शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

आषाढी एकादशी : विठ्ठल आमुचे जीवन, जीवभाव... बाबामहाराज सातारकर यांचा भावोत्कट लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 13:45 IST

लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पंढरीत, अर्थात भूवैैकुंठात दाखल झाले आहेत.

- हभप बाबामहाराज सातारकरज्येष्ठ कीर्तनकार

लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पंढरीत, अर्थात भूवैैकुंठात दाखल झाले आहेत. ‘ज्ञानोबा-तुकोबा’ असा गजर आणि विठ्ठलभक्तीने अवघी विठूरायाची पंढरी दुमदुमली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसले आहेत. भक्त व देव यांच्या भेटीचा सोहळा रंगला आहे. चंद्रभागा भक्तांनी ओसंडली आहे. ‘विठ्ठल आमुचे जीवन, विठ्ठल आमुचा जीवभाव...’ असा अनुभव येत आहे.‘विठ्ठल आमुचे जीवन’ असे संतवचन आहे. विठ्ठलाची वारी हे आमुचे जीवन आहे. खरे तर माणसे म्हणतात, ‘मी वारी चालतो.’ मी म्हणतो, वारीमुळे जीवन चालते. वारी ही परमार्थाची भूक; त्यामुळे विठ्ठल आमुचे जीवन आहे, जीवभाव आहे. वारीत विठ्ठलभक्ती आहे तसेच श्रवणसुख आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ हा सामाजिक ऐक्याचा संदेशही वारीतूनच दिला जातो.‘‘धन्य आजि दिन, जाहले संतांचे दर्शन...’ संतांचे दर्शन माणसाला सुख देणारे असते. समाधान देणारे असते.‘जे जे भेटे भूत ।ते ते मानिजे भगवंत।।’संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी इतरांसाठी भक्तियोग आणला.‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी...’ असे देवळातील कीर्तन पंढरीच्या वाळवंटात नेण्याचे काम संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले. एकमेकांना माउली म्हणत एकमेकांचे दर्शन घेणे, पाया पडणे, हा वारीचा संस्कार आहे. हे तत्त्व अलौकिक आहे. वारीनेच सामाजिक क्रांती घडविली आहे. लाखो भाविकांना कोणी न बोलावता ते या सोहळ्यात सहभागी होतात. त्यात सख्या पांडुरंगाची भेट, आतुरता, उतावीळता, जिव्हाळा असतो. परमात्म्यास बद्ध करण्याची ताकद वारीतील भक्तीत आहे. म्हणून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबांच्या वचनाप्रमाणे‘विठ्ठल टाळ। विठ्ठल दिंडी।।विठ्ठल तोंडी उच्चारा। आणि शेवटीविठ्ठल अवघा भांडवला।।

असा भाव वारीतील प्रत्येका ठायी असतो. पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा प्रमुख आचार आणि विचार धर्म आहे. ते सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. त्याचेच दर्शन आपल्याला वारीच्या सोहळ्यात होत असते.माणसं वारीत आली की एकमेकांना माउलीशिवाय बोलत नाहीत. माउली-तुकोबांचा हा सामाजिक आध्यात्मिक सिद्धांत आहे. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म...’ हा अनंतकाळापासून चालत आला आहे. त्याला पुंडलीक व माउलींच्या काळापासून मूर्तरूप आले आहे.मी विनोदानं नेहमी सांगत असतो, माणूस वैैकुंठाला गेला, की परत येत नसतो. आम्ही वर्षातून तीन वेळा जातो आणि वैैकुंठाला जाऊन परत येतो.भूवैैकुंठ म्हणे तुका ।अधिक अक्षरे आली एका ।।भूवैैकुंठ म्हणे तुका।। म्हणून एकदा मला एका व्यक्तीने विचारले, ‘इतके दिवस दिसला नाहीत?’ त्यावर मी म्हटले, ‘वैैकुंठवासी होतो.’ त्यावर तो मनुष्य माझ्या तोंडाकडे पाहून अवाक् झाला आणि म्हणाला, ‘हे काय महाराज बोलताय! वैकुंठवासी म्हणजे काय?’ त्यावर मी त्याला म्हटले, ‘वैैकुंठ म्हणजे पंढरपूर.’हे पाहा, जिथे राष्ट्रपती राहतात ते त्या देशाचे मूळ स्थान असते. खरंय ना? दिल्ली ही जशी देशाची राजधानी आहे. त्यामुळे प्रेसिडेंट अर्थात राष्ट्रपती तेथे राहतात. म्हणून देशाची ती राजधानी. गव्हर्नर अर्थात राज्यपाल जेथे राहतात, ती राज्याची राजधानी. आता महाराष्ट्राची राजधानी मुंबई का? तर तिथे गव्हर्नर राहतात म्हणून. तसं जिथं पांडुरंग राहतो, ते वैैकुंठ होय.वैैकुंठ वैैकुंठ नव्हे. म्हणून जिथे पांडुरंग उभा आहे ते आमचे वैैकुंठ आहे. म्हणून आम्ही दरवर्षी तीन वेळा वैैकुंठाला जाऊन परत येतो आणि या भूवैकुंठाचे वैैशिष्ट्य असे आहे, दर्शन झाल्यानंतर माणसाला इतका आनंद वाटतो, तो अवर्णनीयच असतो.विठ्ठलाचे ते सावळे, सुंदर असे रूप बघितल्यावर डोळ्यांना धारच लागते. काय आश्चर्य आहे पाहा! आस्तिक असू दे वा नास्तिक असू दे; सर्वांना एकच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. एक व्यक्ती मला परवाच म्हणाली, ‘अहो मी पहिल्यांदाच दर्शनाला गेलो आणि माझ्या डोळ्याला धार लागली.’ काय साक्षात्कार आहे! मी म्हणतो, साक्षात्कार नव्हे, तर साक्षात आकार प्रभूचा.पांडुरंगाची ती मूर्ती नसून साक्षात आकार प्रभूचा आहे, हे कळणं हाच पंढरपूरला झालेला साक्षात्कार आहे.

म्हणून‘तेथिले तृण आणि पाषाण।तेही देव जाणावे ।।असे जेव्हा नामदेवराय म्हणतात, त्यावर त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून वारीची वाट चालावी. आपली प्रतीतीसुद्धा एक दिवस या अवस्थेत पोहोचून परिपक्व होईल. आज चंद्रभागेला भरते आले आहे. लाखो वैष्णव विठूरायाचरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरीत, भूवैैकुंठात दाखल झाले आहेत. ‘ज्ञानोबा-तुकोबा’चा गजर आणि विठ्ठलभक्तीने अवघी पंढरी दुमदुमली आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी आसुसले आहेत. भक्त आणि देव यांच्या भेटीचा सोहळा रंगला आहे. चंद्रभागा भक्तांनी ओसंडली आहे. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर