्या रकमेतील फायदा-तोटा किती याचा हिशोब मांडता येतो. आस्थापनांचे बाजार भांडवलमूल्य हा त्यासाठीचा मानदंड असू शकत नाही. गुंतवणूकदाराने खरेदी केलेल्या रकमेपेक्षा त्याला विक्रीनंतर रक्कम कमी मिळाली तर तो तोटा मान्य आहे. पण आज बाजारामध्ये विक्री करणाºया परकीय वित्तसंस्था तोट्यामध्ये व्यवहार करण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे या आभासाने घाबरून जाण्याची गरज नाही. देशांतर्गत वित्तीय संस्था आणि परस्पर निधी आजही कोसळणारा शेअर बाजार सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र बाजारामधून सर्वसामान्य गुंतवणूकदार बाहेर गेलेला दिसतो आहे. त्याने परत येणे महत्त्वाचे आहे.

भारतीय शेअर बाजारामध्ये असलेले दोन प्रमुख निर्देशांक म्हणजे संवेदनशील निर्देशांक आणि निफ्टी. संवेदनशील निर्देशांकामध्ये मोठ्या ३० आस्थापनांचा समावेश आहे तर निफ्टीमध्ये केवळ ५०. त्यामुळे या निर्देशांकांच्या वाढ अथवा घटीमुळे संपूर्ण बाजार तसाच आहे, असे मानणे चुकीचे आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराचा पोर्टफोलिओ वेगवेगळा असतो. त्यामुळे त्याचा अभ्यास करूनच आपल्या फायद्या-तोट्याची गणिते मांडता येत असतात. हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे.

गेल्या महिनाभराच्या घसरणीमुळे बाजारामध्ये अनेक समभागांच्या किमती कमी झाल्या असून त्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात आल्या आहेत. दीर्घकालीन विचार करून अशा समभागांंमध्ये आज गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे, असा विचार करून गुंतवणूक केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरू शकते. शेअर बाजारामध्येही तेजी-मंदीचे चक्र सुरूच असते. आजच्या मंदीनंतर येणाºया तेजीचा फायदा घ्यायचा असेल तर आजच थोडा धोका पत्करत गुंतवणूक करणे हिताचे ठरणारे आहे. मात्र त्यासाठी हवी काही प्रमाणामध्ये धोका पत्करण्याची मानसिकता आणि धीर बाळगण्याची तयारी.

(लेखक वरिष्ठ उपसंपादक आहेत)

टॅग्स :share marketशेअर बाजार