शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

साखरपुड्याच्या खरेदीसाठी ग्रामस्थांची उडतेय झुंबड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 21:50 IST

शासन नियमांची पायमल्ली : बाजारपेठेत विनामास्क सर्रास वावर

धुळे : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या पातळीवरुन प्रयत्न सुरु असताना नागरिकांनी देखील प्रतिसाद देणे गरजेचे आहे़ मात्र ग्रामीण भागातील जनतेकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सध्या शहरातील बाजारपेठेत पहावयास मिळत आहे़ विनामास्क वावर आणि अनावश्यक गर्दी होत असल्याने शासन नियमांची एकप्रकारे पायमल्लीच असल्याचे अधोरेखित होत आहे़ हे रोखण्यासाठी कोणत्याही प्रशासकीय यंत्रणा नसल्याचे चित्र स्पष्ट आहे़कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे़ तो रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत़ सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले़ त्यामुळे शहरातील बाजारपेठेसह सर्वच व्यवहार ठप्प होते़ कालांतराने त्यात बदल करण्यात आल्यामुळे अनलॉकचा काळ सुरु झाला़ त्यातही काही अटी-शर्थी लावण्यात आल्या होत्या़ त्या अनुषंगाने बाजारपेठेतील व्यवहारांना सुरुवात झाली़ त्यात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, गर्दी टाळणे असे काही प्राथमिक निकषाच्या आधारावर व्यवहार पूर्ववत करण्यात आले़ असे असूनही सध्याच्या परिस्थितीत बिनधास्तपणे आणि ते ही विनामास्क वावरणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही़ बाजारपेठेत अनावश्यक गर्दी वाढत आहे़ ती रोखण्यासाठी कोणाकडेही ठोस पर्याय उपलब्ध नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे़महापालिकेच्यावतीने वेळोवेळी बाजारपेठेत मोहीम राबवून सम-विषम संख्येप्रमाणे दुकाने सुरु आहेत की बंद आहेत आणि विनामास्क कोणी फिरत आहेत का, याचाही शोध घेऊन संबंधितांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली जात आहे़ हजारो लोकांवर कारवाई करुन त्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे़अशी काहीसी स्थिती असताना आणि कारवाई होऊ शकते हे माहित असताना देखील त्याची कोणत्याही प्रकारची भीती ग्रामीण जनतेमध्ये दिसून येत नसल्याचे समोर येत आहे़ लग्नातच नाही तर अंत्ययात्रेला देखील मोजक्याच लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे़ जास्तीचे लोकं दिसल्यास कारवाईचे संकेत आहेत़ हे देखील माहित असून देखील साखरपुडा आणि त्याची खरेदी करण्यासाठी ग्रामीण जनतेची अक्षरश: झुंबड उडत आहे़ ही छोटीशी वाटणारी बाब मात्र याकडे कोणीही गांभिर्याने घेताना दिसून येत नाही़ग्रामीण जनतेला एकतर कोरोनाची भीती वाटत नसावी, अथवा इतके प्रबोधन आणि जनजागृती सुरु आहे त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नसावी अशी शक्यता आहे़ प्रबोधन हे तळागाळापर्यंत झाले पाहिजे़ तरच ग्रामीण जनता त्या नुसार अंमलबजावणी करेल़ नाहीतर गर्दी वाढणार आणि रुग्ण संख्या वाढू शकते असा अंदाज यातून स्पष्ट होत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे