शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. खरिपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. ज्या गावांची खरिपाची आणेवारी ५० ...

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. खरिपाचे अपेक्षित उत्पन्न आले नाही. ज्या गावांची खरिपाची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी होती तेथे प्रशासनातर्फे दुष्काळ जाहीर केला होता. त्यात धुळे, शिंदखेडा व साक्री तालुक्यातील काही मंडळांचा दुष्काळात समावेश करण्यात आला होता. दुष्काळग्रस्त गावातील सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार देण्यात आला होता. पहिली ते आठवीपर्यंतच्या जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांना सरासरी ४० दिवस याचा लाभ देण्यात आला होता. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १००, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज १५० ग्रॅम आहार मिळत होता.

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस आहे. त्यामुळे दुष्काळसदृश स्थिती कुठेही नाही. असे असले तरी गेल्या वर्षी उन्हाळी सुटीतील पोषण आहाराचे जूनमध्ये वाटप करण्यात आले आहे.

मात्र, यावर्षी उन्हाळ्याच्या सुटीत पोषण आहाराचे काहीच नियोजन नाही, अथवा आदेश नाही. मे महिना संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पोषण आहाराबाबत जसे आदेश येतील तशी कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.