शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
2
वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
4
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
5
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
6
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
7
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
8
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
9
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
10
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
11
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार
12
भारतावर कुरघोडी करणाऱ्या चीनची लागली 'लंका'! 'या' क्षेत्रात मोठी मंदी, खरेदी करायलाच कोणी नाही
13
Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं
14
कोरोनाचा कहर, बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू; डॉक्टर म्हणाले... 
15
Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
16
जळगाव: झाडाखाली आश्रय घेताच काळाने डाव साधला, ९ वर्षाच्या मुलासह एकाच कुटुंबातील तिघे ठार
17
व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
18
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
19
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस; महिन्याभरात दुपटीपेक्षा अधिक रिटर्न, किंमत किती?
20
Video: गाडी हळू चालवा...; इंग्रजीत बोलणाऱ्या महिलेला कन्नड भाषिक रॅपिडो चालकाची मारहाण

अभिषेक भार्गवचा कित्ता इतर कुलदीपकांनीही गिरवावा!

By रवी टाले | Updated: March 23, 2019 23:52 IST

अभिषेक भार्गवचा कित्ता इतर कुलदीपकांनीही गिरवावा!

 

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पुढील पिढीला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी देशभरातील राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. या पाशर््वभूमीवर, मध्य प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या सुपुत्राने एक आगळा आदर्श निर्माण केला आहे. गोपाल भार्गव हे भाजपाचे मध्य प्रदेशमधील मोठे नेते आहेत. ते सध्या मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्ष नेता आहेत. त्यांचे चिरंजीव अभिषेक भार्गव लोकसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळण्यासाठी इच्छूक होते; मात्र त्यांनी शनिवारी फेसबुकच्या माध्यमातून उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत असल्याची घोषणा केली. गांधीनगर या परंपरागत मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आलेले भाजपाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीबद्दलच्या मतांमुळे प्रभावित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचे अभिषेक भार्गव यांचे म्हणणे आहे. त्यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून बाजूला होण्याच्या निर्णयासाठी जाहीर केलेल्या कारणास्तवच माघार घेतली असेल, तर त्यासाठी ते निश्चितपणे प्रशंसेस पात्र आहेत. 

घराणेशाही हा भारतीय राजकारणाला अगदी प्रारंभापासून जडलेला आजार आहे. बहुधा लोकशाहीच्या आगमनापूर्वीच्या राजेशाही व्यवस्थेमध्ये घराणेशाहीची बीजे दडलेली असावी; पण वस्तुस्थिती ही आहे, की आज भारतातील एकही राजकीय पक्ष घराणेशाहीपासून मुक्त नाही. प्रमाण भले कमीजास्त असेल; पण प्रत्येकच पक्षात घराणेशाही आहेच! अभिषेक भार्गव ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, त्या भाजपाचे ज्येष्ठ नेते कितीही घराणेशाहीचा विरोध करीत असले तरी, त्या पक्षातही इतर पक्षांच्या तुलनेत कमी प्रमाणात का होईना, पण घराणेशाही आहेच! मागील लोकसभेत तर एक-तृतियांशपेक्षा जास्त सदस्य राजकीय घराण्याशी संब्धित होते. 

बहुधा भारतीय जनमानसातच घराणेशाही मुरलेली आहे. मुलांनी वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालविण्याची परंपरा या देशात पूर्वापार चालत आली आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या मुलांनी राजकारण करण्यात भारतीय मतदारांना काहीही वावगे वाटत नाही. त्यामुळेच घराणेशाही संपुष्टात येण्याचे तर सोडाच, ती आणखी फोफावत आहे. राजकारणातील घराणेशाहीमुळे देशाचा, जनतेचा लाभ झाला असता तर घराणेशाहीला विरोध करण्याचे कारणच नव्हते; मात्र दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही. 

काही दिवसांपूर्वी हार्वर्ड विद्यापीठातील सिद्दार्थ जॉर्ज आणि डॉमिनिक पोनाट्टू यांनी ‘अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक इम्पॅक्टस आॅफ पोलिटिकल डायनास्टीज: इव्हिडन्स फ्रॉम इंडिया’ या शीर्षकाचा पेपर सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी रात्रीच्या तेजोमयतेचा मापदंड वापरून विश्लेषण केले होते. त्यांनी असा निष्कर्ष काढला होता, की घराणेशाहीचे वारसदार पराभूत झालेल्या मतदारसंघांच्या तुलनेत, घराणेशाहीचे वारसदार विजयी झालेल्या मतदारसंघांचा विकास ६.५ टक्के गुणांनी कमी झाला. त्यांनी काढलेला निष्कर्ष ब्रह्मवाक्य नक्कीच म्हणता येणार नाही; परंतु फिलिपिन्समधील अर्थतज्ज्ञ रोलांड मेन्डोझा यांनी त्यांच्या देशात केलेल्या अभ्यासादरम्यानही हेच आढळून आले होते, की घराणेशाहीचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांमध्ये अधिक गरिबी आणि आर्थिक विषमता आढळून येते. त्यामुळे घराणेशाही आणि आर्थिक मागासलेपणामध्ये काही तरी संबंध निश्चितपणे असावा, असा निष्कर्ष काढल्यास तो चूक म्हणता येणार नाही. 

घराणेशाहीमुळे वर्षानुवर्षे सत्ता ठराविक लोकांच्या हातात केंद्रित होते. सत्ता जाण्याची भीती नसल्याने नेत्यांचे उत्तरदायित्व कमी होत जाते. त्यामुळे जनता आणि देशाच्या विकासापेक्षा विशिष्ट घराण्यांचा विकास हाच ‘अजेंडा’ बनतो. देशातील सर्वच भागांमध्ये अशी उदाहरणे दिसतात. घराणेशाहीमुळे मतदारांपुढील पर्याय कमी होतात आणि त्यामुळे आपल्याशिवाय मतदारांना पर्यायच नाही, अशी राजकीय घराण्यांची मानसिकता होऊन विकासाकडे दुर्लक्ष होते. अर्थात ही परिस्थिती बदलणे मतदारांच्याच हाती आहे. मतदारांनीच घराणेशाही नाकारली तर कुणालाही ती त्यांच्यावर थोपता येणार नाही. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती शक्तिशाली झाल्यानंतर अनेक राजकीय घराण्यांची सत्ता संपुष्टात येऊन सर्वसामान्य कुटुंबांमधील कार्यकर्ते लोकप्रतिनिधी झाले; मात्र दुर्दैवाने पुढे त्यांच्यापैकी अनेकांची घराणेशाही प्रस्थापित झाली, हा इतिहास आहे. त्यामुळे देशाचा आणि स्वत:चा विकास व्हावा असे जनतेला वाटत असेल, तर भाकरी, घोडा आणि पानांप्रमाणे सत्ताही फिरवित ठेवली पाहिजे. अभिषेक भार्गवसारखे राजकीय घराण्यांमधील कुलदीपक स्वत:हून बाजूला होऊन, त्या प्रक्रियेला हातभार लावत असतील, तर त्याचे स्वागतच व्हायला हवे! देशभरातील राजकीय घराण्यांमधील कुलदीपकांनी अभिषेक भार्गव यांचा कित्ता गिरविला, तर समर्थ आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही!

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक