शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

सिंघवी यांच्या विधेयकाला सर्वांचे समर्थन आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 06:00 IST

लोकसंख्यावाढीला आळा घालावा असे प्रत्येकाला वाटते. पण ते साध्य कसे करायचे, याचे आकलन मात्र होत नाही. गेल्या ७० वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीला आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक योजना राबविल्या गेल्या. पण...

- दिनकर रायकर(सल्लागार संपादक)१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाची असलेली लोकसंख्या ३५ कोटींवरून आता १३0 कोटींच्या वर गेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच प्रत्येक सरकार आणि राजकीय नेते हे कुटुंब नियोजनाचे धोरण राबविण्याविषयी आग्रही राहिले आहेत. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे अपेक्षित यश मिळालेले नाही आणि आता तर परिस्थिती खरोखर हाताबाहेर गेली आहे.लोकसंख्यावाढीला आळा घालावा असे प्रत्येकाला वाटते. पण ते साध्य कसे करायचे, याचे आकलन मात्र होत नाही. गेल्या ७० वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीला आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर अनेक योजना राबविल्या गेल्या. पण अशा योजनांना कदाचित कायद्याचे पाठबळ नसल्याने त्यांची अंमलबजावणी यशस्वी झाली नसेल. लोकसंख्या आटोक्यात ठेवली गेली नाही, तर पंतप्रधान मोदींचे फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे ध्येय साकार झाले तरी लोकांच्या राहणीमानात मात्र मोठा बदल घडणार नाही, असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञ ओरडून सांगत आहेत.पण आता यावरचा एक उपाय म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी एक खासगी विधेयक चालू अधिवेशनात राज्यसभेत मांडून या प्रश्नाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद करणे गरजेचे असल्याने राष्ट्रपतींची आवश्यक परवानगीदेखील मिळाली आहे. यावरून राष्ट्रपतींनादेखील हे विधेयक मंजूर व्हावे, असेच वाटत असावे.आपल्या विधेयकाच्या उद्दिष्टात सिंघवी यांनी कुटुंब नियोजनात जास्तीत जास्त दोन मुलांचे बंधन असावे, अशी सूचना करतानाच त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन योजनाही सुचविली आहे. त्यासाठी शासनाने राष्ट्रीय लोकसंख्या नियंत्रण कोष स्थापन करण्याची तरतूदही या विधेयकात आहे. त्यानुसार एकच मूल असेल व कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असेल तर मुलीसाठी एकरकमी एक लाख व मुलासाठी ६० हजार रुपये शासन देईल. त्यानुसार दोन मुले असणाऱ्यांना शासकीय नोकरी व प्राधान्यक्रमाने बढती मिळेल. मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली जाईल. त्यांच्याकडून तिसरे मूल होऊ देणार नसल्याचे प्रतिज्ञापत्रही घेतले जाईल. उल्लंघन झाल्यास त्यांना कामावरून बडतर्फ केले जाईल. त्याच वेळी दोन मुलांचे बंधन न पाळणाºया पालकांना या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यांना कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. या कायद्याची अंमलबजावणी करताना कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, याची दक्षता मी विधेयक तयार करताना घेतल्याची ग्वाही सिंघवी यांनी हे विधेयक मांडताना दिली आहे.

प्रत्येक देशाचा आर्थिक विकास हा तेथील नागरिकांचे दरडोई उत्पन्न व त्यांची सांपत्तिक स्थिती यावर ठरविला जातो. २०५०पर्यंत लोकसंख्यावाढीचा दर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट संयुक्त राष्ट्राने निर्धारित केले आहे. त्यासाठी आपली नैसर्गिक साधनसंपत्ती व इतर उत्पन्नांचा विचार करून लोकसंख्या धोरण आखावे, असे आवाहन सदस्य देशांना केले आहे. भारताचा सध्याचा लोकसंख्यावाढीचा वेग बघता २०५०मध्ये आपलीलोकसंख्या १६६ कोटींच्या वर जाईल व आपण चीनलाही मागे टाकू, अशी परिस्थिती राहील. २०२४ साली आपली व चीनची लोकसंख्या सारखी होईल. मात्र त्यांच्या कुटुंब नियोजनाच्या कठोर धोरणामुळे त्यांची लोकसंख्या आटोक्यात राहील व आपला प्रवास मात्र लोकसंख्या विस्फोटाकडे होईल. या पार्श्वभूमीवरच सिंघवी यांनी मांडलेल्या या विधेयकाचे कोणताही राजकीय अभिनिवेष न ठेवता सर्व पक्षांनी समर्थन केले पाहिजे.राज्यसभा हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. तेथे राजकारणापेक्षा समाजकारण आणि देशकल्याणाचे निर्णय घेणे अपेक्षित असते. आपल्या १५ आॅगस्टच्या भाषणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसंख्येच्या विस्फोटावर चिंता व्यक्त केली होती. दोन अपत्यांच्या धोरणाबाबत सूतोवाच केले होते. त्यावर काँग्रेस नेते जितेन प्रसाद यांनीही कठोर उपाययोजनांची सूचना केली होती. अशाच प्रकारचे एक विधेयक भाजप समर्थक सदस्य राकेश सिन्हा यांनी राज्यसभेत मांडले होते. पण सिंघवी यांचे विधेयक अधिक स्पष्ट व दिशादर्शक आहे. शासनाच्या धोरणाला जेव्हा प्रमुख विरोधी पक्षांचे पाठबळ मिळते, तेव्हा त्याची अंमलबजावणीही सुकर होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षांनी एका गंभीर समस्येवर मात करण्याची संधी या विधेयकानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. संसदेच्या बाहेरही समाजधुरीण व अभ्यासकांनी जनजागृती करून ही योजना यशस्वी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. कारण लोकसंख्यावाढ रोखली, तरच देश अधिक समृद्ध आणि बलशाली होऊ शकेल. 

टॅग्स :IndiaभारतFamilyपरिवार