शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शाळांच्या परिपाठात २२ भाषांचा संगम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 20:37 IST

सकस समाज घडवायचा असेल तर समतेचा, समभावाचा, एकतेचा, एकोप्याचा, सलोख्याच्या संस्काराचे योग्य वेळी बीजारोपण करावे लागेल. 

- धर्मराज हल्लाळेवर्तमानातील समस्या आणि भविष्यातील आव्हाने पेलायची असतील तर एकमेव शाश्वत प्रयोगाचे ठिकाण म्हणजे शाळा. अर्थात शालेय वयात जे पेरू ते उद्या उगवणार आहे. एकंदर सकस समाज घडवायचा असेल तर समतेचा, समभावाचा, एकतेचा, एकोप्याचा, सलोख्याच्या संस्काराचे योग्य वेळी बीजारोपण करावे लागेल. हा प्रयत्न भाषा संगम उपक्रमातून शाळा-शाळांत दिसून येत आहे़ केंद्राच्या मानव संसाधन मंत्रालयाने देशभरातील शाळांना २२ भाषांचा भाषासंगम कार्यक्रम दिला आहे. जो २२ दिवस सुरू राहणार आहे. शासनाच्या अनेक मोहिमा आणि अभियानासारखेच या निर्णयाकडे न पाहता शिक्षक व शाळांनी एक कृतिशील उपक्रम विद्यार्थ्यांच्या हाती देत आहोत या दृष्टीने पाहिले पाहिजे. देशभरात भाषासंगम उपक्रम राबविला जात असून महाराष्ट्रातही शिक्षण विभागाने सर्व शाळांना दररोजच्या परिपाठात एक भाषा संवाद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोकणी, काश्मिरी, मैथिली, मल्याळम, गुजराती, पंजाबी, बंगाली अशा २२ भाषांची ओळख रोज एक या प्रमाणे शाळेत होत आहे. स्वत:ची ओळख करून देणारे व खुशहाली विचारणारे पाच वाक्य मुलांसमोर वाचून दाखविली जातात. त्यानंतर मुले त्या त्या भाषेतून एकमेकांशी संवाद साधतात. शिवाय सूचना फलकावर लिहिलेले हे संवाद विद्यार्थी आपल्या वहीत नोंदवून घेतात.  त्यात विद्यार्थ्यांनी भाषांची तोंडओळख पूर्णत: अवगत करावी, अशी अपेक्षा आहे. साधारणपणे शाळांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा शिकविल्या जातात. काही शाळांमध्ये संस्कृत आहे़ परंतु शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात या राज्यातील भाषांबद्दल आपण अनभिज्ञ असतो. ज्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या मातृभाषेत आपण दोन-चार वाक्य बोलतो तेव्हा त्याची आपल्याविषयीची आपुलकी वाढते. दररोज शाळांमध्ये प्रतिज्ञा म्हटली जाते... भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आपण म्हणतो. परंतु जात, धर्म, भाषा, वेशभूषा ही विविधता अंगीकारत नाही. विविधतेत एकता याचाही उच्चार करतो. मात्र ती एकता कशी प्रस्थापित होईल याचा कुठलाही प्रयोग करीत नाही. त्याला भाषा संगम हे उत्तम उत्तर ठरू शकेल. भाषा जरी भिन्न असली तरी आम्ही ती जाणतो हे आपण कृतीतून, प्रत्यक्ष बोलण्यातून दाखवतो. त्यावेळी माझ्यापेक्षा वेगळी भाषा बोलणाराही माझा बांधव आहे, ही भावना वृद्धिंगत होऊ शकते. आपली प्रांत रचना ही भाषावार झाली असून भिन्न भाषेबरोबर वेशभूषाही भिन्न असते. जी भाषा परिपाठात घेतली जाईल त्याच प्रदेशाची वेशभूषा करून विद्यार्थी जेव्हा परिपाठ सादर करतात, विविध भाषेत संवाद साधतात तेव्हा देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे आकलन होते. अत्यंत कमी वेळेत विविधतेत एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर कायमचा कोरला जातो. त्यामुळे शिक्षण विभाग आणि डायटकडून राबविला जाणारा उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात यशस्वी करणे, ही शाळांची जबाबदारी आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण