शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

आडावरचे भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 05:57 IST

पाण्याचा हा प्रश्न प्रादेशिक अस्मितेच्या पातळीवर नेणे किंवा त्यावर राजकीय पोळी भाजणे हे कोणासाठीही उचित ठरणारे नाही. भावनेपेक्षा वास्तवाचा विचार करून हा प्रश्न हाताळला, तर समन्यायी तत्त्वाला अर्थ आहे.

परतीच्या पावसाने दगा दिला आणि पाणी पेटायला लागले. दुष्काळाने मराठवाड्याचे कंबरडेच मोडल्याने जायकवाडीला पाण्याची मागणी सुरू झाली आहे. खालील माजलगावच्या धरणात अजिबात साठा नाही. परळी वीज केंद्रावर परिणाम झाला त्याहीपेक्षा मराठवाड्यात आताच पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. अशा परिस्थितीत जायकवाडीतील पाण्याची मागणी वाढली. त्या वेळी जायकवाडीत मुळातच साठा ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने समन्यायी पाणीवाटप तत्त्वानुसार आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांकडून ६ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणी जायकवाडीत सोडणे आवश्यक आहे. १७२ द.ल.घ.मी. पाणी वरून सोडावे लागणार याचा निर्णय परवा सोमवारच्या बैठकीत झाल्याने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतून असे पाणी सोडण्यास विरोध सुरू झाला. शेतकरी व राजकीय नेते, अशा दोन्ही आघाड्यांवर हा विरोध आहे. त्यांच्याकडेही कमी पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्यात आठ तालुके दुष्काळी आहेत. परतीच्या पावसाने हूल दिल्याने नद्याही कोरड्याच आहेत. रब्बीत कांद्याचे पीक न घेण्याचा निर्णय या भागातील शेतकऱ्यांनी घेतला. मराठवाड्याची परिस्थिती आज बिकट आहे. दुसºया भाषेत सांगायचे तर मराठवाडा आज जात्यात, तर नगर, नाशिक सुपात. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निकषानुसार न्यायालयीन निर्णयानंतर मराठवाड्याला पाणी मिळायला पाहिजे आणि तो निर्णय प्रशासनाने द्यायला पाहिजे होता; परंतु तो राजकीय नेत्याकडे सोपविल्याने आता या प्रश्नाचे राजकारण होणे अटळ आहे. या ६ द.ल.घ.मी. पाण्यासाठी मराठवाड्यात लोकप्रतिनिधींची जमवाजमव सुरू असून, सोमवारी बैठक आयोजित केली आहे. नगर-नाशिकमध्येही अशीच जमवाजमव सुरू आहे. यातील एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की, न्याय्य वाटा असतानाही दरवेळी जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी खळखळ होते; पण तिकडे गिरणामधून अजनात दरवर्षी चार आवर्तने बिनबोभाट सोडली जातात. हा विषय प्रशासकीय पातळीवर खंबीरपणे हाताळला असता, तर एवढी चर्चा झाली नसती; पण आता तो राजकीय विषय होणार आणि त्याचा संबंध निवडणुकीशी जोडला जाणार. आजकाल कोणत्याही प्रश्नाचे राजकारण करून त्याचा संबंध थेट मतांशी जोडण्याचा पायंडा पडल्यामुळे पाण्यासारख्या अत्यावश्यक गोष्टीचे राजकारण होणे अपेक्षित होते. वास्तव म्हणजे आज नगर-नाशिक आणि मराठवाडा या तिन्ही ठिकाणी पुरेसा जलसाठा नाही. नाशिकमध्ये १३ तर गंगापूरमध्ये ११ टक्के जलसाठा कमी आहे. आज नद्या कोरड्या असल्याने ६ द.ल.घ.मी. पाणी जायकवाडीत पोहोचण्यासाठी नऊ द.ल.घ.मी. पाणी सोडावे लागणार. कारण २ द.ल.घ.मी. पाणी जिरणारे आहे, म्हणजे वाया जाणारे, आज ते एका अर्थाने परवडणारे नाही. एका अर्थाने हा अपव्यय आहे. समन्यायी पाणीवाटपात अशा वाया जाणाºया पाण्याचा उल्लेख नाही.

जायकवाडीत २६ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते, असा निष्कर्ष होता; परंतु नव्या निकषामुळे आता १५ टक्के पाण्याचेच बाष्पीभवन होते, असा नवा निष्कर्ष पुढे आला आहे. वाया जाणारे २ द.ल.घ.मी. पाणी वाचवायचे असेल, तर आज नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. पाइपद्वारे पाणी पोहोचवता येईल का याचा विचार व्हावा. कारण पाण्याची बचत महत्त्वाची. या प्रश्नावर प्रादेशिक अस्मिता बाजूला ठेवून तिन्ही ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे. एकमेकांवर बाह्या सरसावून साध्य काहीही होणार नाही. मराठवाड्यासारखीच परिस्थिती विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात आहे. खडकपूर्णा धरणात पाणी नाही. तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीतील जत, कवठेमहांकाळ, खटाव, आटपाडी या जिल्ह्यांमध्येही परिस्थिती बिकट आहे. खान्देशात दोन महिन्यांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशा सर्वत्र अस्मानी संकटाच्या परिस्थितीत सामंजस्याने मार्ग काढणे सोईस्कर ठरू शकते. कोणत्या मुद्द्याचे राजकीय भांडवल करायचे याचे भान ठेवले की, सगळेच प्रश्न सोपे असतात आणि संकटाचा मुकाबला एकमेकांच्या साथीने करावा लागतो. आडावरचे भांडण घरापर्यंत आणत नसतात, हे भान ठेवणे आवश्यक आहे.