शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार
2
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
5
नागपूरचा डॉली चहावाला सातासमुद्रापार; मालदीवच्या समुद्रकिनारी टपरी, पर्यटकांनी घेतला आस्वाद
6
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
7
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
8
MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
9
संगमरवरी बांधकाम आणि बरंच काही! अमिताभ बच्चन यांच्या घरातल्या मंदिराचे सुंंदर Inside फोटो बघा
10
राम मंदिर उभारणीमुळे पराभव, शिंदे गटाच्या उमेदवाराचा दावा
11
Home Loan EMI च्या त्रासातून सुटका करायची असेल ही ट्रीक नक्की वापरा; गृहकर्ज संपेल
12
स्वानंदीने लक्ष्मीकांत बेर्डेंचा आतापर्यंत न पाहिलेला फोटो केला शेअर, चाहते करताहेत प्रेमाचा वर्षाव
13
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
14
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
15
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
16
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
17
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
18
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
19
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
20
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या

गोव्यात जमीन विकास नियमांना नव्याने विरोध का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2018 9:14 PM

गोव्यातील जमीन रूपांतर कायद्याविरोधात एनजीओ कोर्टात गेल्या आहेत, त्यामागे कारणे काय आहेत? नगर नियोजन नियमात बदल करून राज्य सरकार जमिनींच्या रूपांतरांना सरसकट मान्यता देत राज्याचे वाळवंटच करण्याचे कारस्थान रचत असल्याच्या आरोपात कितपत तथ्य आहे?

- राजू नायक

नगर नियोजन नियमात बदल करून राज्य सरकार जमिनींच्या रूपांतरांना सरसकट मान्यता देत राज्याचे वाळवंटच करण्याचे कारस्थान रचत असल्याच्या आरोपात कितपत तथ्य आहे?

राज्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी गोवा शहर आणि नगर नियोजन कायद्यात बदल करून घेऊन जमीन रूपांतरांविषयीचे नियम सोपे केले आहेत यात तथ्य आहे; परंतु हे नियम राज्याचे हित आणि भविष्य यांना बाधा आणतील काय, हा खरा प्रश्न आहे. नियोजन नियमात केलेल्या बदलांना गोवा फाऊंडेशनने यापूर्वीच उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

राज्याच्या नियोजित विकास प्रक्रियेला बाधा निर्माण करीत प्रादेशिक आराखडय़ातील बरीच कृषी क्षेत्राची जमीन रूपांतरित करण्यासाठी खात्याला अमर्याद अधिकार प्राप्त झाले आहेत, असा दावा दावेदार गोवा फाऊंडेशनचे क्लॉड आल्वारीस यांनी आपल्या अर्जात केला आहे. गोवा नगर नियोजन (सुधारणा) कायदा (कलम 16 ब) २०१८ ऑक्टोबरमध्ये संमत झाला असून त्यात झोनमध्ये बदल करण्यास अनुमती आहे. लक्षात घेतले पाहिजे की गेली १५ वर्षे राज्यात एनजीओ जमीन रूपांतरांबाबत सतत आक्रंदन करीत आहेत. २००२ मध्ये त्याविषयी एक प्रखर आंदोलनही छेडण्यात आले होते; परंतु त्यामुळे नवा प्रादेशिक आराखडा शितपेटीत ठेवावा लागला व बेकायदेशीर जमीन रूपांतरांना ऊत आला. त्यावर मात करण्यासाठी सरकारने काही बदल केले आहेत.

या खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेय की खासगी व्यक्तींची जमीन विकासापासून वंचित ठेवण्यात आलेली आहे, ते बेकायदेशीररित्या जमिनींचे रूपांतर करून व्यवस्थित रस्ते व सांडपाणी व्यवस्था न करता विकून टाकतात. तेथे बेकायदेशीर घरे उभी राहिली आहेत. अशा जमीन मालकांना दिलासा देऊन त्यांना जमिनी विकून टाकण्यापासून परावृत्त करण्याची ही योजना आहे. अशा जमीन मालकांना ही जमीन सुरक्षित राखण्यासाठी अन्यत्र जमीन मिळवून देणे आणि त्याचे हित साधणो हा या योजनेचा हेतू आहे. अशा जमीन मालकांचेही अर्ज वैयक्तिकरित्या तपासून सरकारची अधिकारिणी निर्णय घेणार आहे. मंत्री म्हणाले की सरकारच्या एकूणच हेतू संबंधात संशय बाळगणे योग्य ठरणार नाही.

गोव्यातील बरीचशी जमीन शेती, वने, जलस्रोत, खाजने, कुळागरे या रचनेत मोडते व त्या जमिनी सुरक्षित राखण्यासंदर्भात कडक निर्बंध आहेत. इतर जमिनींमध्येही विकास करण्यास विरोध करणे अयोग्य आहे, असे सरदेसाई म्हणतात. ते म्हणाले : राज्यातील सांगे, केपे, डिचोली अशा तालुक्यांमध्ये जमीन उपलब्ध आहे आणि तेथे बेकायदेशीररित्या जमीन रूपांतरे चालू आहेत. त्यांच्याविरोधात अजूनपर्यंत राज्यातील एनजीओ पाऊल उचलू शकलेल्या नाहीत की त्यांच्याकडे या बेकायदा रूपांतरांसंदर्भात उपायही नाहीत. गेल्या पाच वर्षात राज्यातील दोन कोटी चौ.मी. जमीन रूपांतरित झाल्याचा दावा त्यांनी केला.

गेल्या २० वर्षात राज्याचा अनियोजित विकास झाला व गोव्याच्या प्रवृत्तीला न शोभणारे प्रकल्प व गृहनिर्माण वसाहती येथे निर्माण झाल्या. त्यात बरेच ग्रामीण भाग कोसळले व सासष्टीसारख्या ख्रिस्ती प्राबल्याच्या तालुक्यात विकासाचा असमतोल निर्माण झाला. त्यामुळे ख्रिस्ती चर्च धर्मसंस्था संतापली; परंतु या संस्थेनेही आपल्या जमिनीत भरमसाट बांधकामे उभी केली आहेत. या संस्थेला राज्यात बिगर ख्रिस्तींचा भरणा वाढत जाऊन आपण अल्पसंख्य होत असल्याची भीती आहे. भीती अनाठायी नाही; परंतु नियोजनबद्ध विकास कोणालाच नको आहे. बेकायदेशीर जमीन रूपांतरांवर नियंत्रण यावे, जमीन मालकांना योग्य भरपाई व न्याय मिळावा व राज्याचा स्वयंपोषक विकासही व्हावा अशा सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवा