शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

भाष्य - ‘बीएस-४’चा वज्राघात!

By admin | Updated: April 1, 2017 00:31 IST

एक एप्रिलपासून भारत स्टेज-३ (बीएस-३) मानकांनुसार उत्पादित वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा

एक एप्रिलपासून भारत स्टेज-३ (बीएस-३) मानकांनुसार उत्पादित वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा वाहन उद्योगावर वज्राघाताप्रमाणेच कोसळला आहे. तब्बल आठ लाख वाहनांचे काय करायचे, हा प्रश्न या निर्णयामुळे वाहन उत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. आम्ही १ एप्रिलपासून ‘बीएस-४’ मानकांनुसारच वाहनांचे उत्पादन करू; पण यापूर्वीच उत्पादित झालेली वाहने विकू द्या, ही वाहन उद्योगाची विनवणी न्यायालयाने फेटाळून लावली हे बरेच केले. त्यामागचे कारण असे की, ‘बीएस-३’ मानकांऐवजी ‘बीएस-४’ मानकांचा अवलंब करण्यासाठी निर्धारित करण्यात १ एप्रिल २०१७ ही तारीख २०१० मध्येच जाहीर झालेली होती. निवडक मोठ्या शहरांमध्ये तर हे संक्रमण यापूर्वीच झालेले आहे. असे असताना उत्पादकांनी जुन्याच मानकांनुसार उत्पादन सुरू ठेवण्याचे काही कारणच नव्हते. अर्थात, १ एप्रिल २०१७ ही तारीख उत्पादन थांबविण्यासाठी जाहीर झालेली होती आणि सर्वोच्च न्यायालयाने ती विक्री बंद करण्यासाठी निर्धारित केल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. भारतात २०१५-१६ या आर्थिक वर्षात, सर्व प्रकारच्या मिळून सुमारे दोन कोटी ४० लाख वाहनांचे उत्पादन झाले होते. ही आकडेवारी विचारात घेतल्यास, बाद ठरणार असलेल्या वाहनांची संख्या काही फार जास्त म्हणता येणार नाही. बहुतांश वाहन उत्पादक तिसऱ्या जगातील देशांना निर्यात करून, त्यापैकी बहुतांश वाहनांचा सोक्षमोक्षही लावतीलच ! देशातील वायू प्रदूषणाची वाढती पातळी आणि जगातील सर्वाधिक प्रदूषित वीस शहरांपैकी दहा भारतातील आहेत, ही वस्तुस्थिती विचारात घेतल्यास, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतच करायला हवे. काही मोजक्या वाहन उत्पादकांनी हे समजून घेण्याचा सुबुद्धपणा दाखविला आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. अर्थात, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, अजूनही भारतीय रस्त्यांवर ‘बीएस-१’ व ‘बीएस-२’ या कालबाह्य मानकांनुसार उत्पादन केलेली लाखो वाहने बिनधास्त धावत आहेत, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रदूूषण खरेच कमी करायचे असेल तर आधी ही वाहने हटवायला हवी. भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अनेक दिवसांपासून पंधरा वर्षांपेक्षा जुनी वाहने भंगारात काढण्यासंदर्भात बोलत आहेत; पण तसे प्रत्यक्षात घडताना काही दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयातही केंद्र सरकारने वाहन उत्पादकांचीच पाठराखण करण्याची भूमिका घेतली. सरकारसाठी हे शोभादायक नाही. यापुढील संक्रमणासाठी १ एप्रिल २०२० ही तारीख निर्धारित करण्यात आली आहे. ‘बीएस-५’ मानक गाळण्यात आले असून, १ एप्रिल २०२० पासून संपूर्ण देशात केवळ ‘बीएस-६’ मानकांनुसार उत्पादित वाहनेच विकता येतील. त्यावेळी तरी वाहन उत्पादक व सरकारने असाच घोळ घालू नये, हीच पर्यावरणाची काळजी असलेल्यांची अपेक्षा आहे.