शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

स्वबळानंतर शिवसेनेची पाऊले युतीकडे

By यदू जोशी | Updated: October 20, 2018 06:22 IST

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचा पूर्वानुुभव असला तरी कालचे त्यांचे भाषण निराशा करणारे होते.

विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवाजी पार्कवर गुरुवारी आलेल्या तमाम शिवसैनिकांनी खरेच हे सोने लुटले असेल की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकून त्यांचा वैचारिक गोंधळ वाढला असेल, असा प्रश्न पडतोय. त्यांच्या भाषणाच्या आधी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. संजय राऊत आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने भाषणे केली त्यावरून युती तोडण्याचीच घोषणा उद्धव त्यांच्या भाषणात करतील, असे वातावरण तयार झाले होते. भाजपा, नरेंद्र मोदींना आता गाडूनच आम्ही शांत होऊ, असा देसाई-राऊत-कदमांचा आवेश होता. प्रत्यक्षात ठाकरे यांनी शिवसेना लोकसभेची वा विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणारच, असा कोणताही निर्धार बोलून न दाखविता आपल्या पक्षातील नेत्यांच्या भावनांवर पाणी फिरवले.

ठाकरे यांच्या भाषणातील आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत असल्याचा पूर्वानुुभव असला तरी कालचे त्यांचे भाषण निराशा करणारे होते. ठोस भूमिकेचा अभाव दिसून आला. पक्षाचे नेते एक बोलतात आणि सर्वोच्च नेता मात्र त्याला तिलांजली देत कुठलीही ठोस भूमिका घेत नाही असा विरोधाभास क्षणोक्षणी जाणवला. रा.स्व. संघाचे सरसंघचालक नागपूरच्या विजयादशमी उत्सवात आणि इकडे शिवाजी पार्कवर ठाकरे काय बोलतात हे अनुक्रमे स्वयंसेवक आणि शिवसैनिकांसाठी आगामी वर्षाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचनांसारखेच असते. शिवसैनिकांच्या मनातील शंकाकुशंका दूर करीत त्यांना दिशा देण्याचे काम बाळासाहेब शिवाजी पार्कवरील भाषणातून करीत असत. या ठाकरी शैलीच्याच अपेक्षेने शिवसैनिक हे उद्धव यांनाही ऐकायला येतात. ‘मी काय बोलणार? माझ्या आधीचे लोक बोलले आहेतच. मी राजकारणावर बोलणार नाही. आता ज्योतिषावर, हवामानावर बोलतो’ ही उद्धव यांच्या कालच्या भाषणातील वाक्ये ठाकरेंकडून अपेक्षित असलेल्या टोकदार भूमिकेशी मेळ खाणारी नव्हती. सध्या देशभर गाजत असलेल्या आणि विशेषत: काँग्रेसने ज्यावर रान उठविले आहे त्या राफेल प्रकरणाविषयी एक शब्दही उद्धव बोलले नाहीत हेही अनाकलनीय होते. राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन शिवसेनेने पुन्हा एकदा भावनिक राजकारण सुरू केले आहे. स्वत: उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. आपले जाणे हा पहिला इशारा असेल. त्यानंतरही मंदिर बांधले गेले नाही तर तमाम हिंदूंना घेऊन आम्ही ते बांधू, असे उद्धव यांनी जाहीर केले. मात्र, त्याविषयीचा कोणताही ठोस कार्यक्रम त्यांनी दिला नाही.

भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपाचे सगळे नेते लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युती होणारच असे सांगत आले आहेत. मात्र, शिवसेनेने स्वबळावरच लढू आणि भाजपाला जागा दाखवू अशी भाषा चालविली आहे. उद्धव यांनी मात्र कालच्या सभेत स्वबळाला बगल दिली. स्वबळाचा नारा देणाऱ्या उद्धव यांचे पाऊल कालच्या सभेत मात्र युतीच्या दिशेने पडले. मोदीजी! तुम्ही पुन्हा सत्तेत येऊ नये अशी विकृती आमच्या मनात नाही, असे सांगत त्यांनी तुटेपर्यंत ताणणार नसल्याचे संकेत दिले.

(लेखक 'लोकमत'मध्ये वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत.)

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDasaraदसराBJPभाजपा