शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

विरोधी पण समंजस

By admin | Updated: October 14, 2015 00:16 IST

संदर्भ भले वेगळा असेल पण आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील समाजातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

संदर्भ भले वेगळा असेल पण आता भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील समाजातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. समाजाच्या किंवा समाजातील विशिष्ट वर्ग वा गटाच्या अशा वृद्धिंगत होत चाललेल्या असहनशीलतेची अनेक उदाहरणे अलीकडच्या काळात घडून गेल्याने ज्याला त्याच समाजातील संवेदनशील घटक म्हणून ओळखले जाते त्या साहित्यिकांनी त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार परत करण्यास सुरुवात केली आहे. अशा साहित्यिकांच्या यादीत रोजच नवनवी नावे जोडली जात असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इंग्रजीतील लेखक सलमान रश्दी यांचेही नाव त्यात जोडले गेले आहे. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल व महात्मा गांधींचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांनीही या साहित्यिकांचे अभिनंदन केले आहे. तरीही प्रामुख्याने पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांच्या यादीत बव्हंशी लेखक साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळविणारे आहेत. त्यांच्या या प्रतिकात्मक कृतीच्या काहीसा विसंवादी पण समंजस सूर साहित्य अकादमीचाच पुरस्कार प्राप्त केलेल्या हिन्दीतील लेखिका मृदुला गर्ग यांनी काढला आहे. आजवर ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले वा अकादमीचे राजीनामे दिले त्यातील बव्हंशी लोकानी सरकारच्या अनास्थेचा निषेध म्हणून हे पाऊल उचलले असले तरी काहींनी साहित्यिक संस्थांच्या अनास्थेचा निषेध म्हणूनही पुरस्कार परतीची कृती केली आहे. मृदुला गर्ग यांना अशा पद्धतीने साहित्य अकादमीला आणि तिच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांना सरकारशी जोडणे मान्य नाही. साहित्य अकादमी ही एक स्वायत्त संस्था असल्याचे त्यांचे ठाम मत असून याबाबतीत त्यांनी याच अकादमीचे पहिले अध्यक्ष आणि देशाचेही पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा दाखला दिला आहे. पुरस्काराचा निर्णय घेताना, साहित्यिक संस्थांकडून ज्या शिफारसी येतील त्यांचाच आदर केला जाईल व तेव्हां आपल्यातील पंतप्रधान अकादमीच्या अध्यक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार नाही. सबब उभय संस्था भिन्न आहेत. गर्ग यांना याबाबतीत एक अशीही भीती वाटते की, जर अकादमीचे सारेच सदस्य राजीनामे देऊन मोकळे होतील तर मग ते सरकारच्या पथ्यावरच पडेल आणि सरकार स्वत:स अनुकूल लोकांचीच तिथे वर्णी लावून मोकळे होईल. पुरस्कार परत करणारे वा अकादमीचा राजीनामा देणारे साहित्यिक जर सरकार आणि अकादमी यांच्यातील नाते अद्वैताचे मानीत असतील तर मग कोणे एकेकाळी त्यांना मिळालेले पुरस्कार हीदेखील तत्कालीन सरकारने दिलेली खिरापत होती हेही त्यांना मान्य करावे लागेल आणि साहजिकच तेव्हां त्यांनी ज्यांच्याकरवी ओशाळेपण स्वीकारले त्यांनाच आता ते आपल्या कृतीने ओशाळे करीत आहेत. त्यात नव्या सरकारचा काहीएक संबंध नाही.