शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

‘फॅशनेबल’ राहाल, तर बंदुकीची गोळी खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 08:23 IST

जे होण्याची भीती वारंवार व्यक्त होत होती, ती भीती अखेर खरी ठरली आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्यानं काढता पाय घेताच तालिबानी अतिरेक्यांनी तिथे आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देजे होण्याची भीती वारंवार व्यक्त होत होती, ती भीती अखेर खरी ठरली आहे.

जे होण्याची भीती वारंवार व्यक्त होत होती, ती भीती अखेर खरी ठरली आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्यानं काढता पाय घेताच तालिबानी अतिरेक्यांनी तिथे आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेनं जसजसं आपलं सैन्य परत मायदेशी बोलावलं, त्या प्रमाणात तालिबानीही त्या भागात आक्रमक होत गेले. आता तर देशातील जवळपास १५० पेक्षाही अधिक जिल्ह्यांवर त्यांनी पुन्हा आपला कब्जा केला आहे. पूर्वोत्तर प्रांत तखारसह अनेक प्रांत त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. तिथे अफगाण सरकारची नाही, तर तालिबान्यांची मनमानी चालते. आपले कठोर कायदे त्यांनी पुन्हा लागू केले आहेत. गेल्या काही काळात अफगाणिस्तानने जी काही प्रगती केली होती, ती केवळ काही दिवसांतच पुन्हा मागे ढकलली गेली आहे. महिलांच्या वाट्याला पुन्हा असह्य जिणं येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

तालिबान्यांनी आपला ‘फतवा’ जारी करताना महिलांना बजावलं आहे, ‘हिजाब’शिवाय आणि पुरुष नातेवाईक सोबत असल्याशिवाय एकट्यानं घराच्या बाहेर निघाल, तर याद राखा. आपली संस्कृती विसरून पाश्चा‌त्त्यांच्या आहारी जाल, तर परिणाम भोगण्यास तयार राहा!’ 

पुरुषांसाठीही नियम आहेत : प्रत्येक पुरुषानं दाढी राखलीच पाहिजे. जो दाढी राखणार नाही, त्यानं स्वत:च आपली जबाबदारी घ्यावी. आपल्या चुकीच्या कृत्याबाबत त्यांना जर काही शिक्षा झाली, तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही, असा तालिबान्यांचा आदेश आहेे. याशिवाय अनेक कट्टर कायदे त्यांनी आपल्या अखत्यारीतील प्रदेशात लागू केल्यानं अनेक ठिकाणच्या शाळा बंद झाल्या आहेत. महिलांनी नोकऱ्या सोडल्या आहेत. दवाखाने बंद पडले आहेत. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर हळूहळू गगनाला भिडत चालले आहेत. सर्वसामान्य अफगाणी नागरिक त्यात भरडले जात आहेत. सरकार आपली सुरक्षा करू शकत नाही, हे नागरिकांना पक्कं ठाऊक आहे. अमेरिकन सैन्य अफगाणमध्ये असतानाही त्यांचा उद्रेक सुरूच होता; पण आता तर तालिबान्यांनी खुलेआम अत्याचार सुरू केले आहेत.

अमेरिकन सैन्यानं माघार घेतल्यावर तालिबान्यांचे अत्याचार पुन्हा सुरू होतील, हे सर्वसामान्य नागरिकांनाही माहीतच होतं, त्यामुळे त्यांनी तेव्हापासूनच आपल्या संरक्षणाची काळजी स्वत:च घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक नागरिक, संस्था संघटित होत आहेत, शस्त्रांचा साठा आणि प्रशिक्षण त्यांनी सुरू केलं आहे. अफगाण सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची तयारी सुरू केली आहे; पण त्यात त्यांना कितपत यश येईल याविषयीही शंका आहे. कारण तालिबान्यांचं संख्याबळ आणि त्यांच्याकडे असलेल्या घातक, आधुनिक शस्त्रांचा साठाही जास्त आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांचा वचपा काढल्याशिवाय ते राहणार नाहीत,  अशा लोकांना ‘शिक्षा’ करायला त्यांनी सुरुवातही केली आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

तखर प्रांताचे गव्हर्नर अब्दुल्ला कारदुक म्हणतात, तालिबान्यांनी पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांनाही त्रास देणं सुरू केलं आहे. अनेक  सरकारी इमारतीही  बॉम्बस्फोटानं उडवून दिल्या जात आहेत. मुलींना शाळेत जाण्यापासून बंदी घातली आहे. तालिबान्यांच्या ताब्यातील अनेक भागांत सरकारी सेवाही बंद झाल्या आहेत. सगळ्या ठिकाणी त्यांनी लुटालूट सुरू केली आहे. सर्वसामान्यांना धाकात ठेवताना, तालिबान्यांनी ‘सक्तवसुली’ सुरू केली आहे. नागरिकांकडून बळजबरीनं अन्नधान्य आणि पैसा वसूल केला जात आहे. त्यास विरोध करणाऱ्यांना किंवा कुचराई करणाऱ्यांना सरळ ‘तालिबानी इंगा’ दाखविला जात आहे. तालिबान्यांनी कायदा हातात घेतला असून, कुठल्याही पुराव्याशिवाय लोकांना ‘शिक्षा’ करायला सुरुवात केली आहे.

२००१ मध्ये अमेरिकन सैन्यानं अफगाणिस्तानात तळ ठोकल्यानंतर गेल्या वीस वर्षांत जी काही थोडीफार प्रगती झाली होती, त्याला एकदम खीळ बसली असून, ही प्रगती पुन्हा माघारली गेली आहे. अमेरिकन तज्ज्ञांनीही हा अंदाज वर्तविला होता, तो काही दिवसांतच तंतोतंत खरा ठरू पाहतो आहे. तालिबान्यांच्या भीतीनं अनेक नागरिकांनी आताच देशाबाहेर पळ काढायला सुरुवात केली आहे. तालिबाननं आपली पकड जर आणखी मजबूत केली, तर आपल्याला देशाबाहेर पडणंही मुश्कील होईल, हे लोक ओळखून आहेत. त्यामुळे काबूलमधील अनेक देशांच्या दूतावासात हजारो लोकांनी व्हिसासाठी अर्ज केले आहेत. अमेरिकेनंही यासाठी शक्य ती मदत करण्याचं जाहीर केलं असून, मध्य आशियातील कजाकस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांशी बोलणी सुरू केली आहे.

हजारोंची देश सोडण्याची तयारीअफगाण सैनिक आणि तालिबानी यांच्यातील चकमकीही पुन्हा सुरू झाल्या आहेत. रक्तपात वाढला आहे. परिस्थिती आणखी बिघडेल हे लोकांनाही माहीत आहे. त्यामुळे आताच जवळपास ७५ हजार नागरिकांनी देश सोडण्याची तयारी चालविली आहे. इथे राहिलो, तर आम्ही जगणं विसरून जाऊ, असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाfashionफॅशनWomenमहिला