शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानच्या दुर्दैवाचे दशावतार झाले, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 07:28 IST

Afghanistan Crisis: तालिबानचा जुनाट, मध्ययुगीन व्यवहार सर्वसाधारण अफगाणींना खटकत नसेल, तर बदलाची ऊर्मी आणि आग कशी धगधगणार? 

- निळू दामले(ज्येष्ठ पत्रकार)

अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा मिळवल्याचं स्पष्ट झाल्यावर वृत्तवाहिनीवर बोलताना एका अफगाण महिलेला रडू कोसळलं. “उद्या मी जिवंत असले तर कशी असेन, ते मला माहीत नाही,”- असं ती उद्वेगाने  म्हणत होती.- या दुर्दैवी देशाबाबत जगाची प्रतिक्रिया काहीशी तशीच आहे. अफगाण लोक  जीवाच्या आकांतानं उडणाऱ्या विमानाला चिकटून देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करताहेत, मरताहेत आणि आपण सारे हतबल होऊन दुर्दैव उलगडताना पाहात आहोत!

अमेरिका वीस वर्षं अफगाणिस्तानात मुक्काम करून होती. प्रचंड सैन्यबळ आणि पैशाचा वापर करून अमेरिकेनं तालिबानला सत्तेपासून दूर ठेवलं. अमेरिकेनं सैन्य माघारी बोलावल्यामुळंच आता तालिबानचं फावलं आहे, असं काही लोक म्हणतात.

अमेरिकेच्या अध्यक्षांनीही आपली हतबलता जाहीर बोलून दाखवली आहे. अमेरिका आता आणखी दोन वर्षं काय किंवा पाच वर्षं काय अफगाणिस्तानात राहिली, तरी फरक पडणार नाही; मग कशाला विनाकारण तिथं अडकून पडायचं, असा त्यांचा सूर दिसतो.

तालिबानचं क्रौर्य अमान्य असणारे खूप लोक आणि देश जगभरात आहेत. त्यांनी काय केलं असतं तर तालिबानला अफगाणिस्तान बळकावण्यापासून  दूर ठेवता आलं असतं? 

मलाला युसुफझाई शाळेत जाऊन शिकत होती म्हणून तालिबांनी तिच्या चेहऱ्यावर गोळ्या झाडल्या. मलालाला ‘नोबेल’सह अनेक बक्षिसं आणि सन्मान मिळाले. पण, ती पाकिस्तानात किंवा अफगाणिस्तानात परतू शकली नाही. ती ब्रिटनची रहिवासी झाली. ज्या दोन देशांत तिला छळ सहन करावा लागला त्या तिच्या देशांत ती राहू शकत नाही; याचा अर्थ काय होतो? एकूणात अफगाणिस्तान  स्त्रिया,  असाहाय्य माणसं यांना न्याय देऊ शकत नसेल तर जगानं काय करायचं?

अफगाणिस्तानच्या सामाजिक, सार्वजनिक व्यवहारावर अफगाण संस्कृतीचा प्रभाव आहे. माणसं हजारा असोत, ताजिक असोत, उझबेक असोत की पश्तू, त्यांच्या त्यांच्या जमातीच्या परंपरा आणि रूढी यांचा प्रभाव त्यांच्यावर आहे. अफगाण माणसं अफगाणिस्तानात असतात तोवर  स्त्रियांना माणूस म्हणून वागवायला तयार नसतात.  अफगाणी परदेशात गेले तर तिथं मात्र ते आपल्या स्त्रियांना ठीक वागवतात. स्वतःच्या देशात त्यांच्या लेखी स्त्री हे  मुलं जन्माला घालणारं यंत्र, मुकाट घरकाम करणारी एक व्यक्ती, शारीरिक भूक भागवणारा फक्त एक प्राणी असतो. लोकशाही, मानवी अधिकार आणि स्वातंत्र्य, विज्ञान इत्यादी गोष्टी अफगाण समाजात रुळलेल्या नाहीत. त्यामुळंच तालिबानचं स्त्रीविषयक वागणं किंवा एकूणच तालिबानचा मध्ययुगीन व्यवहार अफगाण समाजाला खटकत नाही... अशा स्थितीत बाहेरच्या माणसांनी काय करायचं?

रशियानं कायदे करून या देशात आधुनिकता रुजवण्याचा प्रयत्न करून पाहिला. अफगाणांनी ते मान्य केलं नाही, रशियनांना हाकलून दिलं. अमेरिकेनं अगदी मर्यादित हेतूसाठी अफगाणिस्तानात प्रवेश केला. अफगाणिस्तानातून आपल्यावर हल्ले होऊ नयेत याचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात गेलं होतं. अफगाण सैन्याला प्रशिक्षित करणं आणि सरकारला स्थिर पायावर उभं करणं असा प्रयत्न अमेरिकेनं केला. अफगाण मन समजून घेऊन ते सुधारण्याचा प्रयत्न मात्र अमेरिकेनं केला नाही.२००१ नंतर अफगाणिस्तानात तीन निवडणुका झाल्या. तालिबानचा निवडणुकांना विरोध होता. बोटावर मतदान केल्याची खूण (शाईचा ठिपका) दिसला की तालिबान ते बोट तोडून टाकत. लष्कर आणि पोलिसांची मदत घेऊन निवडणुका घडवण्यात आल्या. इतका कडेकोट बंदोबस्त झाल्यावरही जेमतेम वीसेक टक्के लोकांनीच मतदान केलं. तेही बहुतांशी मोठ्या शहरात. बहुसंख्य लोकांनी आपल्याला लोकशाही हवीय असं म्हणत बंड केलं नाही, तालिबानला झुगारलं नाही. तालिबानची दहशत मान्य करून लोक मतदानापासून दूर राहिले. 

“सरकारं भ्रष्ट असली तर चालेल, त्यांच्यात आम्ही सुधारणा करू; पण तालिबानसारखी हुकूमशाही पुन्हा येऊ देणार नाही,” असं म्हणायला अफगाण माणसं तयार नाहीत. बाहेरून कोणी तरी यावं, बाहेरून शस्त्रं आणि पैसा यावा आणि देशातल्या गोष्टी बदलाव्यात असं अफगाण मानस दिसतं. आर्थिक दुरवस्थेमुळं समाज मागासलेला राहतो, हे खरं. पण, आर्थिक सुधारणा झाल्यानंतर त्यांचा फायदा घेतलेली माणसं विचाराने आधुनिक होतातच असं नाही. विचाराने, मनातूनच ती जर आदिम असतील तर काय करणार? कुंडल्या आणि भविष्य यावर आतूनच पक्का विश्वास असेल तर कॉम्प्युटरचा उपयोग माणसं कुंडल्या करण्यासाठीच करतात, असा सुस्थितीतल्या भारताचाही अनुभव आहेच की! 

अफगाण समाजाची, पश्तू समाजाची स्थिती दुःखदायक आहे. ती सुधारली पाहिजे. पण, ती सुधारणा त्या समाजात आतून व्हायला हवी. बाहेरून सहानुभूती आणि काही मदत जरूर मिळू शकते; पण बदलायचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा.                           (उत्तरार्ध)damlenilkanth@gmail.com

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान