शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
3
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
4
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
5
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
6
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
8
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
9
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
10
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
11
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
12
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
13
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
14
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
15
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
16
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
17
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
18
Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
19
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
20
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

शहरातील पाण्यावर डल्ला मारतंय कोण ? महापालिका : नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली तर चोरट्यांना ‘अभय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:05 IST

डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय

धुळे : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्याच्या झळा सहन करीत पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़ तर दुसरीकडे मात्र व्हॉल्व गळत्यांव्दारे नागरिकांच्या हक्काच्या पाण्यावर सर्रासपणे डल्ला मारणाऱ्यांना महापालिका प्रशासनातर्फे अभय दिले जात आहे़दीड महिना पुरेल एवढाच जलसाठामहापालिकेतर्फे तापी पाणी पुरवठा योजना, डेडरगाव व नकाणे तलावातून शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नकाणे व डेडरगाव तलावात जेमतेम साठा आहे़ नकाणे तलावात केवळ ३५ ते ४० एमसीएफटी पाणीसाठा होता. त्याची साठवण क्षमता ३५५ एमसीएफटी असून त्यात सद्यस्थितीत केवळ १२८ एमसीएफटी पाणीसाठा उपलब्ध आहे.नियोजनाचा पूर्ण अभावतापी जलवाहिनीवरील १६ गळत्यांची दुरूस्ती काही दिवसापुर्वी करण्यात आली होती़ दुरुस्तीनंतर शहरातील काही प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले आहे़ मात्र अद्याप काही प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे़ शहरात सुरळीत पाणीपुरवठा व उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़हजारो लीटर पाणी अक्षरश: वायामुंबई-आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ बुधवारी शहराला पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्वची लोंखंडी तबकडी निघाल्याने लाखो लीटर पाणी नदीपात्रात वाहून वाया जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील पाण्याचा उपयोग वरखेडीसह परिसरातील स्थानिक नागरिकांसह विटा भट्टीसाठी केला जातो. त्यासाठी व्हॉल्व लिकेज करण्यात येतो़ व्हॉल्व दुस्स्तीनंतर पाणी चोरी करणाºया नागरिकांना महापालिका पथकाने गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे़पाण्याचा वापर वाढला!शहराचा वाढता विस्तार पाहता मनपाला दरवर्षी जलस्त्रोतांमधील आरक्षित पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज भासत आहे़ वाढती लोकसंख्या व जीर्ण जलवितरण यंत्रणा व पाण्याचा अपव्यय यांमुळे पाण्याची मागणी, वापर वाढत आहे़पाणीचोरी रोखण्याचे आव्हानमहापालिकेला शहराला करावयाच्या पाणीपुरवठ्याचा भार डोईजड झाला आहे. त्यासाठी शहरासह परिसरातील अवैध नळधारकांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करून विशेष मोहिम राबविण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई, सदोष पाणीपट्टी आकारणीवरही कटाक्ष टाकणे आवश्यक आहे़शहरातील अवैध नळधारकांकडे दुर्लक्ष करीत नियमित पाणीपट्टी भरणाºया नागरिकांवरील बोजा वाढल्यास मनपाविरोधात तीव्र रोष निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती आहे.

टॅग्स :Dhuleधुळे