शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जिल्ह्यात केवळ दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:38 IST

मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांसह धरणेही तुडुंब भरलेली आहे. याचा परिणाम पाणीटंचाई ...

मात्र गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांसह धरणेही तुडुंब भरलेली आहे. याचा परिणाम पाणीटंचाई मुक्ततेवर झालेली आहे. २०१९च्या मे महिन्यात जिल्ह्यातील १२४ गावांसाठी तब्बल ८९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र यावर्षी दिलासादायक स्थिती आहे. मे २०२१च्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात फक्त दोन गावांनाच टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात शिंदखेडा तालुक्यातील कामपूर व साक्री तालुक्यातील मळगाव डोमकाणे या दोन गावांचा समावेश आहे. दरवर्षी शिंदखेडा तालुक्याला पाणीटंचाईची सर्वाधिक झळ सोसावी लागते. मात्र गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसामुळे अमरावती प्रकल्प, वाडीशेवाळी धरण भरलेले असल्याने, या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न काहीसा मिटलेला आहे.

२९ विहिरी अधिग्रहित

२०१९ मध्ये टँकरप्रमाणेच तब्बल २५० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र यावर्षी फक्त २९ गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत. यात शिंदखेडा तालुक्यात ८, शिरपूर तालुक्यात ३, धुळे तालुक्यात ७ व साक्री तालुक्यात ११ विहिरींचा समावेश आहे. दरम्यान, अजून काही गावांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यामुळे जूनपर्यंत आणखी २०-२५ विहिरी अधिग्रहित कराव्या लागतील.

पाण्यासाठी भटकंती संपली

दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात स्त्री- पुरुषांना आपले कामेधंदे सोडून तळपत्या उन्हात, रात्री केव्हाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र अनेक गावांमध्ये बघावयास मिळत होते. मात्र यावर्षी ती परिस्थिती अजिबात नाही. काही गावांना पाणीपुरवठा उशिरा होत असला तरी टंचाई मात्र नाही ही दिलासादायक बाब आहे.

२०१९मध्ये भीषण दुष्काळ

२०१९मध्ये जिल्ह्यात भीषण दुष्काळ होता. यावर्षी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा व विहीर अधिग्रहित करणे यासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च झाला होता. हा आतापर्यंतचा पाणीपुरवठ्यावरील सर्वाधिक खर्च असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी फारशी पाणीटंचाई नाही. आजच्या स्थितीत जिल्ह्यात फक्त दोन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा असून, २९ विहिरी अधिग्रहित केलेल्या आहेत.

एस. बी. पढ्यार,

कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, धुळे