शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - ‘बीएस-४’चा वज्राघात!

By admin | Updated: April 1, 2017 00:31 IST

एक एप्रिलपासून भारत स्टेज-३ (बीएस-३) मानकांनुसार उत्पादित वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा

एक एप्रिलपासून भारत स्टेज-३ (बीएस-३) मानकांनुसार उत्पादित वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा वाहन उद्योगावर वज्राघाताप्रमाणेच कोसळला आहे. तब्बल आठ लाख वाहनांचे काय करायचे, हा प्रश्न या निर्णयामुळे वाहन उत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. आम्ही १ एप्रिलपासून ‘बीएस-४’ मानकांनुसारच वाहनांचे उत्पादन करू; पण यापूर्वीच उत्पादित झालेली वाहने विकू द्या, ही वाहन उद्योगाची विनवणी न्यायालयाने फेटाळून लावली हे बरेच केले. त्यामागचे कारण असे की, ‘बीएस-३’ मानकांऐवजी ‘बीएस-४’ मानकांचा अवलंब करण्यासाठी निर्धारित करण्यात १ एप्रिल २०१७ ही तारीख २०१० मध्येच जाहीर झालेली होती. निवडक मोठ्या शहरांमध्ये तर हे संक्रमण यापूर्वीच झालेले आहे. असे असताना उत्पादकांनी जुन्याच मानकांनुसार उत्पादन सुरू ठेवण्याचे काही कारणच नव्हते. अर्थात, १ एप्रिल २०१७ ही तारीख उत्पादन थांबविण्यासाठी जाहीर झालेली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने ती विक्री बंद करण्यासाठी निर्धारित केल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. भारतात २०१५-१६ या आर्थिक वर्षात, सर्व प्रकारच्या मिळून सुमारे दोन कोटी ४० लाख वाहनांचे उत्पादन झाले होते. ही आकडेवारी विचारात घेतल्यास, बाद ठरणार असलेल्या वाहनांची संख्या काही फार जास्त म्हणता येणार नाही. बहुतांश वाहन उत्पादक तिसऱ्या जगातील देशांना निर्यात करून, त्यापैकी बहुतांश वाहनांचा सोक्षमोक्षही लावतीलच ! देशातील वायू प्रदूषणाची वाढती पातळी आणि जगातील सर्वाधिक प्रदूषित वीस शहरांपैकी दहा भारतातील आहेत, ही वस्तुस्थिती विचारात घेतल्यास, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. काही मोजक्या वाहन उत्पादकांनी हे समजून घेण्याचा सुबुद्धपणा दाखविला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. अर्थात, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, अजूनही भारतीय रस्त्यांवर ‘बीएस-१’ व ‘बीएस-२’ या कालबाह्य मानकांनुसार उत्पादन केलेली लाखो वाहने बिनधास्त धावत आहेत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रदूूषण खरेच कमी करायचे असेल तर आधी ही वाहने हटवायला हवी. भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अनेक दिवसांपासून पंधरा वर्षांपेक्षा जुनी वाहने भंगारात काढण्यासंदर्भात बोलत आहेत; पण तसे प्रत्यक्षात घडताना काही दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयातही केंद्र सरकारने वाहन उत्पादकांचीच पाठराखण करण्याची भूमिका घेतली. सरकारसाठी हे शोभादायक नाही. यापुढील संक्रमणासाठी १ एप्रिल २०२० ही तारीख निर्धारित करण्यात आली आहे. ‘बीएस-५’ मानक गाळण्यात आले असून, १ एप्रिल २०२० पासून संपूर्ण देशात केवळ ‘बीएस-६’ मानकांनुसार उत्पादित वाहनेच विकता येतील. त्यावेळी तरी वाहन उत्पादक व सरकारने असाच घोळ घालू नये, हीच पर्यावरणाची काळजी असलेल्यांची अपेक्षा आहे.