शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

...आणि संशोधन शिक्षणाच्या खिडक्या उघडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 7:04 AM

‘ शिक्षण’ म्हणजे शाळा, हे समीकरण आपल्या डोक्यात पक्के बसलेले, किंबहुना बसवलेले असते. शाळेत शिकवितात ते म्हणजेच शिक्षण , ...

शिक्षण’ म्हणजे शाळा, हे समीकरण आपल्या डोक्यात पक्के बसलेले, किंबहुना बसवलेले असते. शाळेत शिकवितात ते म्हणजेच शिक्षण, असा आपला (गैर) समज अगदी लहानपणापासूनच झालेला असतो. मग शिक्षण म्हणजे फक्त पुस्तके-वर्ग-शिक्षक-शाळा-परीक्षा-निकाल एवढ्यापुरतेच मर्यादित राहते, परंतु यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या जीवनप्रवासात शिक्षणाचा मोठा वाटा असायला हवा, यावर माझा विश्वास आहे. खरे तर शिकण्याची आणि शिकविण्याची प्रक्रिया आनंददायी असेल, तर हा आनंद मुलांना जगण्याच्या मूल्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो. या घुसळणीमधून मिळणारे वेगवेगळे दृष्टिकोन घेऊन जगाकडे चौकस नजरेतून बघता येऊ शकते, म्हणूनच अशा शिक्षणाची आज आपल्याला नितांत आवश्यकता आहे.

कॉलेजमध्ये मुले वर्गात बसत नाहीत, शिकविण्याकडे लक्ष देत नाहीत, अशी ओरड सतत सुरूच असते. मुलांवर सरसकट चूक-बरोबर अशा फुल्या न मारता, कधीतरी फक्त त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायला, आपण तरी उपलब्ध असतो का? खरे तर या वयातल्या मुलांच्या भावविश्वाला समजून घ्यायला आपणच कमी पडतो. या वयात त्यांची जी मानसिक घुसळण होतेय, त्याची आपल्याला क्वचितच जाणीव असते. एकीकडे त्यांच्यावर माहितीचा प्रचंड मारा केला जातोय, तर दुसरीकडे खूप साऱ्या अनुभव आणि घटनांना त्यांना एकट्यानेच सामोरे जावे लागतेय. चांगले काय, वाईट काय, हे कळण्याच्या आधीच ते त्यात खोल गुरफटलेले असतात. अशा वेळी भावनेचा ओलावासुद्धा सगळ्यांनाच मिळतो, असे नाही.

सिडने हैरिस यांनी शिक्षणाची सुंदर व्याख्या केलीय, ते म्हणतात, ळँी ६ँङ्म’ी स्र४१स्रङ्म२ी ङ्मा ी४िूं३्रङ्मल्ल ्र२ ३ङ्म ३४१ल्ल े्र११ङ्म१२ ्रल्ल३ङ्म ६्रल्लङ्मि६२... म्हणजे आरशांना/काचांना खिडक्यांमध्ये परावर्तित करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असतो. स्वत:कडे, स्वत:च्या जीवन प्रवाहाकडे आणि सोबतच सभोवतालाकडे चिकित्सक नजरेने बघायला सुरुवात झाली की, निरंतर शिक्षणाची ही प्रक्रिया सुरू होते. हे सभोवतालचे जगच शाळा आणि अनुभव शिक्षक होतात.

मुंबईत असाच एक शिकण्या-शिकविण्याचा अभिनव प्रयोग ‘पुकार’ (पार्टनर्स फॉर अर्बन नॉलेज, अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड रिसर्च) या मुंबईतील स्वयंसेवी संस्थेने तरुणांसाठी चालविला आहे. तरुण मुलांमध्ये चिकित्सक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांनी स्वत:च्या जीवनाबरोबरच समाजाचाही सखोल विचार करायला सुरुवात करावी आणि अनुभवाधारित शिक्षणातून तरुणांची विवेकी वृत्ती विकसित व्हावी, या मुख्य हेतूंपर्यंत पोहोचण्यासाठी ‘कृती-संशोधन’ या माध्यमाचा उपयोग करावा असे ठरले. ‘संशोधन हा प्रत्येकाचा हक्क आहे’ या तत्त्वाला धरून, ‘पुकार’ मुंबईच्या वस्ती-तळीवर आतापर्यंत अनेक कार्यक्रम करत असल्यामुळे या हेतूंच्या सिद्धीसाठी ‘कृती-संशोधन’ हा उत्तम मार्ग असू शकतो, यावर आम्हा सर्वांचा विश्वास होता. वर्षभर तरुणांनी एकत्र येऊन वस्ती-पातळीवर गट-संशोधन करायचे, हे या उपक्रमाचे स्वरूप.

या अनुभवाधारित शिक्षण प्रक्रियेची सुरुवात ‘स्व’ भानातून होते आणि ‘समाज’ भानापर्यंत पोहोचते. त्यांचे संशोधन तर एका वर्षात संपते, पण विचारांची ही चाके अशीच अविरत सुरू राहतात. मग त्यांच्या खुल्या झालेल्या या खिडक्या अधिकच रुंदावत जातात आणि ही मुले नवनवीन क्षितिजे धुंडाळण्यासाठी खिडकीबाहेर कधीच झेपावलेली असतात.सुनील गंगावणे । प्रकल्प संचालक, पुकार

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र