शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

ए फॉर... आय फॉर! बिल गेट्स-नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेमुळे भारताच्या भूमिकेला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 09:38 IST

विशेषत: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या हरघडी चर्चिला जाणारा विषय या संवादाच्या केंद्रस्थानी आहे.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा वर्तमान, तसेच भूतकाळ व भविष्य अशा तिन्हींचा विचार ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे दिग्गज, मायक्रोसाॅफ्टचे सहसंस्थापक व बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सहप्रमुख बिल गेट्स आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील सविस्तर चर्चेमुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काही ज्वलंत प्रश्नांवर भारताच्या भूमिकेला उजाळा मिळाला आहे. विशेषत: आर्टिफिशिअल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या हरघडी चर्चिला जाणारा विषय या संवादाच्या केंद्रस्थानी आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अमेरिका भेटीत ‘एआय’ म्हणजे ‘अमेरिका व इंडिया’ असा शब्दच्छल केल्याचे बहुतेकांना आठवतच असेल. थोडासा त्यापलीकडे जाणारा हा त्यांचा संवाद म्हणता येईल; कारण, गेट्स व मोदी केवळ एआयवर बोललेले नाहीत.

जगाला भेडसावणारी तापमानवाढीची समस्या, पर्यायी ऊर्जास्रोत, शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण अशा अन्य विषयांवरही दोघांची चर्चा झाली. कोविड महामारीच्या काळात सर्वसामान्य भारतीयांमध्ये लस घेण्याबद्दलचा संभ्रम दूर करण्यासाठी केलेल्या जनजागृतीसाठी गेट्स यांनी मोदींचे कौतुक केले. प्लास्टिकचा भस्मासुर, त्याच्या रिसायकलिंगची प्रक्रिया यांवरही दोघे बोलले. या सर्व विषयांवर भारत देश करीत असलेले काम, सरकारचा पुढाकार, विविध सरकारी योजना व उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी गेट्स यांना दिली. आपण परिधान केलेले हाफ जॅकेटच मुळात रिसायकलिंगद्वारे तयार झालेल्या कच्चा मालापासून बनलेले आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. तरीदेखील या संभाषणाचा आकर्षक भाग आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे आव्हान व त्यावरील उपाययोजनांचाच आहे.

थोडे खोलात गेले तर दिसते की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रूपाने मानवी समुदायापुढे उभ्या असलेल्या संकटाला सहमती दर्शवितानाच भारतीयांच्या दृष्टीने हा बराच दूरचा विषय असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी नवजात बालकाच्या पहिल्या रडण्याचे दिलेले उदाहरण बोलके आहे. नमो ॲपमध्ये किंवा जी-२० अध्यक्षपदाच्या काळात भाषणांच्या भाषांतरासाठी एआयचा वापर कसा होतो, हे पंतप्रधानांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाचा हा प्रयोग आहे; परंतु, एआयचा खरा धोका हा आहे की, जाणीवपूर्वक पसरविल्या जाणाऱ्या खोट्या बातम्या, फेक व्हिडीओ, फसवी छायाचित्रे आणि अगदी हुबेहूब वाटावेत असे डीपफेक व्हिडीओ, आदींमुळे लोकांची खरे-खोटे समजण्यात फसगत होईल. तेव्हा, मूळ, खऱ्या व्हिडीओ-छायाचित्रांवर काहीतरी वॉटरमार्क असावेत, अशी सूचना मोदींनी बिल गेट्स यांना केली आहे. त्यावर गेट्स यांची प्रतिक्रिया काय होती हे लगेच स्पष्ट झालेले नाही. तथापि, असे वॉटरमार्क टाकणे डीपफेक व्हिडीओ बनविणाऱ्यांना का शक्य होणार नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. या दोघा दिग्गजांमधील ही चर्चा गेल्या २९ फेब्रुवारीची आहे. ती एक महिन्यानंतर प्रसारित करण्यामागे काही राजकारण आहे का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल आहे.

दक्षिण भारतात यावेळी तरी चांगले समर्थन मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्ष जिकिरीचे प्रयत्न करीत आहे. दक्षिण भारतात तंत्रज्ञानस्नेही मतदारांची संख्या मोठी आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाबद्दल विशेष रुची असलेले, या क्षेत्रातील प्रत्येक घटना-घडामोडी व भविष्यातील शोध, दिशा यांकडे लक्ष ठेवणारे या टापूतील मतदार आहेत. तेव्हा, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज बिल गेट्स यांच्याबरोबर पंतप्रधानांचा संवाद नेमका मतदानाला जेमतेम तीन आठवडे शिल्लक असताना प्रसारित होणे समजू शकते. या संवादात सौर, पवन ऊर्जा या अपारंपरिक स्रोतांबद्दल भारताची दिशा स्पष्ट करतानाच पंतप्रधान अणुउर्जा तसेच जगाच्या ऊर्जेचे भविष्य समजल्या जाणाऱ्या ग्रीन हायड्रोजनबद्दल भरभरून बोलले. त्यालाही दक्षिणेचा संदर्भ आहे.

गेल्या महिन्यात मोदींनी तामिळनाडूमध्ये पूर्णपणे ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटीचे लोकार्पण केले. ती बोट पंतप्रधानांच्या मतदारसंघाला म्हणजे वाराणसीला भेट देण्यात आली. आता त्या बोटीने आपण काशी ते अयोध्या प्रवास करणार आहोत, त्या माध्यमातून गंगा शुद्धिकरणाचा संकल्प पूर्ण होईल, ही पंतप्रधानांची या संवादातील विधाने तंत्रज्ञान व आस्था यांची सांगड घालणारी आणि एकाच वेळी दक्षिणेकडील तंत्रस्नेही व उत्तरेकडील श्रद्धाळू मतदारांना आपल्या राजकारणाशी जोडणारी आहेत, हे विशेषत्वाने लक्षात घ्यावे लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBill Gatesबिल गेटस