शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

‘आरटीई’ची तिसरी प्रवेश सोडत तूर्त थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 12:12 IST

धुळे जिल्ह्यात दोन फेºयांमध्ये ६४९ विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

ठळक मुद्देजिल्हयात मोफत प्रवेशाच्या दोन फेºया झाल्या८७३ पैकी ६४९ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश तिसरी सोडतही लवकरच

आॅनलाइन लोकमतधुळे : आरटीई अंतर्गत  वंचीत व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के    प्रवेश देण्याची तरतूद आहे. त्यानुसार आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दोन फेºया पूर्ण झाल्या. मात्र तिसºया फेरीची प्रवेश प्रक्रिया संचालकांनी तूर्त थांबवलेली आहे. पुढील सूचना आल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.आरटीई अंतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये १ हजार १८१ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता ९३ शाळांमधील १ हजार १८१ जागांसाठी एकूण १ हजार ४६५ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले होते.प्राप्त झालेल्या अर्जांमधून पहिली आॅनलाईन सोडत १२ मार्च रोजी सोडत काढण्यात आली. त्यात ५६८ विद्यार्थ्यांची लॉटरी लागली होती. पालकांनी १४ ते २४ मार्च दरम्यान शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश घ्यायचा होता. मात्र दिलेल्या कालावधीत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे पहिल्यांदा ४ एप्रिल, त्यानंतर १० एप्रिल, १३ एप्रिल अशी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. पहिल्या फेरीचे  केवळ ४४१ विद्यार्थ्यांचे प्रवेशच होऊ शकले आहे. यापैकी ५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश तांत्रिक कारणांवरून रद्द करण्यात आले. तर ७४ विद्यार्थ्यांचे पालक शाळांपर्यंत पोहचलेच नाहीत. त्यामुळे १२७ प्रवेश होऊ शकले नाही. शिक्षण  विभागाच्या नियोजनानुसार मोफत प्रवेशाची दुसरी लॉटरी २८ ते ३० मार्च दरम्यान काढण्यात येणार होती. मात्र पहिल्या सोडतीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने, नियोजन कोलमडले. त्यानंतर शिक्षण विभागातर्फे दुसरी सोडत काढण्यात आली. त्यात ३०५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. मात्र पहिल्या फेरी प्रमाणेच दुसºया फेरीच्यावेळीही दोनवेळा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. मात्र दुसºया फेरीचेही २०८ प्रवेश झाले.  दुसºया फेरीचेही ९७ प्रवेश पूर्ण झालेले नाही.  पहिल्या दोन फेरीचे २२४ प्रवेश पूर्ण झालेले नाही. दरम्यान शासनाने आता आपल्या धोरणात बदल केलेले आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेतून २०१८-१९ या वर्षासाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज न केलेल्या प्रवर्गातील पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. या पालकांना अर्ज भरता यावा यासाठी,प्रवेश प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना नॅशनल इन्फॉर्मेटीक्स सेंटरला (एनआयसी) दिल्या आहेत. तसेच सात दिवस प्रवेश प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पुन्हा ही सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.राखीव जागेसाठी पालकांच्या उत्पनाची अट नाहीराखीव जागेसाठी पालकांच्या उत्पन्नाची अट नाहीशिक्षण हक्क कायद्यांतर्गत खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गाबरोबरच आता विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, आणि इतर मागासवर्ग, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पालकांच्या उत्पन्नाची अट लागू होणार नाही. तसेच एचआयव्ही बाधित मुलांनाही उत्पन्नाच्या अटीतून मुक्त करण्यात आल्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या निर्णयानंतर संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना  चालू प्रक्रियेत नव्याने,प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत हजारो मुलांना त्याचा  लाभ होणार आहे.नवीन धोरणानुसार आतापर्यंत वाटप झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून इतर रिक्त जागांसाठी सुधारित व्याख्येप्रमाणे अर्ज मागविण्यात यावेत. याकरिता एन.आय.सी.पुणे यांनी आवश्यक ते बदल आॅनलाईन प्रणालीमध्ये तत्काळ करावेत अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. तसेच या पूर्वी ज्या बालकांना / पालकांना सदर योजनेचा फॉर्म भरता आला नाही, त्यांनाही आॅनलाइन प्रणालीमध्ये फॉर्म भरता येईल. 

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक