शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - महासत्तेला पहिला सुरुंग!

By admin | Updated: May 1, 2017 00:57 IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महसुलाच्या प्रस्तावित केलेल्या नव्या ढाच्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यथाशक्ती विरोध करूनही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महसुलाच्या प्रस्तावित केलेल्या नव्या ढाच्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यथाशक्ती विरोध करूनही दुबईत झालेल्या आयसीसीच्या बैठकीत मात्र भारत एकाकी पडला. प्रशासनातील सुधारणेसाठीच्या प्रस्तावाला भारत सोडून सर्व नऊ राष्ट्रांनी पाठिंबा दिला, तर महसुलातील हिश्श्याच्या बाबतीत केलेल्या नव्या प्रस्तावावर भारताला केवळ श्रीलंकेचे समर्थन मिळाले. झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांनी ‘शब्द’ देऊनही ऐनवेळी भूमिका बदलल्याने तिथेही बीसीसीआयला २-८ असा पराभव स्वीकारावा लागला. भारतातील क्रिकेट वेडामुळे या देशात टेलिव्हिजन प्रसारणाचे हक्क ‘मूह मांगे’ किमतीला विकले जातात, त्यामुळे आयसीसीला भरघोस उत्पन्न मिळते. इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि भारतामुळे आयसीसीला जास्त महसूल मिळतो म्हणून आम्हाला जास्त वाटा हवा, अशी भूमिका घेऊन एन. श्रीनिवासन यांच्या पुढाकाराने महसूल वाटपाचे नवीन सूत्र आयसीसीमध्ये राबविले गेले. यातून या तीन बड्या संघटनांना जास्त नफा मिळत गेला. या निर्णयाच्या विरोधात त्यावेळी इतर राष्ट्रांमध्ये असंतोष होताच; पण उघड बोलण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. आयपीएलमधील बेटिंग आणि फिक्सिंगच्या मुद्द्यावरून श्रीनिवासन यांची बीसीसीआयमधील सद्दी संपुष्टात आल्यानंतर शशांक मनोहर अध्यक्ष बनले. त्यांनी स्वत:च या महसुलाच्या सूत्राला विरोध केला. पुढे जाऊन ते आयसीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर या सूत्राविरोधातील आवाजाला बळकटी मिळाली. बीसीसीआयने आपली ताकद दाखविण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती. त्या स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची वेळमर्यादा संपली तरी भारताने आपला संघ जाहीर केला नव्हता; पण या दबावाच्या राजकारणाचा काहीही परिणाम आयसीसीवर झाला नाही. शेवटी बुधवारी झालेल्या बैठकीत हे सूत्र बहुमताने मोडून काढण्यात आले. आता पुढील दिशा ठरविण्यासाठी बीसीसीआय विशेष सर्वसाधारण सभा बोलावणार आहे. त्यात चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय होणार आहे. भारताने बहिष्कार टाकला तर स्पर्धेच्या अपेक्षित उत्पन्नात प्रचंड तूट येणार हे निश्चित; पण बहिष्कार टाकून भारत एकटा करणार काय हे मात्र निश्चित नाही. जगमोहन दालमिया यांच्या व्यावसायिक दृष्टीने बीसीसीआयला समृद्ध बनविले. त्यातून त्यांनी आयसीसीलाही नफ्यात आणले. बीसीसीआयची आर्थिक सुबत्ता इतकी वाढली होती की, काही वेळेस आयसीसीच्या कर्मचाऱ्यांचे पगार बीसीसीआयच्या पैशातून झाले. त्यामुळे बीसीसीआयचे आयसीसीमध्ये वजन वाढले. जागतिक क्रिकेटमधील बीसीसीआय ही महासत्ता बनली. या महासत्तेला पहिला सुरुंग कालच्या घटनेने लागला आहे. महासत्तेच्या अंताची ही सुरुवात तर नसेल..?