शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

साक्रीनजिक ट्रॉला-पिकअपच्या धडकेत एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:13 IST

युवक पिंपळनेरचा : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटना, वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : भरधाव वेगाने येणाºया ट्राला आणि पिकअप वाहन यांच्यात झालेल्या अपघातात पिकअप चालक युवकाचा जागीच मृत्यू झाला़ अपघाताची ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील साक्रीनजिक घडली़ या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ ट्रालाचालक अपघातानंतर फरार झाला़ पिंपळनेर येथील यशोदा नगरात राहणारा सुनील मुसळे याचा किराणा व्यवसाय आहे़ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एमएच ४७ ई ०९०१ या क्रमांकाच्या पिकअप वाहनाने नागली घेऊन जात असताना नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील साक्रीनजिक एका हॉस्पिटलजवळ धुळ्याहून गुजरातकडे जीजे ०५ एयु ७०६७ क्रमांकाच्या ट्रालाने जोरदार धडक दिली़ समोरुन बसलेल्या या धडकेत गाडीच्या स्टेअरिंग आणि बॅकसिट यात दाबला गेला़ पिकअप वाहनाचे स्टेअरिंग सुनील याच्या पोटात घुसल्याने तो जबर जखमी झाला़ परिणामी त्याचा जागीच मृत्यू ओढवला़ अपघात इतका जोरदार झाला की पिकअप वाहनातील धान्य रस्त्यावर फेकले गेले़ या अपघातानंतर ट्रॉलाचालक ट्रॉला सोडून पळून गेला़ अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरीक घटनास्थळी धावत आले़ त्यांनी पिकअप वाहनात अडकलेला चालक सुनील याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तो दाबला गेल्याने वाहनाचे दारही उघडत नसल्याने सुनीलचा मृतदेह काढणे उपस्थितांना अवघड झाले होते़ परंतु अथक परिश्रमानंतर त्याचा मृतदेह काढण्यात नागरीकांना यश आले़ त्याचा मृतदेह साक्रीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला़ यावेळेस मात्र महामार्गावरील दोन्ही बाजुंची वाहतूक विस्कळीत झाली होती़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले़ नागरीकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली़ अपघात झाल्याची माहिती पिंपळनेर गावात धडकताच शोककळा पसरली़ सुनील हा सर्वांशी मिळून-मिसळून वागत असल्याने त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली़ अपघाताची माहिती मिळताच सुनीलचे नातलग, त्याचा मित्र परिवार साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले़ पंचनाम्याचा सोपस्कार पार पडल्यानंतर सुनीलचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आला़ सुनीलच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे़ महामार्ग ठरला मृत्यूचा सापळानागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग आणि साक्रीनजिकचा परिसर हा घडणाºया घटनांवरुन मृत्यूचा सापळा होत असल्याची प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरीकांकडून व्यक्त होऊ लागली आहे़ महामार्ग गावातून जात असल्याने बहुधा अपघाताची मालिका होत असल्याने ही बाब प्रशासकीय पातळीवर गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे़ अपघात टाळण्यासाठी वाहनधारकांनी देखील आपले वाहन सांभाळून चालवायला हवे़ मंगळवारच्या अपघातात नेमका दोष कोणाचा? यावर चर्चा होत आहे़
टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात