शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

बियाणे, खतांची दरवाढ थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:37 IST

धुळे : रासायनिक खतांचे भाव कमी करावेत अन्यथा, केंद्र सरकारने तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी करार स्वरुपाने घ्याव्या आणि नफ्याची ...

धुळे : रासायनिक खतांचे भाव कमी करावेत अन्यथा, केंद्र सरकारने तीन वर्षांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी करार स्वरुपाने घ्याव्या आणि नफ्याची शेती करुन दाखवावी, असे आव्हान धुळे जिल्ह्यातील कृषीकन्यांनी शासनाला दिले आहे.

धुळे येथील कृषीकन्या प्रियंका जोशी, अर्चना अहिरे, अलका खैरनार, कल्पना खैरनार, अंजिराबाई खैरनार, सुनंदा खैरनार, दीपक खैरनार, नरेंद्र खैरनार आदींच्या शिष्टमंडळाने साेमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीआधी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु वास्तवात पिकांचे भाव दुप्पटीने कमी झाले आहेत. याऊलट रासायनि खतांचे भाव दुप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या तिप्पटीने वाढतील की काय अशी परिस`थिती सरकारने निर्माण केली आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी जीडीपी वाढवला. संपूर्ण जग बंद असताना देशाला शेतकऱ्यांनी जगवले. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर`थिक मदत केली पाहिजे. शिवाय खरीप हंगामात खते आणि बियाणे मोफत देवून दुप्पटीने मदत करायला हवी. केंद्र सरकारने खतांचे भाव दीडपट वाढवले आहेत.

नोटबंदी, कांदा निर्यातबंदी, कोरोना, सततची गारपीट आणि अवकाळी वादळी पाऊस या साऱ्या संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खतांचे भाव वाढवले तसे पिकांना हमीभाव देण्यासाठी सरकार ठोस पाऊले कधी उचलणार असा प्रश्न निवेदनात उपस`थित केला आहे. सरकारने खतांचे भाव त्वरीत कमी करावे. ते करणे शक्य नसेल तर केंद्र सरकारने स्वत: शेती करुन नफा मिळवून दाखवावा. सरकारला हे जमले तर त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बक्षिस म्हणून स्वत:कडे ठेवाव्यात असे अव्हाने कृषीकन्यांनी दिले आहे.