शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

साखरपुड्याच्या खरेदीसाठी ग्रामस्थांची उडतेय झुंबड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:50 IST

शासन नियमांची पायमल्ली : बाजारपेठेत विनामास्क सर्रास वावर

धुळे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या पातळीवरुन प्रयत्न सुरु असताना नागरिकांनी देखील प्रतिसाद देणे गरजेचे आहे़ मात्र ग्रामीण भागातील जनतेकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सध्या शहरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे़ विनामास्क वावर आणि अनावश्यक गर्दी होत असल्याने शासन नियमांची एकप्रकारे पायमल्लीच असल्याचे अधोरेखित होत आहे़ हे रोखण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणा नसल्याचे चित्र स्पष्ट आहे़कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ तो रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले़ त्यामुळे शहरातील बाजारपेठेसह सर्वच व्यवहार ठप्प होते़ कालांतराने त्यात बदल करण्यात आल्यामुळे अनलॉकचा काळ सुरु झाला़ त्यातही काही अटी-शर्थी लावण्यात आल्या होत्या़ त्या अनुषंगाने बाजारपेठेतील व्यवहारांना सुरुवात झाली़ त्यात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे असे काही प्राथमिक निकषाच्या आधारावर व्यवहार पूर्ववत करण्यात आले़ असे असूनही सध्याच्या परिस्थितीत बिनधास्तपणे आणि ते ही विनामास्क वावरणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही़ बाजारपेठेत अनावश्यक गर्दी वाढत आहे़ ती रोखण्यासाठी कोणाकडेही ठोस पर्याय उपलब्ध नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे़महापालिकेच्यावतीने वेळोवेळी बाजारपेठेत मोहीम राबवून सम-विषम संख्येप्रमाणे दुकाने सुरु आहेत की बंद आहेत आणि विनामास्क कोणी फिरत आहेत का, याचाही शोध घेऊन संबंधितांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जात आहे़ हजारो लोकांवर कारवाई करुन त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे़अशी काहीसी स्थिती असताना आणि कारवाई होऊ शकते हे माहित असताना देखील त्याची कोणत्याही प्रकारची भीती ग्रामीण जनतेमध्ये दिसून येत नसल्याचे समोर येत आहे़ लग्नातच नाही तर अंत्ययात्रेला देखील मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे़ जास्तीचे लोकं दिसल्यास कारवाईचे संकेत आहेत़ हे देखील माहित असून देखील साखरपुडा आणि त्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण जनतेची अक्षरश: झुंबड उडत आहे़ ही छोटीशी वाटणारी बाब मात्र याकडे कोणीही गांभिर्याने घेताना दिसून येत नाही़ग्रामीण जनतेला एकतर कोरोनाची भीती वाटत नसावी, अथवा इतके प्रबोधन आणि जनजागृती सुरु आहे त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नसावी अशी शक्यता आहे़ प्रबोधन हे तळागाळापर्यंत झाले पाहिजे़ तरच ग्रामीण जनता त्या नुसार अंमलबजावणी करेल़ नाहीतर गर्दी वाढणार आणि रुग्ण संख्या वाढू शकते असा अंदाज यातून स्पष्ट होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे