शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
5
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
6
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
7
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
8
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
9
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
10
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
11
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
12
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
13
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
14
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
15
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
16
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
17
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
18
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
19
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
20
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती

महिलांनी कायद्याची अंमलबजावणी सक्षम करण्याकरिता सामूहिक प्रयत्न करावेत- आ. डॉ. नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 23:26 IST

निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे सरकारकडून सक्षम करण्यात आलेत आहेत. यातून मोठ्या शहरांमध्ये तक्रार नोंदविण्यामध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

धुळे : निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे सरकारकडून सक्षम करण्यात आलेत आहेत. यातून मोठ्या शहरांमध्ये तक्रार नोंदविण्यामध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आपल्या कुठल्याही हलगर्जीपणामुळे जर एखाद्या महिलेस न्याय मिळत नसेल तर भारतीय लोकशाहीकरिता अयोग्य आहे. त्यामुळेच कायदा सक्षम करण्याकरिता महिलांनीच सामूहिक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आ. डॉ नीलम गोऱ्हे यांनी धुळे येथील महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्र तथा देशबंधू व मंजू गुप्ता फाऊंडेशन आयोजित महिला कायदेविषयक कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या प्रसंगी माजी आमदार शरद पाटील, महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे, रावसाहेब बढे, अ‍ॅड. रसिका निकुंभे, डॉ. हेमंत भदाणे आदी उपस्थित होते.आ. डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, आरोपपत्र दाखल झाल्यानंतर व कोर्टात प्रकरण सुनावणीस आल्यानंतर केस कमकुवत होऊन आरोपी सुटतो. अ‍ॅड. उज्ज्वल निकम, अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांच्यासारखे काही सन्माननीय अपवाद वगळता सरकारी वकील देखील बलात्काराचे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळत नाही. न्याय मिळण्याकरिता कायदेविषयक अंमलबजावणी निर्दोष आणि अचूक व्हावी.जळगाव वासनाकांड तसेच कोठेवाडी बलात्कार प्रकरणाच्या आठवणी यावेळी उपस्थितांपुढे मांडल्या. याबाबत सांगताना त्या म्हणाल्या, कोठेवाडी खटला हा एक आव्हान होते. महिला संघटनांकरिता तर ही घटना अस्मितेचा विषय होती. समाजात रोज वाढत्या प्रमाणात घडणाऱ्या बलात्कार व विनयभंगाच्या घटनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे म्हणाल्या, महिला सहन करते हा समज समाजाने बदलला पाहिजे. आज संघर्षातून पुढे येऊन महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. कायदे अनेक आहेत पण ते महिलांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आज महिला न्याय हक्कांसाठी लढत आहेत. महिला आयोगाच्या सध्या चालू असेलेल्या अनेक उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली व आयोग आता गावात गावात पोहोचत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी दोंडाईची गावातील घडलेल्या पाच वर्षांच्या बालिका अत्याचार प्रकरणात आ. डॉ. गोऱ्हे यांना भाजपाच्या महिला आघाडीच्या व सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देऊन या प्रकरणी न्यायाची मागणी करण्यात आली. या एकदिवसीय कार्यशाळेत महिलाविषयक कायदे यावर गटचर्चा घेऊन महिलांचे या कायद्यांवरचे मत जाणून घेण्यात आले. यात महिला सुरक्षाविषयक कायदे- वासंती दिघे, कौटुंबिक हिंसाचार विषयक कायदे सुधारणा शिफारशी तसेच डाकीण प्रथा प्रतिबंधाची गरज, आदिवासी समाजातील विशेष समस्या, द्विभार्या प्रतिबंधक कायदा यावर मालती वाळवी ,विवाह विषयक कायदे, बालविवाहाचा प्रश्न अ‍ॅड. रसिका निकुंभ यांनी बाल बालिका शोषण व व्यापार यांचे इंदिरा पाटील व बचतगटांचे काम व कायदेविषयक साक्षरता यावर -पल्लवी आवेकर व प्रियांका घाणेकर यांनी विचार मांडले. या विषयांवर गटचर्चेच्या माध्यमातून ऊहापोह करण्यात आला. यातील महत्वाच्या शिफारशी केंद्रातर्फे राज्य महिला आयोगाला सादर करण्यात येतील. द्विभार्या गुन्हा दखलपात्र करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. रावसाहेब बढे यांनी स्वागतपर भाषण केले तसेच डॉ. हेमंत भदाणे व अ‍ॅड. रसिका निकुंभ यांनी देखील मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेस नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हातून सामाजिक कार्यकर्ते, वकील व महिला उपस्थित होत्या.बलात्कारपीडित महिलांसाठी मेडिकल प्रोटोकॉलची आवश्यकता तथा स्त्री आरोग्याचे प्रश्न व हिंसाचार या विषयावर डॉ.चारुलता पवार यांनी सविस्तर माहिती दिली. मेडिकल प्रोटोकॉलच्या अंमलबजावणी राज्यभरात योग्य होत आहे किंवा कसे या करिता स्त्री आधार केंद निर्भय दृष्टी अभ्यास राज्याच्या दहा जिल्ह्यात राबविला जाणार आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे