नरडाणा एमआयडीसीतील शिरपूर पॉवर प्लॅँट बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 11:54 IST2018-02-18T11:52:00+5:302018-02-18T11:54:58+5:30

औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प : वीज खरेदीस सरकारची असमर्थता, हजारो रोजगारांवर गदा 

Sharampur power plant in Naradaa MIDC is closed | नरडाणा एमआयडीसीतील शिरपूर पॉवर प्लॅँट बंद 

नरडाणा एमआयडीसीतील शिरपूर पॉवर प्लॅँट बंद 

ठळक मुद्देउद्योगास अनपेक्षित विलंबखर्च ८०० कोटींनी वाढलाबँकाची कर्जास असमर्थता

सतीश चोरडिया । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नरडाणा : शिंदखेडा तालुक्यातील बहुचर्चित शिरपूर पॉवर प्लँट हा औष्णिक विद्युत प्रकल्प कायमचा बंद करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला आहे़ यामुळे खान्देशच्या औद्योगिक जगतात खळबळ माजणार आहे. सद्यस्थितीतच पाचशे कामगारांचे रोजगार बुडाले आहेत. बॅँकांनीही कर्ज देण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे वृत्त आहे.  
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत पंच तारांकित डी प्लस झोनची औद्योगिक वसाहत नरडाणा परिसरात १९९५-९६ पासून विकसित होत आहे़ गेल्या २३ वर्षात नावलौकिक होईल,  असा एकही मोठा उद्योग या औद्योगिक वसाहतीत अद्यापपर्यंत सुरू होऊ शकलेला नाही़ याला विविध कारणे असली तरी या औद्योगिक वसाहतीच्या २१२ एकरात विस्तारलेला शिरपूर पॉवर प्लँट या औष्णिक विद्युत निर्मितीच्या प्रकल्पाचे काम २०११ च्या सुरुवातीला सुरू झाले़ तेव्हा त्यास विविध अडचणींना तोंड द्यावे लागले़
त्या अडचणींवर मात करत हा उद्योग पूर्णत्वास येत होता़ प्रकल्पाच्या सुरुवातीलाच वाघोदे, माळीच, जातोडा, येथील शेतकºयांनी शेतजमिनीला भाव द्यावा यासाठी या उद्योगाच्या उभारणीला विरोध केला़ तेव्हापासून या उद्योग उभारणीला ग्रहण लागले़ यात बºयाच शेतकºयांना मोबदला देण्याच्या कामात कंपनीच्या काही अधिकाºयांच्याही चुका झाल्या़ व्यवहारात झालेला अपहार व गोंधळात शेतकरी मात्र चक्रावला़ यात काही स्थानिकांनी सुध्दा मलिदा लाटला़ नंतरही या उद्योगाला विरोध सुरुच राहिला़ कधी स्थानिकांना रोजगार द्यावा, कधी पाणी, डंपर, वाळू, कॉन्ट्रॅक्ट, वस्तू विकत घेण्याची सक्ती आदींसह विद्यमान मंत्री जयकुमार रावल यांनी त्यावेळी काढलेल्या मोर्चापर्यंत या उद्योगाच्या संचालकांना लढत रहावे लागले़ टॉवर उभारणीच्या कामात तर कमालीचे अडथळे आलेत़ 
उद्योगास अनपेक्षित विलंब
२०११ला सुरू झालेले काम २०१५ पर्यंत संपणार होते़ परंतु २०१८ पर्यंतही हा प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही़ म्हणून विलंबामुळे कंपनीचा अनाठायी खर्च वाढला़ कर्मचाºयांचा पगार, व्याज यामुळे तसेच शेतकºयांच्या विरोधाला तोंड देत या प्र्रकल्पास ३ वर्ष विलंब झाला़ 
खर्च ८०० कोटींनी वाढला
या उद्योगाच्या उभारणीला १५०० कोटींचा निधी लागेल, असा अंदाज या उद्योगाच्या संचालकांनी घेतला होता़ परंतु तो चुकीचा ठरला़ ३ वर्ष विलंब झाल्याने व काही अडचणीमुळे या उद्योगाला जवळ जवळ ४०० कोटींची आवश्यकता हा प्रकल्प सुरु करण्यास लागणार आहे़त. 
बँकाची कर्जास असमर्थता
या उद्योगाला कर्जासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा व आयडीबीआय या तीन बँकाचे वित्तीय सहकार्य लाभले आहे़ परंतु पुन्हा वाढीव कर्जाला या बँकांनी नकार दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़ 
प्रकल्पाची चाचणी पूर्ण
या प्रकल्पाची चाचणी पूर्ण झाली असून कोळसा आणणे, रेल्वे ट्रॅक उभारणे आदींसह लहान कामांसाठी पैशांची गरज आहे़  चाचणीवेळी निर्माण झालेली वीज या प्रकल्पाने राज्य सरकारला विनामुल्य दिली आहे़ खरेतर यासाठी राज्य शासनाने वीज निर्मितीला लागलेला खर्च देणे अपेक्षित होते़ परंतु तो ही राज्य सरकारने दिलेला नाही़ 
सरकार वीज घेण्यास असमर्थ
हा प्रकल्प सुरु झाल्यानंतरही राज्य सरकार वीज विकत घेईल याची शाश्वती उरलेली नाही़ सरकारने मागितलेल्या दरात वीज विक्री करणे प्रकल्पास शक्य नाही़ कारण त्या दरात वीजनिर्मिती खर्च निघणेही शक्य नाही़ म्हणून या प्रकल्पाचे भविष्य सध्यातरी अधांतरी आहे़  
अनेकांच्या आशा मावळल्या
या प्रकल्पात कार्यरत असलेल्या १३० अधिकारी आणि कर्मचाºयांपैकी जवळपास १०० लोकांना घरी पाठविले़ आहे़ एकाच दिवशी १०० लोकांना घरी पाठविण्याच्या निर्णयाने अनेक बेरोजगारांच्या आशा मावळल्या़ तर, अनेक लहान उद्योगांवरही संक्रांत आली आहे़ यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला जाणार आहे़ 
संपूर्ण खान्देशला फटका
२१२ एकरावरील व २५०० कोटींचा हा प्रकल्प सुरु झालेला नाही़ त्यामुळे खान्देशच्या औद्योगिक भवितव्यावर वीज कोसळणार आहे़ सरकार, अधिकारी, राजकारणी व परिसरातील नागरिकांच्या त्रासाला उद्योगपती पुरते कंटाळले आहेत़ यामुळे खान्देश उद्योगास अनुकूल नसल्याचा नकारात्मक सूर उद्योगपती आळवत असून या प्रकल्पामुळे त्यास दुजोरा मिळणार आहे. 
या संदर्भात कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणाशीही अधिकृत बोलणे झालेले नाही़ कंपनीत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरु असून सुरक्षिततेसह मोजकाच स्टाफ राहणार आहे़ सीसीटीव्हीद्वारे या उद्योगाचे नियंत्रण व नियोजन अहमदाबाद येथून होणार असल्याची अधिकृत माहिती तेवढी मिळाली़ शिरपूर पॉवर प्लॅँट  ही  कंपनी सिंटेक्स प्लॅस्टिक या कंपनीची पूरक कंपनी आहे़ यामुळे या औद्योगिक क्षेत्रात येणाºया अल्ट्राटेक सिमेंट व सध्या काम पूर्णत्वास आलेल्या वंडर सिमेंट या दोन्ही कंपन्यांना सुद्धा धक्का बसला आहे. 

Web Title: Sharampur power plant in Naradaa MIDC is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.