शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सारे काही अधिकारी आणि गुंडांच्या हफ्तेखोरीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 5:33 AM

मुंबई हॉकर्स युनियनने १९८५ सालामध्ये सर्वोच्च न्यायालयात फेरीवाल्यांच्या खटल्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या आदेशात फेरीवाल्यांना पदपथावर धंदा करू देण्याचे सांगितले होते.

- शशांक रावमुंबई हॉकर्स युनियनने १९८५ सालामध्ये सर्वोच्च न्यायालयात फेरीवाल्यांच्या खटल्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिलेल्या आदेशात फेरीवाल्यांना पदपथावर धंदा करू देण्याचे सांगितले होते. सोबतच लोकांनाही पदपथावर चालण्यास जागा सोडण्याचे म्हटले होते. यासंदर्भात सरकारने कायदा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र सरकारने कायदा करण्याऐवजी फेरीवाल्यांसंदर्भात २००३, २००७ आणि २०१० साली पॉलिसी आणल्या. पॉलिसी राबवताना ती बंधनकारक नसल्याने त्याची अंमलबजावणीही झाली नाही. त्यावर संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ९ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात कायद्याची निर्मिती होईपर्यंत २०१० सालच्या फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने टाऊन वेंडिंग कमिटी तयार केली. सर्वेक्षणाचा मुद्दा समोर आल्यावर पुढील प्रक्रिया थांबली.२०१४ साली फेरीवाल्यांना संरक्षण देणारा कायदा संसदेत संमत झाला. त्यात २०१० सालच्या धोरणानुसार कोणत्याही शहरातील एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्के फेरीवाले असावेत, अशी स्पष्ट तरतूद केली होती. शिवाय फेरीवाल्यांची नोंदणी होईपर्यंत त्यांना कुठेही हलवू नये, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले होते. तरीही मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. मुळात जनगणनेनुसार मुंबई शहरात १ कोटी २० लाख लोकसंख्या राहते. त्यांच्या अडीच टक्के म्हणजे सुमारे ३ लाख फेरीवाल्यांची मुंबईला गरज आहे. सध्या मुंबईत अडीच लाख फेरीवाले आहेत. याउलट सरकारने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत केवळ १ लाख फेरीवाल्यांचा दावा केला आहे. हे हास्यास्पद आहे. कारण टीसने १८ वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत १ लाख ८ हजार फेरीवाल्यांचा दावा केला होता.फेरीवाल्यांना धंदा करण्याचा अधिकार असून त्यांना अधिकृत कण्याचे काम सरकारचे आहे. मुळात सरकारने गेल्या ३० वर्षांपासून नवे परवाने दिलेले नाहीत. त्याआधी सुमारे १५ हजार फेरीवाल्यांना परवाने दिलेले आहेत. २०१४ साली झालेल्या कायद्यानुसार सर्व फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना परवाने देण्याची गरज आहे. प्रशासनाकडून नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याऐवजी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. फेरीवाल्यांविरोधात नियम आणले जात आहेत. कारण कायद्यानुसार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून आहे त्याच जागेवर अधिकृत करण्याचे कायदा सांगतो. फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि प्रमाणपत्र तसेच धंद्याची जागा त्रासदायक ठरत असेल, तर नोटीस देऊन स्थलांतर करण्याची गरज आहे. मात्र तेथे फेरीवाल्यांच्या आधीच्या ठिकाणी जितका धंदा होत होता, तितकाच धंदा होतोय का? ही पाहणी होणे गरजेचे आहे.आजही प्रशासनाकडून वेगवेगळे कारण देत फेरीवाल्यांवर नियमबाह्य कारवाई सुरू आहे. फेरीवाले स्वत:चे भांडवल लावून धंदा करतात. मात्र प्रशासन अधिकारी आणि गुंड हातमिळवणी करून वर्षाला सुमारे २०० कोटी रुपयांचा हप्ता लुबाडत आहेत. म्हणूनच संघटना म्हणून मुंबईतील सर्व फेरीवाल्यांना एकत्र आणून पुढील वाटचाल केली जाईल. रस्ते अडवून बसायला कायदा सांगत नाही. मात्र हफ्तेखोरी बंद होईल, या भीतीने प्रशासन कायद्याची अंमलबजावणी होऊ देत नाही. आम्हाला लोकांना सुविधा पुरवताना फेरीवाल्यांची उपजीविकाही वाचवायची आहे. मात्र फेरीवाले हटवले, तर नागरिकांना मॉल आणि मार्केटमधील वस्तू परवडतील का, याचा विचारही जनतेनेच करावा.(लेखक हे मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आहेत.)>पादचारी पूल प्रवाशांसाठीच आहेयाच पुलावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची वेळ येताच दोन्ही प्रशासन हात वर करतात. रेल्वे महापालिकेवर जबाबदारी ढकलते तर महापालिका रेल्वे हद्दीत येत असल्याचे म्हणत कारवाई टाळते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली. मात्र ‘नव्याचे नऊ दिवस’ असे स्वरूप या कारवाईचे होता कामा नये. बहुतांशी स्थानकांवर फेरीवाल्यांना कधी आणि कुठे कारवाई होणार आहे, याची माहिती असते. यामुळे कारवाईचा ‘राउंड’ केवळ नावासाठी राहतो. काही स्थानकांवरील पादचारी पुलावर फेरीवाल्यांना आर्थिक सपोर्ट हा स्थानिक ‘बडी हस्तीं’चा असतो. सध्या स्थानकासह पादचारी पुलांवरील फेरीवाले हटवण्यात आले आहेत. कायमस्वरूपी कारवाई सुरू केल्यास परिस्थितीमध्ये बदल शक्य आहे.- मधू कोटियन, सदस्य,विभागीय रेल्वे उपभोक्ता समिती

टॅग्स :hawkersफेरीवाले