शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

शेती शाळेत शिकवली जायलाच हवी, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 08:00 IST

शेती शास्त्राचा गंध नसलेले शेतकरी आणि शेतीबद्दल उदासीन असलेले अधिकारी शेतीला कसे काय तारू शकतील?- हे चित्र बदलले पाहिजे!

-प्रा. तुकाराम बिडकर

२००४. मी अकोला जिल्हा परिषदेचा कृषी सभापती असताना  राज्यातील सर्व कृषी व पशुसंवर्धन सभापतींच्या परिषदेत ‘कृषी विषय हा शालेय शिक्षणामध्ये समाविष्ट करावा,’ असा ठराव मांडला, तो  सर्वानुमते संमतही झाला. त्यापूर्वीपासूनच  मी या विषयासाठी प्रयत्न करीत होतो. या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. ‘शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे’ असे म्हटले जाते. ‘शेतकरी पिकवतो, म्हणून जग खाते’ हेही खरेच! आपल्या देशातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. करोडो लोकांना यातून रोजगार मिळतो. कोरोनाच्या काळात सर्व उद्योग बंद असताना  सुरू राहिला तो ‘कृषी उद्योग’.

सामान्यत: प्रत्येक उद्योगाच्या निर्मितीसाठी त्या धंद्याचे शिक्षण,  प्रशिक्षण घेतले जाते; पण दुर्दैवाने शेती  करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शास्त्रशुद्ध शिक्षण, प्रशिक्षण दिले जात नाही. पारंपरिक पद्धतीनेच शेती केली जाते.  आज ‘कृषी शिक्षण’ मिळते ते फक्त  मोजक्याच लोकांना.  त्यातही हे शिक्षण घेणारे बहुतांश नोकरीकडे किंवा इतर उद्योगाकडे  वळतात. ते प्रत्यक्ष शेतीत क्वचितच येतात.  कृषी विद्यापीठे  व कृषी विभाग  शेतकऱ्यांना मार्गदर्शन  करण्यास  अकार्यक्षम ठरले आहे. आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो तो ‘कृषी सेवा केंद्रा’चा व्यावसायिक. त्यांच्या भरोशावर आजचा  शेतकरी शेती करताना दिसतो.  

अर्थात ‘कृषी सेवा केंद्र’ जे  सांगणार त्यामध्ये  त्यांच्या कंपनीचे व त्यांचेच हित असेल. पर्यायाने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढत जातो अन् उत्पन्न कमी होऊन शेतकरी नागवला जातो. शिक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांचे संघटन होत नाही; आणि संघटन नसल्यामुळे शासन दरबारी त्यांचे प्रश्न सुटत नाहीत.  खरी गंभीर बाब म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीने शेतकऱ्याचा मुलगा शेतीपासून तोडला आहे. तो शेती करायला तयार नसतो. नोकरीच्या मागे धावतो.

नोकरी मिळाली नाही तरच नाइलाजाने,  जबरदस्तीने त्याला शेती करावी लागते. मग अशा  मानसिकतेच्या शेतकऱ्याकडून प्रगत शेती कशी होणार?  शेवटी तो शेतकरी विवंचनेत व आर्थिक डबघाईत  पुरता अडकला जातो. अशातच  आज अनेक उपक्रम व  प्रकल्पांमुळे ‘उपजाऊ’ जमीन कमी होत आहे. बाकी सगळे मिळेल; पण अतिरिक्त जमीन कोठून आणणार?  हे फार मोठे संकट  भविष्यात  निर्माण होणार आहे. पूर्वी म्हण होती ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार अन् कनिष्ठ नोकरी’ परंतु आज हे चक्र उलटे झाले असून, शेती ही कनिष्ठ तर नोकरी ही उत्तम झाली आहे.  म्हणून शेती व्यवसायाकडे शेतकऱ्यापासून तर शासनापर्यंत सर्वांनी  लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 शेतीला उत्तम करायचे  असेल तर प्रत्येकाला पहिल्या वर्गापासून तर  दहाव्या  वर्गापर्यंत शेती शिक्षणासोबतच  पशुसंवर्धन, दुग्धविकास,  मत्स्यपालन,  कृषी विज्ञान,  फलोत्पादन,  कृषी अभियांत्रिकी इत्यादी अनेक विषयांचे ज्ञान द्यावे लागेल.  प्रत्यक्ष शेती करणाऱ्यांना आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना शेतीची सविस्तर माहिती होणे गरजेचे आहे.  त्याकरिता ‘शेतीचे शिक्षण’ ही काळाची गरज आहे. त्यातून सुशिक्षित शेतकरी निर्माण होतील, शेतीचे अर्थशास्त्र सर्वांना समजेल, शेती समृद्धीकडे जाईल. आजची कोरडवाहू शेती म्हणजे फार मोठा ‘जुगार’ आहे याचीही जाणीव समस्त जणांना आपसूकच  होईल. या दृष्टचक्रातून मग शेतकऱ्याला कसे बाहेर काढता येईल याचा निश्चितच विचारसुद्धा होऊ शकेल. कोणताही व्यवसाय फायद्याचा असला तरच तिकडे लोक जातात; म्हणून शेती हा  फायद्याचा धंदा आहे, हे सिद्ध करावं लागेल. 

‘शेतीला उत्तम’ करण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे व जास्त उत्पन्न मिळवणे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे,   शेत मालाला हमी भाव देणे,  शेतीला उद्योगाचा दर्जा देणे, उत्तम बियाणे, खतनिर्मिती करणे, शेत मालावर प्रक्रिया उद्योग उभे करणे, प्रक्रिया केलेल्या शेतमालाची निर्यात करणे, त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे इत्यादी महत्त्वाच्या बाबी  करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला ‘शेतीचे शिक्षण मिळणे’ हाच आता यावर रामबाण उपाय ठरणार आहे. सध्याच्या पारंपरिक, प्रचलित  शिक्षण पद्धतीतून तयार झालेले शेतकरी,  शेती शास्त्राचा गंध नसलेले अधिकारी अन् शेतीबद्दल उदासीन असलेले पदाधिकारी शेतीला कसे काय तारू शकतील? त्यासाठी  शालेय शिक्षणात ‘शेती विषय’ हा सक्तीचा करणे हाच आता सक्षम पर्याय  आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी