अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST2021-07-22T04:22:59+5:302021-07-22T04:22:59+5:30

ग्रामीण भागात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अकरावीसाठी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असायचा. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी धुळे शहरात ...

Why do students flock to rural areas for the eleventh time? | अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

ग्रामीण भागात दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अकरावीसाठी मोठ्या शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असायचा. जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी धुळे शहरात शिक्षणासाठी येत होते. गेल्या काही वर्षात शहरी विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता दिसून येते. त्यामुळे गावाजवळ असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे.

यावर्षी दहावीचा निकाल ९९.९८ टक्के लागलेला असून, २८ हजार ५६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. असे असले तरी बहुतांश पालक आपल्या पाल्याला आतापासूनच गावाजवळच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

म्हणून घेतला गावात प्रवेश

अकरावीसाठी जो अभ्यासक्रम पाहिजे तो गावातील महाविद्यालयात आहे. महाविद्यालय गावाजवळ असल्याने, खर्चातही बचत होते. शिवाय काही अडचणी आल्यास प्राध्यापक, लवकर सोडवून देत असतात.

- आनंद गायकवाड

ग्रामीण भागात तासिका नियमित होत असतात. शिवाय प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष असते. काहीवेळा प्रात्यक्षिकेही जास्तवेळ करण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण भागात गावाजवळच प्रवेश घेतला आहे.

- श्रीरंग जोशी

Web Title: Why do students flock to rural areas for the eleventh time?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.