शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:33 IST

गेल्यावर्षीपासून कोरोनाचे वादळ घोंगावतेय. गेल्यावर्षीही ऐन परीक्षेच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा कहर ...

गेल्यावर्षीपासून कोरोनाचे वादळ घोंगावतेय. गेल्यावर्षीही ऐन परीक्षेच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा कहर कायम असल्याने, यावर्षी शाळा सुरू होण्यास तब्बल जानेवारी महिन्याची वाट बघावी लागली. अनेक शाळांमध्ये ॲानलाईन उपक्रम सुरू असला तरी तो नावालाच होता.

दरम्यान, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, ज्या शाळा सुरू झाल्या होत्या, त्या देखील बंद झाल्या. दरम्यान, जेवढा कालावधी शाळा सुरू होता, त्याकाळात काही शाळांनी चाचणी परीक्षा घेतल्या. ॲानलाईन अभ्यास घेतला. एवढी तयारी केल्यानंतर पुन्हा एकदा राज्य शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थी वर्गातही काहीशी नाराजी आहे. शाळास्तरावर ॲानलाईन परीक्षा घेणे सहज शक्य आहे. मात्र, शाळांनीही हात झटकल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षा रद्द झाल्या तर गुणवत्ता कशी समजणार, असा प्रश्न आहे.

शाळास्तरावर चाचणी परीक्षा घेतली तर ॲानलाईन परीक्षा घेण्यात कुठलीही अडचण यायला नको. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे अयोग्य आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ॲाफलाईन शक्य नसल्याने, ॲानलाईन घेतली पाहिजे. अे.पी.जोशी

माजी प्राचर्य पालेशा शिक्षणशास्त्र महाविद्यालय

कोरोनाचे संकट असल्याने, शिक्षण विभागाने पुन्हा एकदा परीक्षा रद्द केलेल्या आहेत. मग ॲानलाईन शिक्षणाचा उपयोग काय झाला? ते समजेनासे आहे. किमान शाळा स्तरावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ॲानलाईन पद्धतीने घेऊन गुण दिल्यास विद्यार्थ्याची प्रगती समजू शकेल.

- संभाजी पाटील,

पालक,

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला असला तरी शेवटी विद्यार्थ्यांची प्रगतीही महत्त्वाची आहे. परीक्षा रद्द होत असल्याने, त्यांच्यातील अभ्यासाची गोडी कमी होईल. त्यामुळे ॲाफलाईन परीक्षा तरी झाल्याच पाहिजे. तरच त्याचा फायदा होईल.

- एस.बी. कुळकर्णी,

पालक,

राज्यात कोरोनाचे संकट अतिशय गडद झालेले आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत. मात्र सलग दोन वर्षांपासून विद्यार्थ्याच्या परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात पाठविले जात आहे. मात्र ही ढकलगाडी काय कामाची, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.