शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

वंचितांच्या नावाखाली आणखी एक राजकीय प्रयोग

By सुधीर महाजन | Updated: October 13, 2018 09:30 IST

सामाजिक आणि राजकीय घुसळणीचे केंद्र औरंगाबाद आहे. गेल्या दीड वर्षाचा प्रवास तर असाच दिसतो. ऐंशी व नव्वदच्या दशकांत हे चळवळीचे केंद्र होते.

सामाजिक आणि राजकीय घुसळणीचे केंद्र औरंगाबाद आहे. गेल्या दीड वर्षाचा प्रवास तर असाच दिसतो. ऐंशी व नव्वदच्या दशकांत हे चळवळीचे केंद्र होते. डाव्या- उजव्या- मध्यममार्गी, अशा सगळ्या चळवळी येथे विचारांची सौहार्दाने आदान-प्रदान करीत नांदत होत्या. वैचारिक मतभेद हे वैचारिक पातळीवरच व्यक्त व्हायचे. त्यात वैचारिक आकसाचा भाग अजिबात नव्हता. नामांतर चळवळीने मोठी वैचारिक घुसळण त्यावेळी झाली; पण काळाच्या ओघात हा वैचारिक स्वच्छतेचा धागा खंडित झाला. गेल्या दीड वर्षात हेच शहर सामाजिक, राजकीय मंथनाचे शहर झाले. मराठा मोर्चांना येथूनच प्रारंभ झाला. मुस्लिम आणि धनगर समाजानेदेखील येथूनच मोर्चे काढले आणि या मोर्चांचे लोण पुढे राज्यभर पसरले. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे. भारिप-बहुजन महासंघ आणि एमआयएम या पक्षांनी एकत्र येऊन येथेच सभा घेतली. प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून युतीची घोषणा येथेच केली. या युतीने पुन्हा एकदा मतपेटीची घुसळण होईल, असा आता तरी अंदाज आहे. पुढे हे समीकरण कोणत्या पद्धतीने मांडले जाते, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

आंबेडकर-ओवेसी एकत्र येणे हीच मुळात वेगळ्या सामाजिक, राजकीय मांडणीची सुरुवात ठरू शकते. असे असले तरी राजकीय उद्दिष्टांसाठी एकत्र येणाऱ्यांची मैत्री किती काळ टिकणार, हाही एक प्रश्नच असतो. मुळातच हे दोन पक्ष एकत्र येणे हे अनेकांना बुचकाळ्यात पाडणारे आहे. मात्र, या दोघांनी या घोषणेसाठी औरंगाबादची केलेली निवड संयुक्तिक म्हणावी लागेल. एमआयएम हा मुस्लिमांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी निर्माण झालेला हैदराबादाचा पक्ष. दहा वर्षांपूर्वी त्याने मराठवाड्यात शिरकाव केला आणि पाच वर्षांपूवी नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्याने आपले खाते उघडले. आता या पक्षाचे विधानसभेत दोन आमदार आहेत. मराठवाड्यातील मुस्लिमांना आजही हैदराबादविषयी ममत्व आहे.

सहाशे वर्षांची मुस्लिम राजवट आणि निजामशाही याविषयी त्यांची वैचारिक नाळ असणे काही गैर नाही. निजामशाहीत हैदराबादनंतर औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर होते. या शहराच्या संस्कृतीवर हैदराबादी पगडा आजही आहे. त्यामुळेच एमआयएम येथे पसरला. दलितांच्या दृष्टीने ही बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक कर्मभूमी आणि विद्यापीठ नामांतर चळवळीत हे अस्मिता केंद्र बनल्याने युतीच्या घोषणेसाठी हे योग्य ठिकाण होते. सभेला झालेली गर्दी आणि नेत्यांनी जाहीर केलेला राजकीय कार्यक्रम पाहता दलित-मुस्लिमांसोबत वंचित आघाडीही एकत्र येताना दिसली आणि आता शेतकरी नेते राजू शेट्टीसुद्धा यांच्यात सामील होण्याची शक्यता दिसते. यावरून नवी मतपेटी तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. दलित आणि मुस्लिम या काँग्रेसच्या परंपरागत मतपेटीला पंचवीस वर्षांपूर्वी मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओहोटी सुरू झाली आणि आता हे नवे सामाजिक ध्रुवीकरण उरलासुरला जनाधार काढून घेण्याचे गणित मांडले जात आहे. सर्व दलित आणि सर्व मुस्लिम आंबेडकर आणि ओवेसी यांच्या मागे जातील का, हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची इतकी शकले उडाली की, प्रत्येक नेत्याने सोयीप्रमाणे आपल्या चुली मांडल्या. आता हे सगळे भारिप-आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणे ही दुरापास्त गोष्ट आहे. किंबहुना हे सगळे गट एकमेकांचे आजपर्यंत पाय ओढत आले आहेत. याही पलीकडे दलितांमध्ये आज राजकीय परिपक्व असणारा मोठा गट आहे. जो बाबासाहेबांच्या विचारांची बांधिलकी मानतो. दुसरीकडे सगळाच मुस्लिम समाज एमआयएमच्या झेंड्याखाली एकवटणारा नाही. व्यापक राष्ट्रीय विचार करणारा गटही मुस्लिमांमध्ये आहे. त्यामुळे दोन्ही समाज एकवटून एक तिसरी सशक्त आघाडी उभी राहील, याची अजिबात शाश्वती नाही. शिवाय या सभेला मुस्लिमांची उपस्थिती अपेक्षेइतकी नव्हती, ही गोष्ट दुर्लक्षिता येणार नाही.या सभेचा सूर पूर्णपणे मोदींविरुद्ध होता म्हणजे भाजपला विरोध करीत इतरांबाबत नरमाईचे धोरण ठेवणार, असा संदेश आता तरी जातो म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडवार इतरांशी हातमिळवणी, सहकार्याचा मार्ग मोकळा ठेवल्यासारखा दिसतो. विशेष म्हणजे ही सभा संपल्यानंतर पुन्हा सगळे शांत आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपा