शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कामातिरेकापोटी जन्मलेले नवे ‘काम’सूत्र : क्वाएट क्वीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 12:32 IST

सकाळी ९ ते रात्री ९ असे आठवड्यात ६ दिवस काम काम, फक्त काम करण्याला नकार देणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांचा जीवतोड मेहनतीला नकार?

डॉ. भूषण केळकर, संचालक, न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन -

क्वाएट क्वीटिंग (Quit Quitting) अशी एक नवीन संज्ञा गेले दोन महिने  समाजमाध्यमात  बरीच गाजते आहे. या संज्ञेचा अर्थ असा की नोकरी तर सोडायची नाही पण पूर्ण झोकून देऊन कामही करायचे नाही! पूर्वी जसे लोक सर्वस्व ओतून काम करायचे (कामातिरेक!) तसे न करता, अगदी आवश्यक असेल तितकेच, अंग चोरून काम करायचे!  ‘सर्वस्व झोकून’ आणि ‘अंग चोरून’ अशा दोन शब्दात या दोन संस्कृती सांगता येतील! आता तुम्ही म्हणाल की सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तर वरील लक्षणे स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षे अमृतकालातही जिवंत आहेतच! तर मुद्दा हा की ही लक्षणे व हे नवीन ‘काम’सूत्र आता खासगी उद्योगात पण येते आहे आणि म्हणून ही चर्चा!! हे क्वाएट क्वीटिंग का होते आहे, त्याची काही कारणमिमांसा आपल्याला सहज सांगता येईल.पहिले म्हणजे लोकांच्या - विशेषत: नवीन पिढीच्या असे लक्षात आले आहे, येते आहे की, अतिप्रचंड काम करून (म्हणजे मी ज्याला ‘कामातिरेक’ म्हणतोय) बर्न आऊट होतोय आणि वर्क लाइफ बॅलन्स अजिबातच साधता येत नाही.  चीनमध्ये ‘९९६’ अशी एक संज्ञा प्रसिद्ध आहे.  त्याचा अर्थ सकाळी ९ ते रात्री ९ असे आठवड्यात ६ दिवस काम काम आणि फक्त काम! दुसरे म्हणजे कामाचे प्रकार, संधी इतक्या वेगवेगळ्या उपलब्ध होत आहेत की, वैविध्य व नाविन्य यामुळे पण गीग इकॉनॉमीमध्ये ‘जीवतोड मेहनत का करा’ असाही विचार बळावतोय! तिसरे म्हणजे ‘इंडस्ट्री ४.०’मध्ये एकजिनसी काम कमी होऊन मुख्यत्त्वे नाविन्यपूर्ण, प्रतिभाप्रवण कामांना असणारा वाव! चौथे कारण म्हणजे कोविड - १९! या जागतिक महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ची चटक लागल्याने, हवे तेव्हा काम करण्याची मुभा हवीहवीशी वाटू लागली; त्यामुळे  एकूणच दिनक्रमातले स्वातंत्र्य, कुटुंबाबरोबर देता येणारा वेळ वाढला, त्यातील आनंद वाढला आणि आता ऑफिसला जाऊन काम करणे, प्रवास व त्यातील ट्रॅफिकमध्ये वाया जाणारा वेळ, ती धावपळ... हे सारे लोकांना नको वाटते आहे.  कोविड काळात आणखीही काही घडले. घरूनच काम असल्याने जास्त कामाची अपेक्षाही झाली. कंपन्या व मॅनेजर्स/वरिष्ठ अवाच्या सव्वा काम झालेच पाहिजे म्हणून हटून बसले! कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यापेक्षा आपल्या कंपनीला निव्वळ नफ्यामध्येच रस असतो, याचा अनेकांना विषाद वाटला. क्वाएट क्वीटिंग हे कर्मचारी आळशी व वाईट असल्यामुळे आहे की, असंवेदनशील कंपन्या व वरिष्ठ अतिकडक असल्यामुळे आहे? याचा उहापोह ‘हावर्ड बिझनेस रिव्ह्यू’मध्ये केला गेला आहे. एक मात्र खरे, जनरेशन झेड आणि मिलेनियल्स या पिढ्यांना पैशाबरोबरच आपल्या एकूण जीवनमानाचा दर्जाही महत्त्वाचा वाटतो. त्यांच्यासाठी ‘पॅशन’ हे महत्त्वाचे मूल्य आहे. मग या क्वाएट क्वीटिंगचे काय परिणाम होतील, हे चांगलं की वाईट? मी एक छान वाक्य वाचलं ‘क्वाएट क्वीटिंग इज नॉट क्वीटिंग ऑन जॉब बट क्वीटिंग ऑन लाईफ’.मला वाटतं की, अल्प काळाच्या रोमांचकतेपोटी  क्वाएट क्वीटिंग करत राहणे हे दीर्घकालीन तोट्यात पडेल! जागतिक मंदीची चाहूल लागते आहे, बेरोजगारी वाढते आहे आणि असे अनिश्चितेचे सावट असताना हे नवे आवर्त कसे परवडेल? समजा थोडे दिवस तुमचे क्वाएट क्वीटिंग  कंपनीने सहन केले  अन् ‘भीक नको पण कुत्रा आवर’ म्हणून नारळ दिला, तर? आणि मग नवीन नोकरीसाठी चांगली शिफारस कशी मिळेल? - हाती घेतलेले काम उत्तम आणि मनापासून करणे; निव्वळ हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणे हे केव्हाही अधिक श्रेयस्कर! 

टॅग्स :Employeeकर्मचारी