शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण स्वातंत्र्यासाठी प्रेरणा निर्माण केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST

शिरपूर येथील आर.सी. पटेल महाविद्यालयात "जगद्गुरू स्वामी विवेकानंद" या विषयावर ऑनलाइन व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ. गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी ...

शिरपूर येथील आर.सी. पटेल महाविद्यालयात "जगद्गुरू स्वामी विवेकानंद" या विषयावर ऑनलाइन व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ. गिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.. डी.आर.पाटील होते. डॉ. गिरासे पुढे म्हणाले, राष्ट्रभक्तीचे दुसरे नाव स्वामी विवेकानंद. त्यांनी आधुनिक काळात जगद्गुरूबाबत भारताची संकल्पना मांडली. देशातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. स्वातंत्र्य व शिक्षण ही समाजविकासाची प्रमुख साधने असून तळागाळातील समाज व महिलांना विकासाची संपूर्ण संधी देणे गरजेचे असल्याचे सांगून देशातील स्त्रिया वैज्ञानिक व आधुनिक शिक्षण घेऊन उन्नत झाल्या, तर त्यांच्या मुलाबाळांकरवी देशाचे भविष्य उज्ज्वल होणार, तरच या देशात विद्या, ज्ञान, भक्ती, शक्ती इत्यादी बाबींची जागृती होणार आहे. स्वामीजींनी सांगितलेले राष्ट्रनिष्ठा, धार्मिक सहिष्णुता, सद्भावना, परसेवा तत्परता, सत्य, सेवा, त्याग, समर्पण, नैतिकता, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, गरजू व पीडितांची सेवा आदी मानवतावादी व लोकशाही मूल्यांचे संस्कार व चिंतन लहान मुले तसेच युवकांच्या मनावर शाळा, महाविद्यालयांतून होणे गरजेचे आहे. युवकांनी वर्तमान परिस्थितीत समाजात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार

आचरणात आणावे.

प्राचार्य डॉ. डी.आर. पाटील म्हणाले की, आपल्या भाग्याचे आपणच निर्माते म्हणून युवकांनी स्वामी विवेकानंद यांच्या क्रांतिकारी व प्रेरणादायी विचारांचा अभ्यास करून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. गोपाल बिडे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रा. अनिता जाधव यांनी मानले.