शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

आजचा अग्रलेख: दोन सरली, तीन उरली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 07:29 IST

२०२४ मध्येच निवडणुका हाेतील, याचा विसर काही भाजप नेत्यांना पडला की काय असे वाटते. 

भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांत स्वतःला  जणू  निवडणूक लढविणारी यंत्रणा बनवले आहे. पक्ष सतत निवडणुकांचीच भाषा करताना दिसतो. उत्तर प्रदेशासह काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने तिथे आश्वासनांची खैरात आणि उद्घाटने, पायाभरणी आदी कार्यक्रमांचे सोहळे सुरू आहेत. महाराष्ट्रात मात्र विधानसभा निवडणुकांना तीन वर्षे शिल्लक असून, २०२४ मध्येच निवडणुका हाेतील, याचा विसर काही भाजप नेत्यांना पडला की काय असे वाटते. 

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे पूर्वाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यात शिवसेनेवर तोफ डागली. शिवाय भाजपची सत्ता घालविण्यास शिवसेना कारणीभूत ठरल्याने आगपाखडही केली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच २०१९ ची निवडणूक लढविली जाणार आणि सत्ता येताच तेच मुख्यमंत्री पदावर कायमचे राहणार अशी चर्चा ‘माताेश्री’वरच झाली हाेती, असे सांगून सत्ता गेल्याची खदखद व्यक्त केली गेली. इतक्या स्पष्ट चर्चेनंतर भाजप-सेनेची युती हाेऊन निवडणुका लढविल्या गेल्या असतील तर शिवसेनेचा अट्टहास चुकीचा हाेता का? असेल तर चर्चेतून मार्ग का काढला नाही? असाही प्रश्न यावर उपस्थित हाेताे. आता दाेन वर्षांनी हे सांगुन काय फायदा? शिवसेना  महाआघाडी करून सत्ता हस्तगत करेल, असे भाजपच्या राज्यातील नेत्यांना वाटले नव्हते आणि आजही त्यांचा त्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेचे दर्शन वारंवार होते. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन भाजपशी दाेन हात करावेत, असेही आव्हान अमित शहा यांनी दिले आहे. 

महाआघाडीकडे बहुमत असताना मुदतपूर्व निवडणुका  का घेतील? काेराेनाचे आव्हान, देशाची व राज्याची गंभीर आर्थिक परिस्थिती पाहता अशा प्रकारच्या राजकारणाची चर्चा करणे कितपत याेग्य आहे? दाेन वर्षे सरली आहेत, आणखी तीन वर्षे वाट पाहावी. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी तीन वर्षे थांबावे की! कार्यकर्ते समाेर असतील तर नेहमी कुरघाेडीच्या राजकारणाचीच भाषा वापरली पाहिजे असे नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस महाआघाडीचे सरकार सर्वच पातळीवर फार उत्तम कारभार करते आहे, असे कोणीही म्हणत नाही वा म्हणणार नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काेराेना संसर्गाचा सामना करताना जाे संयम दाखविला, जनतेला विश्वासात घेतले त्याचे गुण त्यांना द्यावेच लागतील. महाराष्ट्र हा विकसित प्रांत आहे. या प्रांतातून लाखाे स्थलांतरित मजूर माघारी गेले. ते परत आले. त्याचा ताण आला हाेता. शिवाय याच कालखंडात ईडी आणि इतर यंत्रणेची तपासचक्रे महाराष्ट्रात फिरत हाेती. त्याचा जाे परिणाम राजकारणावर व्हायचा ताे हाेत गेला. अशा गंभीर वातावरणात केवळ राजकीय सुंदाेपसुंदीची चर्चा करणे उचित नव्हे. या परिस्थितीशी दाेन हात करण्याऐवजी निवडणुका घ्या असे आव्हान देण्यापेक्षा महाराष्ट्राला मदतीचा हात देण्याची तयारी दाखवुन अमित शहा यांनी आश्वासित केले असते तर राज्यातील जनतेचे मन जिंकले असते. काेराेना संसर्गाचा पुणे शहरावर सर्वाधिक परिणाम झाला हाेता. 

संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण तेथे शिक्षण आणि राेजगारासाठी येतात. आयटी आणि एज्युकेशन हब ही पुण्याची ओळख झाली आहे. पुण्यात सर्वच पातळीवर भाजपची सत्ता आहे. अशा शहरात भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्याची भाषा वापरली पाहिजे. तीन वर्षांनी लाेकसभा आणि विधानसभेची निवडणूक आहे. तेव्हा सर्वच राजकीय पक्षांचे मूल्यांकन मतदार करतीलच. साेन्याचे अंडे देणारी काेंबडी हातून पळाल्याचा राग व्यक्त करावा, तशी चिडचिड भाजप नेत्यांनी करण्याचे कारण नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप आदी विषयांवरून राज्य सरकारला काेंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, याच प्रश्नावर भाजप सत्तेवर असताना काेणता ताेडगा काढला असता, हे सांगायला कोणी तयार नाही. कर्नाटकातील एस.टी. कर्मचाऱ्यानी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर संप केला हाेता. ताे माेडीत काढून त्यांची मागणी धुडकावून लावणारे कर्नाटकातील सरकार भाजपचेच हाेते आणि आजही आहे.  दोन वर्षे सरली आहेत, आता तीनच उरली आहेत. तेव्हा भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही सबुरीने घ्यावे हे अधिक प्रगल्भतेचे. त्यामुळे निवडणुकांचे आव्हान देण्याऐवजी भाजपने महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक मुद्दे मिळवावेत. ते मिळणे अवघड नाही. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाPoliticsराजकारण