शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

वादळी वाऱ्यामुळे गहू भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 1:15 PM

हंगाम धोक्यात : मालपूर येथील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपुर परिसरात हवेचा जोर वाढल्यामुळे शेतकºयांचा रब्बी हंगामातील तयार होत असलेला गहु आडवा पडत आहे. यामुळे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.सध्या मालपुरसह परिसरात रब्बी हंगामातील पिके चांगलीच बहरली असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गहु पिकाला शेतकºयांनी शेवटचे पाणी देणे चालू केले आहे. मात्र, त्याचबरोबर सध्या हवेचा वायव्य नैऋत्य दिशेने जोर वाढला असून यामुळे उंबीवर पोसला जात असलेल्या वजनदार गव्हाच्या लोंबी भुईसपाट होत असल्यामुळे शेतकरी वर्गात निराशा पसरली आहे. हातातोंडाशी आलेला घास जोरदार वाºयामुळे हिरावला जातो कि काय, अशी भीती शेतकºयांमध्ये व्यक्त होत आहे. वाºयामुळे गव्हाच्या जमिनीतील मुळ फिरुन ऐन दाणा पोसला जाण्याच्या वेळेतच गहु पिक वाया जात आहे तर पाणी न भरल्यास गहु बारीक पडणार आहे, अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे. दिवसा हवेचा जोर जास्त असतो तर रात्रीच्या अंधारात व्यवस्थित पाणी देता येत नाही. तरीही येथील शेतकरी रात्रीच्या वेळेस कमरेइतक्या गहु पिकात उभे राहून जीवाची पर्वा न करता पाणी देण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. मात्र, त्यात लोडशेडिंगमुळे शेतकºयांचे सर्वच नियोजन कोलमडत आहे. यासाठी शेतकरी हिताचे लोडशेडिंग वीज वितरण कंपनीने करावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून होत आहे. अन्यथा भरपूर पाणी असूनही येथील शेतकºयांचा रब्बी हंगाम वाया जाणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे