शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

१२ धडे आणि ३६५ कोऱ्या पानांचं पुस्तक उद्या मिळणार... पुढे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:48 IST

जगण्याचं ‘इम्प्रोव्हायझेशन’ म्हणजे ‘चांगले बदल घडवून आणणे’ ही क्रिया सतत व्हायला हवी! त्यासाठी ३१ डिसेंबरसारख्या तारखा आपल्याला मदत करतात.

सोनाली लोहार, व्हॉइस थेरपिस्ट -

डिसेंबर महिना तसाही कौतुकाचाच, म्हणजे अगदीच रंगीबेरंगी. त्यात भर म्हणजे  धुक्यात भिजवून उगवलेली सकाळ! सध्या त्याला धुकं म्हणायचं की, धुरकं यावर गोंधळ सुरू आहे ही बाब सोडा; पण एकंदरीत सरत्या वर्षाचं वातावरण नक्कीच आल्हाददायक आहे.

तसं म्हणायला गेलं तर हा सगळा कॅलेंडरवरच्या आकड्यांचा खेळ, म्हणजे २०२४ संपलं आणि २०२५ उजाडलं वगैरे. खरं तर पृथ्वी तशीच गोल फिरतेय. रात्र तशीच संपतेय आणि सूर्यही तसाच वर येतोय; पण तरीही ३१ डिसेंबर ही तारीख जवळ यायला लागली, की नकळत मनात आकडेमोड सुरू होते. काहीतरी हातातून सुटतंय आणि त्यावर आपला काहीच ताबा नाही अशी काहीतरी अनाकलनीय हुरहूर लागते. सत्य हेच आहे की, सरकणाऱ्या काळावर आपलं स्वामित्व नाही, तो पुढे जाणारच आणि जाताना त्याच्या खुणा उठवत जाणार. शरीरावर, मनावर आणि सभोवतालावरही!

पुढच्या क्षणी काय होणार हे मला माहिती आहे, या भ्रमात माणसाने कधीही राहू नये, हे खरंच. अर्थात याचं आकलन व्हायलाही वयाची काही ठराविक वर्षे जातातच; पण जगण्याचं ‘इम्प्रोव्हायझेशन’ म्हणजे ‘चांगले बदल घडवून आणणे’ ही क्रिया मात्र होतच राहायला हवी आणि त्यासाठी ३१ डिसेंबरसारख्या या तारखा नक्कीच मदत करतात. जो क्षण पदरात आहे तो सर्वार्थाने जगला पाहिजे... त्या एका क्षणात मी काहीतरी छान वाचेन, काही छानसं ऐकेन, काही छान बोलेन, काही छान चव घेईन, एखादं छानसं फूल केसात माळेन, झाडाच्या गर्द सावलीत निवांत पडेन, अंगणात नाहीतर गच्चीत चादर अंथरुण एखाद्या रात्री चांदण्यांशी बोलेन, अगदीच काही नाही जमलं तर समोरच्याला एक छानसं स्माईल तरी देईनच; पण त्या प्रत्येक क्षणात मी असेन, मी जगेन!

भूतकाळात तरी माणसाने किती दिवस जगायचं आणि भविष्य तर माहीतच नसतं, मग मनातली ही हजारो किल्मिषं आणि वेदना घेऊन कुठे जाणार आहोत आपण! यावर मार्ग एकच की, डोक्यातली सगळी ओझी आणि जळमटं एक मोठा श्वास घेऊन उतरवून टाकायची, मग पुढचा प्रवास सोपा होऊन जातो. इतकं करूनही आयुष्य म्हणजे शर्यत समजूनच धावत राहिलो तर त्या प्रवासात जागोजागी लागलेली सुंदर ठिकाणं मात्र बघायचीच राहून जातील. एका मोठ्या अभिनेत्याची अत्यंत प्रामाणिक मुलाखत नुकतीच ऐकली. तीस वर्ष कामाच्या ‘नशे’त धावता धावता  स्वतःच्या मुलांचं बालपण, तारुण्य, हातातला पत्नीचा हात हे सगळच सुटून गेलं. यश, कीर्ती पैसा मिळाला; पण जे गमावलं त्याची किंमतच होऊ शकत नाही, ही खंत त्यांनी बोलून दाखवली.

हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. म्हणून उशीर होण्याआधीच आपल्या प्राथमिकता या भावनांच्या आणि जगण्याच्या गुणवत्तेच्या निकषावर तपासून बघायला हव्यात.

आयुष्य यशापयशाच्या खाचखळग्यांतूनच जाणार आणि आशा-निराशेच्या हिंदोळ्यावरही झुलत राहणार, हे अगदीच मान्य; पण आपल्याला स्वतःच्या आयुष्याकडे त्रयस्थ नजरेनेही बघता यायला हवं. स्वतःचंच मूल्यमापन करता आलं की,  भरकटणं थांबतं.

येणारं वर्ष हे १२ धड्यांचं एक पुस्तक समजलं तर आपल्याला आपली कथा लिहिण्यासाठी नियतीने ३६५ कोरी पानं उपलब्ध करून दिली आहेत. या पानांवर काय लिहायचं हे आपण ठरवायचं. येणारी प्रत्येक सकाळ ही सकारात्मक विचारांनी आणि रात्र ही कृतज्ञतेनेच संपवूया. ‘आपण श्वास घेतोय’ हीसुद्धा किती मोठी देणगी आहे! ‘माझ्याकडे काय नाही’ या विचारापेक्षा ‘माझ्याकडे किती सारं आहे’ हा विचार मोठा नाही का? ‘समाज माझ्यासाठी काही करत नाही’ यापेक्षा ‘मी समाजासाठी काय करू शकेन’ हा विचार अधिक प्रेरकच केव्हाही! हा सगळा हलकासा नजरेतला बदल आहे; तेवढाच फक्त आपल्याला करायचाय!...बाकी, ज़िंदगी तर गुलज़ार आहेच! २०२५ चे मनःपूर्वक स्वागत आणि शुभचिंतन!     sonali.lohar@gmail.com

टॅग्स :New Yearनववर्ष