विरखेलजवळील तीन पाझर तलाव फुटल्याने ‘पांझरेला’ मोठा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 21:45 IST2019-08-05T21:45:05+5:302019-08-05T21:45:45+5:30
धुळे जिल्हा : अक्कलपाडातून ३२ हजार क्यूसेस पाणी सोडले, सर्तकतेचा इशारा

पिंपळनेर येथील पांझरा नदीकाठावरील आदिवासी वस्तीत पुराचे पाणी शिरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री, पिंपळनेर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी विरखेल परिसरातील तीन पाझर तलाव फुटले. त्यामुळे गटखल नदीला पूर आला. ते पुराचे पाणी गांगेश्वरजवळ येऊन मिळाल्याने पांझरा नदीला पूर आलेला आहे. त्यात सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याने अक्कलपाडा धरणातून सध्यस्थितीत २२ हजार क्यूसेस पाणीचा प्रवाह सुरू असतांना सायंकाळी आणखी १४ हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे एकूण ३६ हजार क्यूसेस पाणी नदीत प्रवाहीत पांझरेला रात्रीतून आणखी मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
तालुक्यातील विरखेल गावालगत असलेल्या लेंडी धरण असून त्यावर तीन पाझर तलाव फुटले असल्याने लेंडी धरणात प्रचंड जलसाठा वाहून आला आहे. यामुळे गटखल नदीला मोठा पूर आला. पुढे हे पाणी गांगेश्वर येथे पांझरा नदीला येऊन मिळाले आहे. त्यात पश्चिम पट्ट्यात जोरात सुरु असलेल्या पावसामुळे रविवार पेक्षाही जास्त पाणी पांझरा नदीत आले आहे. त्यामुळे नदीला मोठा पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील पांझरा नदी काठावरील आदिवासी वस्तीत शिरले आहे. तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*एकाला वाचविले*
दरम्यान, रविवारी पुरात अडकलेल्या घोडदे, ता.साक्री येथील सुभाष सोनवणे (४०) याची ३० तासानंतर सुटका करण्यात प्रशासनाला यश लाभले.
*दोन जण अजून बेपत्ता*
साक्री तालुक्यातील काबºयाखडक प्रकल्पातून होणाºया विसर्गामुळे आलेल्या पुरात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बाळू शाहिराम ठाकरे(२१) व पंडित उलुशा गावीत (२६) दोघे जण वाहून गेले होते. त्यांचा दुसºया दिवशीही शोध लागलेला नव्हता. प्रशासन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे. पिंपळनेर पोलिसांत ते हरविल्याची नोंद घेऊन याबाबत सर्वत्र सूचना देण्यात आल्याचे तपासाधिकारी के.आर. रणधीर यांनी सांगितले.