शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

'अजातशत्रू' - अटलबिहारींना जयंतीदिनी अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 09:49 IST

माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी.

माणसाचे मोल त्याच्या प्रस्थानानंतर होते. त्याचा चांगुलपणा तेव्हाच उठून दिसतो असे सर्वसामान्य माणसाबद्दल बोलले जाते; पण अर्धशतकात राजकीय अवकाशात तळपत राहूनही चांगुलपणा आणि केवळ चांगुलपणा टिकवणारे नाव अटलबिहारी वाजपेयी. त्यांच्याविषयी कधीही कुणीही कटुपणे बोलल्याचे आढळत नाही की, ते कधीही विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनले नाही मग ती टीका राजकीय असो की, वैयक्तिक. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदरभावच होता. त्यांच्या जाण्याने हा सारा आदरभाव उमळून बाहेर आलेला नाही, तर त्यांच्याप्रति सर्वांच्या सद्भावनेचा हा प्रवाह अखंड वाहात होता. ते सत्तेवर म्हणजे पंतप्रधानपदासारख्या काटेरी अधिकारपदावर असतानाही त्यांना कधी टीकेचे धनी व्हावे लागले नाही किंवा त्यांच्या निर्णयावर हेतूबद्दल कुणी शंका व्यक्त केली नाही.

राजकीय आणि सामाजिक नीतिमूल्यांचा पारदर्शकपणा त्यांनी स्वीकारल्यामुळे हे शक्य झाले म्हणून प्रदीर्घ राजकीय जीवनात राजकीय शत्रू नसणे ही खरी मिळकत म्हणावी लागेल. राजकारणात टिकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, लटपटी, मूल्यांना घालवी लागणारी मुरड या गोष्टींना अटलजींच्या जीवनात थारा नव्हता तर राजकीय मूल्य व नीतिमत्तेची चाड होती म्हणून १३ दिवसाचे सरकार जेव्हा धोक्यात आले त्यावेळी विचलित न होता त्यांनी सत्ता सोडली. अनेक संधिसाधू कायम राजकीय कुंपणावर संधीची वाट पहात बसलेले असतात; पण त्यांना संधी न देता अटलजींनी सत्ता सोडली हे त्यांच्यासारखा राजकारणीच करू जाणे. या ठिकाणी दुसरा असता तर राजकीय खरेदी विक्रीचा खुलेआम बाजार भरवला असता. सत्ता पाहिजे पण मूल्याधिष्ठित ही त्यांची भूमिका समर्थकांसमवेत विरोधकांनाही भावली. सामान्य माणसाच्या मनात जे चालते त्याला त्यांनी प्रतिसाद दिला म्हणूनच या माणसाची उंची आभाळ व्यापून टाकले. खºया अर्थाने ते अजातशत्रू एवढ्या उंचीवर जाऊनही साधेपणा जपणारा, सामान्य कार्यकर्त्याला, माणसाला आपला वाटणारा हा माणूस धकाधकीच्या राजकीय प्रवासात अनेकांशी कौटुंबिक स्रेहबंध जाणीवपूर्वक सांभाळताना दिसला हे त्यांचे वैशिष्ट्य. अशा स्रेहबंधांच्या आडव्या उभ्या धाग्यातूनच त्यांचे हे सोनसळी व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर उभे राहते. गुजरातच्या दंगलीवर स्वपक्षीयांना खडसावणारे अटलजीच आणि १९७२ च्या युद्धानंतर संसदेत इंदिराजींना ‘दुर्गा’ संबोधणारेही अटलजीच. एकच व्यक्तिमत्त्वाच्या या दोन बाजू आपण पाहिल्या. विरोधकांचाही सन्मान करण्याची ही वृत्ती फक्त त्यांच्या ठायी होती म्हणून त्याचे मोठेपण, माणूसपण हे पक्षातित ठरते. हिंदुत्वावादी विचाराचे असूनही ते विरोधकांनाही आपले वाटत याला कारण राजकीय सुसंस्कृतपणा. १९९८ ते २००४ या सहा वर्षाच्या ३० पक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे नेतृत्व अटलजींनी केले. हे सारे घटक पक्ष काही भाजपच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे नव्हते तरीही या सरकारने कार्यकाळ पूर्ण केला. मधूनच काही पक्ष बाहेरही पडले होते; कुणी अटलजींच्या कार्यपद्धतीवर टीका केली नाही की, जॉर्ज फर्नांडिस ममता बॅनर्जी, जयललिता, नितीश कुमारांसारखे सैध्दांतिक पातळीवरील भाजपचे विरोधक या सरकारमध्ये सहभागी झाले होते ते केवळ अटलजींमुळे. अशा गोष्टी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण करणाºया नेत्यामध्ये अभावाने आढळतात, येथेच त्यांचे माणूसपण अधिक उठून दिसते. म्हणून आज भाजपचे अटलबिहारी नव्हे तर सर्व सामान्य भारतीयांचे अटलजी गेले आहेत, आपला सारा चांगुलपणा ठेवून.

खुलुस वो प्यार के मोती लुटाके चलता हैसभी को अपने गलेसे लगाके चलता है।किसी को हो न सका उसके कद का अंदाजावो आॅसमा है मगर सर झुका के चलता है।

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधान